शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

काँग्रेस-राष्टवादीत चार जागांसाठी रस्सीखेच -: विधानसभा निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 23:36 IST

सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी आघाडीच्या २००९ मधील जागा वाटपानुसार राष्टवादीकडे इस्लामपूर, तासगाव-कवठेमहांकाळ व जत, तर काँग्रेसकडे सांगली, मिरज, पलूस-कडेगाव, शिराळा आणि खानापूर मतदारसंघ आहेत.

ठळक मुद्देजत, मिरज, शिराळा, पलूस-कडेगावच्या जागेवरून स्थानिक इच्छुकांमध्ये दावेदारी सुरू

सांगली : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांच्या प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरू असताना, चार जागांसाठी दोन्ही काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. ही मागणी इच्छुक व स्थानिक पदाधिकाऱ्यांतून होत असली तरी, त्याची दखल घेत जागावाटपाच्या बैठकीतही यावरून चर्चा रंगण्याची चिन्हे आहेत. जत, मिरज, पलूस-कडेगाव व शिराळा या चार जागांच्या अदलाबदलीची मागणी जोर धरत आहे.

सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी आघाडीच्या २००९ मधील जागा वाटपानुसार राष्टवादीकडे इस्लामपूर, तासगाव-कवठेमहांकाळ व जत, तर काँग्रेसकडे सांगली, मिरज, पलूस-कडेगाव, शिराळा आणि खानापूर मतदारसंघ आहेत. यातील इस्लामपूर, तासगाव-कवठेमहांकाळ, सांगली या तीन मतदारसंघात उमेदवारीसाठी आघाडीत चुरस दिसत नाही. जत आणि मिरज मतदारसंघात दोन्ही पक्षांकडे सर्वाधिक इच्छुकांचे अर्ज दाखल झाले आहेत. तेथे चुरस दिसून येत आहे. राष्टवादीच्या इच्छुकांच्या मुलाखतीवेळी मिरजेतील इच्छुकांनी, काँग्रेसकडील जागा राष्टवादीने घ्यावी, अशी आग्रही मागणी केली. पलूस-कडेगाव मतदारसंघातून राष्टवादीकडे केवळ शरद लाड यांचा एकमेव अर्ज असला तरी, त्यांनीही या जागेची मागणी करीत, किती दिवस दुसऱ्यांसाठीच लढायचे, असा सवाल उपस्थित केला. लाड यांचा मोठा गट आहे. या गटाचाही या जागेसाठी आग्रह सुरू आहे.

जत विधानसभा मतदारसंघ राष्टवादीकडे असला तरी, काँग्रेसचे विक्रम सावंत यांच्यासह अन्य इच्छुकांनी ही जागा काँग्रेसकडे घ्यावी, अशी मागणी केली आहे. या मागणीला जोर येत असतानाच राष्टवादीच्या येथील इच्छुकांनी, ही जागा राष्टवादीने कोणत्याही परिस्थितीत सोडू नये, असे सांगितले आहे. मिरजेच्या जागेसाठीही राष्टवादीने हट्ट धरला आहे. काँग्रेसपेक्षा राष्टवादीकडे अधिक सक्षम उमेदवार असल्याचा दावा त्यांनी केला आहे, मात्र काँग्रेसच्या इच्छुकांनी हा परंपरागत काँग्रेसचा मतदारसंघ सोडू नये, अशी मागणी पक्षाकडे केली आहे. शिराळा मतदारसंघ त्यावेळी काँग्रेसकडे गेला होता, मात्र आता राष्टवादीनेही त्यावर दावा केला आहे.

या जागांसाठी दोन्ही पक्षात जोरदार रस्सीखेच अनुभवास येत आहे. निवडणुका जवळ येतील तशी ही रस्सीखेच अधिकच रंगतदार अवस्थेत येणार आहे. काँग्रेस व राष्टÑवादी आघाडीचा व जागावाटपाचा निर्णय अद्याप झाला नसला तरी, याकडे जिल्ह्यातील सर्व इच्छुकांसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.आघाडीचा : समीकरणांवर परिणामवंचित बहुजन आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना या घटक पक्षांशी आघाडी झाली, तर त्यांनाही यातील काही जागा द्याव्या लागणार असल्याने, पुन्हा गणित बदलणार आहे. जत व मिरज या दोन जागांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आग्रही आहे. या दोनच मतदारसंघात तीन पक्षांची दावेदारी असल्याने, याबाबत निर्णय घेताना पक्षीय नेतृत्वाची कसरत होणार आहे. या दोन्ही पक्षांशी आघाडी झाली नाही तरीही रस्सीखेच थांबणार नाही.नाराजीची भीतीजागा बदल झाले तरीही नाराजी आणि झाले नाही तरीही नाराजीचा सामना दोन्ही पक्षांना आणि पर्यायाने आघाडीला करावा लागणार आहे. जत आणि मिरज या मतदारसंघात सर्वाधिक नाराजीचा सामना दोन्ही पक्षांना करावा लागण्याची शक्यता आहे.

टॅग्स :SangliसांगलीElectionनिवडणूकvidhan sabhaविधानसभा