शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

सांगली, कोल्हापुरात महापुराचा धोका वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 03:48 IST

कोयना धरणाचे सहा दरवाजे दहा फुटांनी उचलले असून, त्यातून ५६ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे सांगलीत कृष्णा पात्राबाहेर पडली असून वारणेलाही पुन्हा पूर आल्याने महापुराचे संकट गडद झाले आहे.

मुंबई/कोल्हापूर : मुंबई कोकणासह दक्षिण महाराष्ट्रात सोमवारी देखील पावसाचे धुमशान सुरूच राहिल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा जोर चांगलाच वाढल्याने मुंंबईत सखल भागात पाणी साठून रस्ते वाहतुकीला ब्रेक लागला होता. कोल्हापुरात पंचगंगा इशारा पातळीकडे सरकू लागली आहे. कोयना धरणाचे सहा दरवाजे दहा फुटांनी उचलले असून, त्यातून ५६ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे सांगलीत कृष्णा पात्राबाहेर पडली असून वारणेलाही पुन्हा पूर आल्याने महापुराचे संकट गडद झाले आहे.कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेली संततधार कायम असून पंचगंगा इशारा पातळीकडे सरकू लागली आहे. जिल्ह्यातील ९५ बंधारे पाण्याखाली आहेत. सांगली जिल्ह्यात धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. कृष्णा व वारणा नद्यांच्या पाणीपातळीत गतीने वाढ होऊन कर्नाळ रस्त्यावर पाणी येत असून नदीकाठी असलेल्या वस्त्यांमधील लोकांचे स्थलांतर सुरू झाले आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात धो-धो पाऊस सुरूच असून, सकाळपर्यंत कोयनेला १२३, नवजा येथे १७४ आणि महाबळेश्वरला १८१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.कोकणात सर्वत्र पाऊस असून रत्नागिरी जिल्ह्यात जोर चांगलाच वाढला आहे. दापोली तसेच चिपळूण तालुक्यात काही ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. संगमेश्वरमधील गडनदी, राजापुरातील अर्जुना, लांजा येथील मुचकुंदी, खेड येथील पिंपळवाडी धरण शंभर टक्के भरले आहेत.मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यात नऊ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. किनवटसह माहूर, हदगाव आणि भोकर तालुक्यात जोर होता़ विदर्भातही अनेक जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. गडचिरोलीत मुसळधार पाऊस कोसळत असल्याने भामरागड, सिरोंचा व अहेरी तालुक्यातील अनेक मार्ग अजूनही बंदच आहेत. मात्र काही नद्यांचा पूर ओसरला आहे.>पूर स्थितीसाठी प्रशासन सज्जपुणे विभागातील कोल्हापूरसह, सातारा, सांगली, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत आहे. गतवर्षी सारखी परिस्थिती निर्माण झाल्यास आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजना केला असून, पुर परिस्थितीसाठी प्रशासन सज्ज असल्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.>पाच तरुणांना वाचविलेशिरोळ (जि. कोल्हापूर): शेतीचा वीज पंप काढत असताना हातातील दोर निसटून गणेशवाडी (ता. शिरोळ) येथील पाच युवक तराफावरून कृष्णा नदीच्या पुरात तब्बल दहा किलोमीटर वाहून गेले. दोन तासांच्या थरारानंतर वजीर रेस्क्यू टीमचे रौफ पटेल, सामाजिक कार्यकर्ते दादेपाशा पटेल, आदींनी या युवकांना गौरवाड येथे सुखरूपपणे बाहेर काढले.

टॅग्स :floodपूर