शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सांगली, कोल्हापुरात महापुराचा धोका वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 03:48 IST

कोयना धरणाचे सहा दरवाजे दहा फुटांनी उचलले असून, त्यातून ५६ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे सांगलीत कृष्णा पात्राबाहेर पडली असून वारणेलाही पुन्हा पूर आल्याने महापुराचे संकट गडद झाले आहे.

मुंबई/कोल्हापूर : मुंबई कोकणासह दक्षिण महाराष्ट्रात सोमवारी देखील पावसाचे धुमशान सुरूच राहिल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा जोर चांगलाच वाढल्याने मुंंबईत सखल भागात पाणी साठून रस्ते वाहतुकीला ब्रेक लागला होता. कोल्हापुरात पंचगंगा इशारा पातळीकडे सरकू लागली आहे. कोयना धरणाचे सहा दरवाजे दहा फुटांनी उचलले असून, त्यातून ५६ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे सांगलीत कृष्णा पात्राबाहेर पडली असून वारणेलाही पुन्हा पूर आल्याने महापुराचे संकट गडद झाले आहे.कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेली संततधार कायम असून पंचगंगा इशारा पातळीकडे सरकू लागली आहे. जिल्ह्यातील ९५ बंधारे पाण्याखाली आहेत. सांगली जिल्ह्यात धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. कृष्णा व वारणा नद्यांच्या पाणीपातळीत गतीने वाढ होऊन कर्नाळ रस्त्यावर पाणी येत असून नदीकाठी असलेल्या वस्त्यांमधील लोकांचे स्थलांतर सुरू झाले आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात धो-धो पाऊस सुरूच असून, सकाळपर्यंत कोयनेला १२३, नवजा येथे १७४ आणि महाबळेश्वरला १८१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.कोकणात सर्वत्र पाऊस असून रत्नागिरी जिल्ह्यात जोर चांगलाच वाढला आहे. दापोली तसेच चिपळूण तालुक्यात काही ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. संगमेश्वरमधील गडनदी, राजापुरातील अर्जुना, लांजा येथील मुचकुंदी, खेड येथील पिंपळवाडी धरण शंभर टक्के भरले आहेत.मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यात नऊ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. किनवटसह माहूर, हदगाव आणि भोकर तालुक्यात जोर होता़ विदर्भातही अनेक जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. गडचिरोलीत मुसळधार पाऊस कोसळत असल्याने भामरागड, सिरोंचा व अहेरी तालुक्यातील अनेक मार्ग अजूनही बंदच आहेत. मात्र काही नद्यांचा पूर ओसरला आहे.>पूर स्थितीसाठी प्रशासन सज्जपुणे विभागातील कोल्हापूरसह, सातारा, सांगली, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत आहे. गतवर्षी सारखी परिस्थिती निर्माण झाल्यास आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजना केला असून, पुर परिस्थितीसाठी प्रशासन सज्ज असल्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.>पाच तरुणांना वाचविलेशिरोळ (जि. कोल्हापूर): शेतीचा वीज पंप काढत असताना हातातील दोर निसटून गणेशवाडी (ता. शिरोळ) येथील पाच युवक तराफावरून कृष्णा नदीच्या पुरात तब्बल दहा किलोमीटर वाहून गेले. दोन तासांच्या थरारानंतर वजीर रेस्क्यू टीमचे रौफ पटेल, सामाजिक कार्यकर्ते दादेपाशा पटेल, आदींनी या युवकांना गौरवाड येथे सुखरूपपणे बाहेर काढले.

टॅग्स :floodपूर