शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

सांगली, कोल्हापुरात महापुराचा धोका वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 03:48 IST

कोयना धरणाचे सहा दरवाजे दहा फुटांनी उचलले असून, त्यातून ५६ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे सांगलीत कृष्णा पात्राबाहेर पडली असून वारणेलाही पुन्हा पूर आल्याने महापुराचे संकट गडद झाले आहे.

मुंबई/कोल्हापूर : मुंबई कोकणासह दक्षिण महाराष्ट्रात सोमवारी देखील पावसाचे धुमशान सुरूच राहिल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा जोर चांगलाच वाढल्याने मुंंबईत सखल भागात पाणी साठून रस्ते वाहतुकीला ब्रेक लागला होता. कोल्हापुरात पंचगंगा इशारा पातळीकडे सरकू लागली आहे. कोयना धरणाचे सहा दरवाजे दहा फुटांनी उचलले असून, त्यातून ५६ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे सांगलीत कृष्णा पात्राबाहेर पडली असून वारणेलाही पुन्हा पूर आल्याने महापुराचे संकट गडद झाले आहे.कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेली संततधार कायम असून पंचगंगा इशारा पातळीकडे सरकू लागली आहे. जिल्ह्यातील ९५ बंधारे पाण्याखाली आहेत. सांगली जिल्ह्यात धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. कृष्णा व वारणा नद्यांच्या पाणीपातळीत गतीने वाढ होऊन कर्नाळ रस्त्यावर पाणी येत असून नदीकाठी असलेल्या वस्त्यांमधील लोकांचे स्थलांतर सुरू झाले आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात धो-धो पाऊस सुरूच असून, सकाळपर्यंत कोयनेला १२३, नवजा येथे १७४ आणि महाबळेश्वरला १८१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.कोकणात सर्वत्र पाऊस असून रत्नागिरी जिल्ह्यात जोर चांगलाच वाढला आहे. दापोली तसेच चिपळूण तालुक्यात काही ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. संगमेश्वरमधील गडनदी, राजापुरातील अर्जुना, लांजा येथील मुचकुंदी, खेड येथील पिंपळवाडी धरण शंभर टक्के भरले आहेत.मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यात नऊ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. किनवटसह माहूर, हदगाव आणि भोकर तालुक्यात जोर होता़ विदर्भातही अनेक जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. गडचिरोलीत मुसळधार पाऊस कोसळत असल्याने भामरागड, सिरोंचा व अहेरी तालुक्यातील अनेक मार्ग अजूनही बंदच आहेत. मात्र काही नद्यांचा पूर ओसरला आहे.>पूर स्थितीसाठी प्रशासन सज्जपुणे विभागातील कोल्हापूरसह, सातारा, सांगली, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत आहे. गतवर्षी सारखी परिस्थिती निर्माण झाल्यास आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजना केला असून, पुर परिस्थितीसाठी प्रशासन सज्ज असल्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.>पाच तरुणांना वाचविलेशिरोळ (जि. कोल्हापूर): शेतीचा वीज पंप काढत असताना हातातील दोर निसटून गणेशवाडी (ता. शिरोळ) येथील पाच युवक तराफावरून कृष्णा नदीच्या पुरात तब्बल दहा किलोमीटर वाहून गेले. दोन तासांच्या थरारानंतर वजीर रेस्क्यू टीमचे रौफ पटेल, सामाजिक कार्यकर्ते दादेपाशा पटेल, आदींनी या युवकांना गौरवाड येथे सुखरूपपणे बाहेर काढले.

टॅग्स :floodपूर