शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

आरपीआय सर्व निवडणुका स्वबळावर लढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:30 IST

मिरज : मिरजेत आरपीआय आठवले गटाच्या मेळाव्यात महापालिका निवडणुकीसह जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका रिपाईं स्वबळावर लढविणार असल्याचे प्रदेश ...

मिरज : मिरजेत आरपीआय आठवले गटाच्या मेळाव्यात महापालिका निवडणुकीसह जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका रिपाईं स्वबळावर लढविणार असल्याचे प्रदेश सचिव विवेक कांबळे यांनी सांगितले.

विवेक कांबळे म्हणाले की, मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली अनेक अडचणींवर मात करून आज आरपीआयने आपला झेंडा फडकवला आहे. जिल्ह्यात आगामी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीसह विधानसभा निवडणूक आरपीआय स्वबळावर लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी रिपाईं कार्यकर्त्यानी आतापासूनच कामाला लागा, असा संदेश विवेक कांबळे यांनी दिला.

बहुजन बहुसंंख्य असूनही राजकीय क्षेत्रात आपल्या विचारसारणीचे उमेदवार निवडून आणणे कठीण होत आहे. या परिस्थितीबाबत चिंतनाची गरज असल्याचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस जगन्नाथ ठोकळे यांनी सांगितले.

जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी, जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत रिपाईंचे पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

या वेळी कवठेमहांकाळ तालुकाध्यक्ष नगरसेवक लालासाहेब वाघमारे, कोल्हापूर जिल्हानेते सतीश माळगे, सतीश जाधव, संदेश भंडारे, छाया सर्वदे, अशोक कांबळे यांनीही मार्गदर्शन केले. अरविंद कांबळे व अविनाश कांबळे यांनी स्वागत केले.

सांगली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष बापू सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष रवी खांडेकर, सांगली शहराध्यक्ष सुनील साबळे व माणिक गस्ते, मिरज शहर उपाध्यक्ष सुमीत कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. हेमंत चौगुले, पलूस महिला तालुकाध्यक्ष रुपाली कांबळे यांना निवडपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी यशवंत कांबळे, प्रवीण धेंडे, संजय कांबळे, पिंटू माने, दादासाहेब चंदनशिवे, विलास कांबळे, संजय मस्के, क्रांतिकुमार कांबळे, विशाल तिरमारे, सलमान पठाण, मनोज गाडे उपस्थित होते.

अभिजित आठवले यांनी प्रास्तविक केले. या वेळी जिल्हा कार्यकारिणीची फेरनिवड करण्यांत आली. अभिजित आठवले यांनी प्रास्तविक केले. नंदकुमार कांबळे यांनी आभार मानले.