शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

गरजेइतके पाणी मिळाल्याने ताकारी योजना पूर्ववत

By admin | Updated: April 20, 2016 00:32 IST

अडविलेले पाणी सोडले : टेंभू योजनेच्या अधिकाऱ्यांकडून योजनेच्या प्रश्नाबाबत उडवाउडवीची उत्तरे--लोकमतचा दणका

कडेगाव : ताकारी योजनेच्या साटपेवाडी बंधाऱ्यात गरजेइतकी पाणी पातळी मिळाल्याने मंगळवारी ही योजना पूर्ववत सुरू झाली. टेंभू योजनेच्या टेंभू (ता. कऱ्हाड) येथील बंधाऱ्यात पाणी अडविल्यामुळे ताकारी योजनेच्या साटपेवाडी बंधाऱ्यातील पाणीपातळी खालावली होती. त्यामुळे ताकारी योजना बंद पडली होती. याबाबत टेंभू योजनेच्या अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु टेंभूच्या बंधाऱ्यातून पुढे पाणी सोडले. त्यामुळे सकाळी योजनेचे दहा पंप सुरू झाले.टेंभू योजनेच्या अधिकाऱ्यांच्या गैरव्यवस्थापनामुळे तसेच बेजबाबदार कामामुळे सलग तीन आवर्तनात ही ताकारी योजना बंद पडली. सांगली पाटबंधारे विभागाकडे ताकारी, टेंभू योजनेसह नदीवरील सिंचन व्यवस्थापनाची सर्वस्वी जबाबदारी आहे. या विभागाचे कार्यकारी अभियंता ना. नु. सूर्यवंशी यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांच्या सूचनांप्रमाणे ताकारी तसेच टेंभू योजनेच्या अधिकाऱ्यांनी कार्यवाही करणे अपेक्षित असताना, टेंभू योजनेचे संबंधित अधिकारी बेजबाबदारपणे काम करीत गरजेपेक्षा जादा पाणी अडवून ठेवतात. त्यामुळे ताकारी योजना तीनवेळा बंद पडली. याबाबतचे वृत्त मंगळवारी ‘लोकमत’ने प्रसिध्द केले आणि टेंभूचे अधिकारी खडबडून जागे झाले. अडवून ठेवलेले पाणी पुढे सोडले. त्यामुळे ताकारी योजनेसाठी आवश्यक असणारी ५४० ते ५४१ मीटर इतकी पाणी पातळी मिळाली. त्यानंतर ताकारी योजनेचे १० पंप मंगळवारी सकाळी सुरू झाले. ताकारी योजनेचे आवर्तन सुरू होऊ महिना झाला होता. योजनेचे पाणी १०० किलोमीटरवर तासगाव तालुक्यात विसापूरजवळ गेले होते. आता कोरडा पडलेला मुख्य कालवा भरून १०० किलोमीटरपर्यंत पाणी जाण्यास दोन दिवस लागतील. या दोन दिवसातील पाण्याचा अपव्यय अणि वीज बिलाचा भुर्दंड ताकारी योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनाच सोसावा लागणार आहे. (वार्ताहर)६० लाखाचा भुर्दंडटेंभू बंधाऱ्यात पाणी अडविल्यामुळे ताकारी योजना बंद, असे प्रकार आजपर्यंत तीनवेळा घडले. बंद झालेली योजना सुरू करून पुन्हा पाणी तासगाव तालुक्यात पोहोचण्यासाठी दोन दिवस लागतात. या दोन दिवसात अंदाजे २० लाख रुपये वीज बिल येते. अशाप्रकारे तीनवेळा ताकारी योजना बंद झाली. याचा ६० लाख रूपये भुर्दंड ताकारी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनाच सोसावा लागणार आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या गैरव्यवस्थापनेचा झटका शेतकऱ्यांना बसत आहे.चौकशी गरजेचीटेंभू बंधाऱ्यात पाणी अडवल्यामुळे ताकारी योजना बंद पडल्याबाबतचे वृत्त मंगळवारी ‘लोकमत’ने प्रसिध्द केल्यामुळे संबंधित अधिकारी खडबडून जागे झाले आणि अडवलेले पाणी सोडले. कोयनेतून पाणी कमी सोडल्यामुळे टेंभू बंधाऱ्यात पाणी अडवले होते, अशी उडवाउडवीची उत्तरे संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. परंतु प्रत्यक्षात वस्तुस्थिती काय होती, याची चौकशी होणे गरजेचे आहे.