शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

Sangli: दुष्काळ निधीवर डल्ला मारणाऱ्या कर्मचाऱ्यांना बडतर्फ करा - सुनील फराटे 

By अशोक डोंबाळे | Updated: May 25, 2024 18:40 IST

जिल्हा बँकेच्या घोटाळ्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल करा

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अनामत खात्यातून दुष्काळग्रस्तांच्या रकमेवर डल्ला मारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तत्काळ बडतर्फची कारवाई झाली पाहिजे, तसेच दोन कोटींहून अधिकचा घोटाळा होत असताना अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याबद्दल त्यांच्यावरही फौजदारी कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.स्वतंत्र भारत पक्षातर्फे दिलेल्या निवेदनात म्हटले की, जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँक ही अग्रगण्य बँक आहे. जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिक यांचे सर्व व्यवहार व ठेवी या बँकेत आहेत. जिल्ह्यातील सहकारी संस्था म्हणजेच साखर कारखाने, सूत गिरण्या, प्रक्रिया संस्थेसह इतर सहकारी संस्थांना आर्थिक साहाय्य देते, म्हणूनच या बँकेला जिल्ह्याची अर्थवाहिनी संबोधली जाते.जिल्हा बँकेकडे दुष्काळ, अतिवृष्टी आणि पीकविमा भरपाईचा निधी शासनाने दिला आहे. हा निधी हा ज्या-त्यावेळी शेतकऱ्यांच्या खाती जमा न करता, तो अनामत खाती शिल्लक ठेवला आहे. या निधीवरती बँकेतील काही कर्मचाऱ्यांनी डल्ला मारलेला आहे. याबाबतची व्याप्ती पाहता अपहारीत रक्कम अंदाजे सहा ते सात कोटी असल्याचे दिसत आहे. अपहाराची व्याप्ती पाहता, रक्कम अंदाजापेक्षा कितीतरी पटीने वाढण्याची शक्यता आहे. अपहाराबाबत बँकेच्या काही अधिकाऱ्यांची टीम बनवून चौकशीचा फार्स केला जात आहे. त्यामुळे चौकशी पारदर्शकपणे होऊन अपहारित रक्कम वसूल होणे गरजेची आहे. संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर फौजदारीची कारवाई होणे अपेक्षित आहे. शासनाचा निधी शेतकऱ्यांना वर्ग झाला नसेल, तर तो निधी शासनाकडे परत पाठविण्याची जबाबदारी ही बँकेची आहे. तथापि, बँकेने व बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.अपहारित रक्कम ही शासनाचा निधी असल्यामुळे शासनाच्या निधीचा गैरवापर झाल्याने, जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून बँकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे. दोन अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची गरज आहे. या बँकेकडे फार मोठ्या प्रमाणात अपहार, गैरव्यवहाराची प्रकरणे घडत आहेत. शासकीय निधी परत न केल्याप्रकरणी जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी यांच्याकडे केली आहे.

टॅग्स :Sangliसांगलीdroughtदुष्काळbankबँक