शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मार्केट यार्ड बंदमुळे किरकोळ किराणा व्यापाऱ्यांचे पुन्हा हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यात लागू असलेल्या कडक लॉकडाऊनमध्ये शिथिलता देत मार्केट यार्डातील होलसेल किराणा व्यापाऱ्यांना देण्यात आलेली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : जिल्ह्यात लागू असलेल्या कडक लॉकडाऊनमध्ये शिथिलता देत मार्केट यार्डातील होलसेल किराणा व्यापाऱ्यांना देण्यात आलेली सूट रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे रविवारपासून पुन्हा एकदा मार्केट यार्डातील व्यवहार ठप्प झाले असून, आपल्या गरजेनुसार दर दोन-तीन दिवसाला सामान विकत घेऊन त्याची विक्री करणाऱ्या किरकोळ व्यापाऱ्यांना त्रास सहन करावा लागणार आहे, तर रोजंदारीवर काम करून दररोज थोडक्या पैशातून किराणा सामान आणून घर चालविणाऱ्या सर्वसामान्यांचीही आबाळ हाेणार आहे.

जिल्ह्यातील लॉकडाऊन नियमावलीत बदल करताना प्रशासनाने बुधवारपासून सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत मार्केट यार्डातील होलसेल किराणा माल व्यापाऱ्यांना किरकोळ व्यापाऱ्यांना माल विक्रीस परवानगी दिली होती. मात्र, दुकानदारांसह सर्वसामान्यांनीही मार्केट यार्डात मोठी गर्दी केल्याचे सलग तीन दिवस चित्र होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने गर्दी व कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी रविवारपासून घाऊक व्यापार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेता, कडक निर्बंध अजूनही काही दिवस लागूच असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे किराणा, भाजीपाला, दूध आदी आवश्यक वस्तूंच्या विक्रीसाठी वेळ वाढवून देण्याची मागणी होत आहे.

प्रशासनाच्या निर्णयानुसार सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत किराणा दुकानदार ग्राहकांना घरपोच सेवा देऊ शकतात. मात्र, मार्केट यार्डातील होलसेल व्यापारच बंद झाल्याने आता या दुकानदारांकडेही मालाची उपलब्धता होणार नाही. सध्या उपलब्ध असलेला माल संपल्यानंतर ग्राहकांना माल पुरविणे शक्य होणार नाही. त्यामुळे सात ते अकरा अशी वेळ न देता किमात पाचपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी देण्याची मागणी होत आहे.

चौकट

वाढत्या गर्दीमुळे घेतला गेला निर्णय

मार्केट यार्डातील फक्त होलसेल किराणामालाच्या व्यवहारांना परवानगी देण्यात आल्यानंतर गर्दीचा अक्षरश: महापूर अनुभवास आला. पोलीस, महापालिकेच्या पथकाने याचे नियोजन करूनही संपूर्ण मार्केट यार्ड गर्दीने भरून गेले होते. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका अधिकच वाढला होता. त्यामुळेच प्रशासनाने तातडीने सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. किरकोळ व्यापाऱ्यांपेक्षा सर्वसामान्य नागरिकच होलसेल दुकानात खरेदीसाठी गर्दी करत असल्याचे दिसून आल्याने गर्दी आटोक्यात असती तर सर्व व्यवहार सुरळीत राहण्यास अडचण नव्हती.

कोट

होलसेल व्यवहार बंद झाल्याने शहरातील गल्लीबोळातील सेवा देणाऱ्या दुकानदारांना माल मिळणार नाही. गेल्या ५० दिवसांपासून व्यवहार बंद असल्याने अगोदरच अस्वस्थता आहे. रोजंदारीवर असणाऱ्यांनाही अडचण येणार आहे. त्यामुळे वेळेचे नियोजन करून परवानगी द्यावी.

अरुण दांडेकर, अध्यक्ष, किरकोळ किराणा भुसार विक्रेता संघ

कोट

प्रशासनाने अगोदरच वेळ कमी दिल्याने जिल्हाभरातून आलेल्या विक्रेत्यांना खरेदी करता येत नव्हती. आता पूर्ण व्यवहार बंद ठेवल्याने किरकोळ व्यापाऱ्यांसह घाऊक व्यापाऱ्यांनाही अडचणी येणार आहेत. त्यामुळे प्रशासनाने योग्य तो सर्वसमावेशक निर्णय घेऊन या घटकावरील अन्याय दूर करावा.

बाळासाहेब पाटील, होलसेल व्यापारी, सांगली

कोट

मार्केट यार्ड बंद झाल्याने लहान व्यापाऱ्यांचे व्यवहार पुन्हा थांबणार आहेत. उपलब्ध असलेला माल संपल्यानंतर त्यानंतर ग्राहकांना सेवा देता येणार नाही. घाऊक व्यापाऱ्यांनीही देशभरातून माल मागविलेला आहे. तो आता गुदामातच राहणार आहे.

रोहित हिडदुगी, होलसेल व्यापारी, सांगली