शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

सांगली शहरात पाण्यासाठी धावाधाव

By admin | Updated: July 27, 2014 00:31 IST

गलथान कारभार : ऐन पावसाळ््यात सांगली, कुपवाडमध्ये पाणीटंचाई

सांगली : गेल्या तीन दिवसांपासून सांगली व कुपवाडमधील नागरिकांना पाण्यापासून वंचित रहावे लागले. यंत्रणा पूर्ववत केल्याचा दावा पाणीपुरवठा विभागाकडून केला जात असला, तरी शनिवारीही पाण्याअभावी नागरिकांचे हाल झाले. ऐन पावसाळ््यात पाण्यासाठी धावाधाव करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. नागरिकांमधून याबाबत संताप व्यक्त होत आहे. सांगली व कुपवाड या दोन शहरांना गुरुवारी मातीमिश्रित पाण्याचा पुरवठा झाला. या प्रकाराने संतप्त झालेल्या सत्ताधारी नगरसेवकांनी माळबंगला येथील जलशुद्धीकरण केंद्राला भेट देऊन पाणीपुरवठा विभागाचे वाभाडे काढले. त्यानंतर पाणीपुरवठा विभागाने शुद्ध आणि शंभर टक्के फिल्टर झालेले पाणी देण्यासाठी गाळप होऊ शकेल इतकाच पुरवठा करण्याची भूमिका घेतली आहे. त्याचा परिणाम गेल्या दोन दिवसांपासून पाणीपुरवठ्यावर झाला. शहरात दैनंदिन पुरवठ्यापेक्षा कित्येक पटीने कमी पाण्याचा पुरवठा झाला. माळबंगला येथून पुरवठा होणाऱ्या कुपवाड, अभयनगर, यशवंतनगर, विश्रामबागसह उपनगरांत शुक्रवारी तासभरच पाण्याचा पुरवठा झाला. हा पुरवठाही शुद्ध नव्हता. शनिवारीही सायंकाळपर्यंत अनेक भागात पाणी नव्हते. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले. दुसऱ्या बाजूला पाणीपुरवठा पूर्ववत झाल्याचा दावा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून केला जात आहे. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांचे दूरध्वनीही शनिवारी दुपारी बंद होते. त्यामुळे तक्रार करण्यासही नागरिकांना अडचणी आल्या. (प्रतिनिधी)