शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
2
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
4
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
5
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
6
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
7
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
8
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
10
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
11
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
12
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
13
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
14
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
15
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
16
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
17
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
18
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
19
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

काँग्रेस-राष्टवादीत चार जागांसाठी रस्सीखेच -: विधानसभा निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 23:36 IST

सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी आघाडीच्या २००९ मधील जागा वाटपानुसार राष्टवादीकडे इस्लामपूर, तासगाव-कवठेमहांकाळ व जत, तर काँग्रेसकडे सांगली, मिरज, पलूस-कडेगाव, शिराळा आणि खानापूर मतदारसंघ आहेत.

ठळक मुद्देजत, मिरज, शिराळा, पलूस-कडेगावच्या जागेवरून स्थानिक इच्छुकांमध्ये दावेदारी सुरू

सांगली : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांच्या प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरू असताना, चार जागांसाठी दोन्ही काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. ही मागणी इच्छुक व स्थानिक पदाधिकाऱ्यांतून होत असली तरी, त्याची दखल घेत जागावाटपाच्या बैठकीतही यावरून चर्चा रंगण्याची चिन्हे आहेत. जत, मिरज, पलूस-कडेगाव व शिराळा या चार जागांच्या अदलाबदलीची मागणी जोर धरत आहे.

सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी आघाडीच्या २००९ मधील जागा वाटपानुसार राष्टवादीकडे इस्लामपूर, तासगाव-कवठेमहांकाळ व जत, तर काँग्रेसकडे सांगली, मिरज, पलूस-कडेगाव, शिराळा आणि खानापूर मतदारसंघ आहेत. यातील इस्लामपूर, तासगाव-कवठेमहांकाळ, सांगली या तीन मतदारसंघात उमेदवारीसाठी आघाडीत चुरस दिसत नाही. जत आणि मिरज मतदारसंघात दोन्ही पक्षांकडे सर्वाधिक इच्छुकांचे अर्ज दाखल झाले आहेत. तेथे चुरस दिसून येत आहे. राष्टवादीच्या इच्छुकांच्या मुलाखतीवेळी मिरजेतील इच्छुकांनी, काँग्रेसकडील जागा राष्टवादीने घ्यावी, अशी आग्रही मागणी केली. पलूस-कडेगाव मतदारसंघातून राष्टवादीकडे केवळ शरद लाड यांचा एकमेव अर्ज असला तरी, त्यांनीही या जागेची मागणी करीत, किती दिवस दुसऱ्यांसाठीच लढायचे, असा सवाल उपस्थित केला. लाड यांचा मोठा गट आहे. या गटाचाही या जागेसाठी आग्रह सुरू आहे.

जत विधानसभा मतदारसंघ राष्टवादीकडे असला तरी, काँग्रेसचे विक्रम सावंत यांच्यासह अन्य इच्छुकांनी ही जागा काँग्रेसकडे घ्यावी, अशी मागणी केली आहे. या मागणीला जोर येत असतानाच राष्टवादीच्या येथील इच्छुकांनी, ही जागा राष्टवादीने कोणत्याही परिस्थितीत सोडू नये, असे सांगितले आहे. मिरजेच्या जागेसाठीही राष्टवादीने हट्ट धरला आहे. काँग्रेसपेक्षा राष्टवादीकडे अधिक सक्षम उमेदवार असल्याचा दावा त्यांनी केला आहे, मात्र काँग्रेसच्या इच्छुकांनी हा परंपरागत काँग्रेसचा मतदारसंघ सोडू नये, अशी मागणी पक्षाकडे केली आहे. शिराळा मतदारसंघ त्यावेळी काँग्रेसकडे गेला होता, मात्र आता राष्टवादीनेही त्यावर दावा केला आहे.

या जागांसाठी दोन्ही पक्षात जोरदार रस्सीखेच अनुभवास येत आहे. निवडणुका जवळ येतील तशी ही रस्सीखेच अधिकच रंगतदार अवस्थेत येणार आहे. काँग्रेस व राष्टÑवादी आघाडीचा व जागावाटपाचा निर्णय अद्याप झाला नसला तरी, याकडे जिल्ह्यातील सर्व इच्छुकांसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.आघाडीचा : समीकरणांवर परिणामवंचित बहुजन आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना या घटक पक्षांशी आघाडी झाली, तर त्यांनाही यातील काही जागा द्याव्या लागणार असल्याने, पुन्हा गणित बदलणार आहे. जत व मिरज या दोन जागांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आग्रही आहे. या दोनच मतदारसंघात तीन पक्षांची दावेदारी असल्याने, याबाबत निर्णय घेताना पक्षीय नेतृत्वाची कसरत होणार आहे. या दोन्ही पक्षांशी आघाडी झाली नाही तरीही रस्सीखेच थांबणार नाही.नाराजीची भीतीजागा बदल झाले तरीही नाराजी आणि झाले नाही तरीही नाराजीचा सामना दोन्ही पक्षांना आणि पर्यायाने आघाडीला करावा लागणार आहे. जत आणि मिरज या मतदारसंघात सर्वाधिक नाराजीचा सामना दोन्ही पक्षांना करावा लागण्याची शक्यता आहे.

टॅग्स :SangliसांगलीElectionनिवडणूकvidhan sabhaविधानसभा