शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांमधील क्रांतीची उर्मी हरविली

By admin | Updated: August 8, 2016 23:39 IST

माधवराव माने : सेवावृत्तीने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींचीही समाजास गरज

आॅगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने विविध उपक्रम मंगळवारी आयोजित करण्यात आले आहेत. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत तत्कालीन दक्षिण सातारा जिल्ह्यातील योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यापासून अनेक क्रांतिकारकांनी उभारलेला लढा संपूर्ण देशभर गाजला आणि नोंदला गेला. अशी परंपरा असलेल्या सांगली जिल्ह्यात आजही स्वातंत्र्य चळवळीचे काही साक्षीदार हयात आहेत. सांगली जिल्हा स्वातंत्र्यसैनिक सन्मान समितीचे अध्यक्ष माधवराव माने हे त्यापैकी एक. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळाचा अनुभव घेत त्यांनी संघर्षमय प्रवास नोंदविला. आॅगस्ट क्रांती दिन साजरा होत असताना समाजातील सध्याचे प्रश्न, लोकप्रतिनिधी, सरकार आणि नवी पिढी याबद्दल त्यांच्याशी साधलेला हा थेट संवाद...प्रश्न : तुमच्या काळात तरुणांमध्ये असलेली स्वातंत्र्याची, क्रांतीची उर्मी नव्या पिढीत हरविली आहे, असे वाटते का?उत्तर : निश्चितच. त्यावेळी तरुणांमध्ये देशप्रेम, समता, बंधुता अशा गोष्टींविषयी जागृती करणारे व सेवाभावी वृत्तीने पिढी घडविणारे लोक होते. आता सेवावृत्तीने काम करणारे लोक दिसत नाहीत. त्यातच तरुणांना तशाप्रकारची ऊर्जा देण्याचे कामही होत नाही. त्यामुळेच क्रांतीसाठीची त्यावेळची उर्मी आता नव्या पिढीत दिसत नाही. यात तरुणांचा दोष नाही. त्यांच्यात या गोष्टी रुजविण्यासाठीची यंत्रणाच नाही. सरकारी पातळीवर, विशेषत: शिक्षण व्यवस्थेतून या गोष्टी पाझरत नाहीत. त्यामुळेच सामाजिक प्रश्नावर काहीतरी बदल घडवू पाहण्याची उर्मी आज असायला हवी, ती दिसत नाही. त्यामुळे क्रांतिकारकांचा, देशाचा, समाजाचा इतिहास चांगल्या पद्धतीने या पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. प्रश्न : याचा काही अनुभव तुम्ही घेतला आहे का?उत्तर : मी काही दिवसांपूर्वी एका शाळेत गेलो होतो. त्या शाळेतील मुलांना मी एक प्रश्न विचारला. विश्रामबाग चौकात एका बाजूला उभारलेला पुतळा आपण पाहिला आहे का? त्याच मार्गावरून येणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी होकारार्थी मान हलविली. तेथे पुतळा आहे हे त्यांना माहीत होते, मात्र तो कोणाचा आहे?, असा प्रश्न विचारल्यानंतर मात्र एकाही मुलाला त्याचे उत्तर देता आले नाही. मला या गोष्टीचे खूप वाईट वाटले. अर्थात मुलांचा यात दोष नाही. इतिहास आणि त्याअनुषंगाने नोंदल्या जाणाऱ्या गोष्टी यांचा परिचय त्यांना कुणीही करून देत नाही. त्यामुळे शिक्षण व्यवस्थेतच या गोष्टी हव्यात. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिसरकार चळवळीचा डंका देशभर वाजला. ही चळवळ आंतरराष्ट्रीय पातळीवरही चर्चेला गेली. हा इतिहास नव्या पिढीला माहिती नको का? ही अभिमानाची गोष्ट नव्या पिढीने पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविली पाहिजे. प्रश्न : राज्यातील, क्रेंद्रातील कोणतेही सरकार, राजकीय नेते यांची वाटचाल तुम्हाला कशी वाटते?उत्तर : खूप वेदना होतात हे सर्व पाहून. शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. पेन्शनर्स अडचणीत आहेत. कामगारवर्ग तसेच सर्वसामान्य लोकांचे प्रश्न कायम आहेत. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. स्वातंत्र्यसैनिकांकडे लक्ष दिले जात नाही. त्यांचेही प्रश्न प्रलंबित आहेत. अशा या सर्व प्रश्नांच्या गर्दीत आमदार, खासदारांनी स्वत:च्या मानधन वाढीचा निर्णय घेणे, हे आपल्यासाठी धक्कादायक आहे. लोकप्रतिनिधी सेवक आहेत, हुकूमशहा नव्हेत. समाजाप्रती सेवक म्हणून कार्यरत राहणारे नेते समाजात कुठे आहेत? त्यांना प्रश्नांची खरोखरीच जाण असती, तर त्यांनी स्वत:च्या मानधन वाढीपेक्षा अडचणीतील समाजघटकांचे प्रश्न सोडविण्याची मागणी केली असती. असा प्रयत्न एकानेही केल्याचे दिसून आले नाही. प्रश्न : स्वातंत्र्यसैनिक म्हणून तुम्हाला समाजात कोणत्या गोष्टींची अपेक्षा आहे?उत्तर : समाजातील प्रत्येक घटकाकडे प्रामाणिकपणे लक्ष देणारे व त्यांचे प्रश्न सोडविणारे सरकार हवे. शिक्षण पद्धतीत सुधारणा आवश्यक आहे. इतिहास पोहोचविताना देशप्रेम, सामाजिक भान, त्यासाठीच्या योगदानाची मानसिकता निर्माण करणारी शिक्षणपद्धती हवी. या सर्व गोष्टी घडाव्यात म्हणून सेवक म्हणून कार्यरत राहण्याची तयारी असलेले लोकप्रतिनिधी तयार झाले पाहिजेत. लोकांनी अशाच प्रतिनिधींना पाठबळ दिले पाहिजे. - अविनाश कोळी, सांगली