शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
3
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
4
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
5
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
6
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
7
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
8
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
9
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
10
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
11
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
13
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
14
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
15
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
16
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
17
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
18
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
19
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
20
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली

‘ज्ञानगंगा घरोघरी’चा संकल्प अपूर्णच

By admin | Updated: March 30, 2015 00:15 IST

माणिकराव साळुंखे यांची खंत : ज्ञानाच्या प्रसारासाठी प्रयत्न करणार

सांगली : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे ‘ज्ञानगंगा घरोघरी’ हे ब्रीदवाक्य असून, ते पूर्ण करण्यास आम्ही कमी पडलो आहोत. भविष्यात सामान्यांच्या घरात शिक्षणाची ज्ञानगंगा नेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार असल्याचे मत कुलगुरू डॉ. माणिक साळुंखे यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केले.डॉ. साळुंखे म्हणाले, प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील यांनी लोकविद्यापीठाची संकल्पना मांडली होती. त्यांचेच कार्य मुक्त विद्यापीठ पुढे नेत आहे. सध्या महाराष्ट्रातील सात लाख विद्यार्थी मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत. येथे शिकणारे सर्वजण नोकरी-व्यवसाय सांभाळून शिक्षण घेतात. मागील वर्षी २८० विद्यार्थ्यांनी बी. एस्सी. ची पदवी घेतली आहे. महत्त्वाचे म्हणजे या सर्वच विद्यार्थ्यांना चांगल्या कंपनीत नोकऱ्या लागल्या आहेत. कौशल्य विकासाला भविष्यकाळात अत्यंत महत्त्व येणार आहे. साहजिकच विद्यापीठाच्या माध्यमातून ‘स्किल डेव्हलपमेंट’ या विषयाकडे लक्ष देण्यात येणार आहे. आजकाल इतर विद्यापीठातून जे शिक्षण मिळते त्यामुळे केवळ पदव्या प्राप्त होतात. परंतु त्यातील बहुतांश ज्ञानाचा जीवनात वावरताना काहीही उपयोग होत नाही. शिक्षण हे सामान्यांच्या आवाक्यातील असले पाहिजे. मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची कवाडे खुली करुन दिली आहेत. त्याचा लाभ आज असंख्य विद्यार्थी घेत आहेत. स्पर्धा परीक्षा देणारे बहुतांश विद्यार्थी हे मुक्त विद्यापीठाला नेमलेल्या पुस्तकांचा अभ्यास करीत आहेत. (प्रतिनिधी)