शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

सांगलीत रस्त्यांची जागा घेतली आठवडी बाजारांनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:24 IST

सांगली : सांगली शहर आणि उपनगरामध्ये रोज आठवडी बाजार भरत असल्यामुळे त्या परिसरातील नागरिकांची सोय होत आहे. पण, आठवडी ...

सांगली : सांगली शहर आणि उपनगरामध्ये रोज आठवडी बाजार भरत असल्यामुळे त्या परिसरातील नागरिकांची सोय होत आहे. पण, आठवडी बाजार रस्त्यांवर घेतल्यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. रस्त्यावरच भाजीपाल्याची विक्री होत असल्यामुळे त्यावर धूळ मोठ्याप्रमाणावर बसत असल्यामुळे आरोग्यासाठीही ते घातक आहे.

सांगलीतील सर्वाधिक मोठा आठवडी बाजार दर शनिवारी भरतो. गुरुवारी चांदणी चौक आणि खणभागात रविवारी आठवडी बाजार भरतो. सांगली शहर आणि उपनगरामध्ये महापालिका प्रशासनाने आवश्यक त्या भाजीपाला मार्केटची सोय उपलब्ध न केल्याने आठवडी बाजारादिवशी परगावाहून येणाऱ्या व्यापारी, शेतकरी आणि नागरिकांचीही प्रचंड गैरसोय होती. शनिवारीचा आठवडी बाजार, तर शहरातील हरभटरोड, मारुतीरोड आणि राजवाडा चौक ते बसस्थानक रस्त्यावरच व्यापारी, शेतकरी भाजीपाला, कपडाबाजार, फळांची दुकाने यांसह इतर गृहोपयोगी साहित्याची हजारो दुकाने थाटली जातात. वास्तविक पाहता रस्त्याचा वापर करण्याचा हक्क वाहनचालकांचा आहे. त्यांना मात्र त्यादिवशी या गर्दीतूनच जीव मुठीत धरून वाहने हाकावी लागत आहेत. शनिवारी रस्त्यावर थाटल्या जाणाऱ्या आठवडा बाजारांमुळे वाहनचालक व नागरिकांची परवड सुरू असतानाच सुसज्ज मार्केटअभावी भाजीविक्रेत्यांचाही मोठी गैरसोय होत आहे. बाजार संपला की टाकाऊ भाजी आणि भाजीचे करंडे बाजारपेठातील हमरस्त्यावरच टाकून भाजीविक्रेते काढता पाय घेतात. स्थानिक नागरिकांना दरुगधी आणि त्यापासून होणाऱ्या आजारांना तोंड द्यावे लागते.

गेल्या अनेक वर्षांपासून आठवडा बाजार भरत असतानाही ‘मार्केट’चा प्रश्न मात्र अद्याप मार्गी लागलेला नाही. दिवसेंदिवस वाढती नागरीवस्ती, रुंदावती बाजारपेठेची कक्षा आणि बाजाराची परिस्थिती आहे तीच अशी विदारक परिस्थिती सांगली शहरात आठवडी बाजारांमुळे पाहावयास मिळते. नागरिकांनाही रस्त्यावर बस्थान मांडलेल्या व्यापाऱ्यांकडून बाजार खरेदी करण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे ‘सारेकाही आलबेल आणि नागरिक हतबल’असे चित्र आठवडी बाजारातून पाहावयास मिळते.

हरभटरोडवरून सांगलीवाडी, आष्ट्याकडे प्रवासी जातात. शहर पोलीस चौकातून पलूस, कडेगावसह इस्लामपूरला जाणाऱ्या बसेसह मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक करणारी सर्व वाहने, तीन व सहा आसनी रिक्षा उभ्या असतात. मात्र, बाजारा दिवशी बाजाराला जागाच नसल्याने त्या सर्वांना तेथून वाहने मिळेल त्या जागेत पार्क करावी लागतात. सगळीकडे त्यांचेच बस्तान असते. शेवटी नागरिकांनाच मिळेल तशी वाट काढत ‘बाजार’ करावा लागतो.

चौकट

मूलभूत सुविधासह भाजी मंडई करा

आठवडी बाजारात प्रसाधनगृहांची सुद्धा मारामार आहे. स्वच्छतेच्या नावाने बोंबाबोंब असून स्वच्छता व पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही. या मूलभूत सुविधा आठवडी बाजारातून प्रति विक्रेत्यांकडून पाच ते दहा रुपयांप्रमाणे लाखो रुपयांचा कर गोळा करणाऱ्या महापालिकेने उपलब्ध करून देण्याची गरज आहे. आठवडी बाजार मोकळ्या मैदानात हालविण्यासह सुसज्ज भाजी मंडई शहरासह उपनगरामध्ये विकसित करण्याची भाजीविक्रेत्यांची मागणी आहे.