शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

येळावीत आरक्षणामुळे मातब्बरांची नाराजी

By admin | Updated: January 19, 2017 00:26 IST

निवडणुकीचे वातावरण तापू लागले : बंडखोरीच्या शक्यतेने पक्षश्रेष्ठी अस्वस्थ, बहुरंगी लढत होणार

मोहन बाबर ल्ल येळावीयेळावी जिल्हा परिषद मतदार संघात ओबीसी पुरुष आरक्षण झाल्याने प्रमुख मातब्बर नाराज झाले आहेत. आरक्षणाअगोदर सर्व गटाच्या कार्यकर्त्यांनी चांगलेच रान उठविले होते. राष्ट्रवादीविरोधात काँग्रेस अशी होणारी निवडणूक प्रथमच बहुरंगी होणार आहे. दोन्ही काँग्रेसबरोबर भाजप-शिवसेनाही रिंगणात उतरली आहे, तर स्थानिक रयत पॅनेलनेही शड्डू ठोकला आहे. परंतु गटात राष्ट्रवादी, भाजप व काँग्रेसमध्ये होणाऱ्या बंडखोरीच्या राजकीय भूकंपाने मात्र जि. प. इच्छुक उमेदवारांबरोबर पक्षश्रेष्ठींचीही झोप उडाली आहे.मागील जि. प. निवडणुकीत आर. आर. पाटील व खासदार संजय पाटील हे एकत्र होते. तडजोडीच्या अनेक फेऱ्यानंतर या मतदारसंघाची जबाबदारी आर. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखालील सध्याच्या विद्यमान अध्यक्षा स्नेहल पाटील यांच्यावर टाकण्यात आली. अर्ज भरण्याच्या शेवटच्यादिवशी अर्ज भरण्यात आला. आबा-काका गट एकत्र असतानाही अवघ्या ३११७ मतांनी काँग्रेसविरोधात विजयी झाल्या. तुल्यबळ प्रतिस्पर्धी नसतानाही येळावी, जुळेवाडीपुरत्या मर्यादित असणाऱ्या काँग्रेसने जबरदस्त झुंज दिली. तरीही राष्ट्रवादीने जि. प. बरोबर पंचायत समितीच्या तुरचीच्या हर्षदा पाटील व नागावचे शिवाजीराव पाटील या दोन्ही ठिकाणी बाजी मारली. सध्या या मतदार संघात परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आबा, काका गट वेगवेगळे लढत असून, संजय पाटील भाजपमधून खासदार झाले आहेत. खासदारकीनंतरच्या राजकीय वाटचालीमध्ये त्यांनी राष्ट्रवादी व काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते भाजपमय केले आहेत. तासगाव नगरपालिका व तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींवर सत्ता स्थापन केली आहे. मात्र त्यांना येळावी गणातून फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. येळावी गणात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची फळी भक्कम आहे. आरक्षणाअगोदर भाजपच्या येळावीतील अनेक शिलेदारांनी जि. प. साठी शड्डू ठोकला होता. त्यातच गावात आलेली अध्यक्षपदाची लाल दिव्याची गाडी सर्व गटाच्या नेत्यांना खुणावत होती.राष्ट्रवादीचा विचार करता या गणातून तुरचीचे संजय पाटील, संदीप पाटील, येळावीतून बापू माळी, शांताराम गावडे, वासुंबेतून बाळासाहेब एडके, गुंडूभाऊ एडके इच्छुक आहेत, तर भाजप व काँग्रेसमधील वातावरण पूर्णपणे शांत आहे. जि. प. गणाचा विचार करता, भाजपमधून येळावी गावचे विद्यमान सरपंच विश्वनाथ पांढरे, तुरचीचे आबास तांदळे, काँग्रेसकडून ग्रामपंचायत सदस्य सचिन गावडे इच्छुक आहेत, मात्र भाजप गटात तगडा उमेदवार नसल्याने विरोधी गटातील बंडखोर उमेदवारांवर भिस्त आहे. काँग्रेस कार्यकर्ते मात्र राष्ट्रवादीबरोबर किमान या मतदार संघापुरती आघाडी करावी, अशी अपेक्षा व्यक्त करीत आहेत. जि. प. मतदार संघाचा विचार करता, राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची भक्कम फळी आहे, परंतु आबांच्यानंतर आबा घराण्याबरोबर मोजक्याच कार्यकर्त्यांचे सूत जुळले आहे. याबरोबरच गावात जि. प. ची उमेदवारी न मिळाल्यास सर्व बहुजन समाजातील कार्यकर्ते एकत्र येऊन उमेदवार देऊन मोठा भूकंप करण्याच्या प्रयत्नात आहेत. असा प्रयोग याअगोदर येळावी ग्रामपंचायतीमध्ये रयत पॅनेलच्या रूपाने झाला होता. याचा मोठ्ठा तोटा प्रमुख गटांना होऊन भाजपचा फायदा झाला होता. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. राष्ट्रवादीत जि. प. साठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. खासदार संजय पाटील यांनी टीका केल्याने जयंत पाटील यांनी तालुक्यात चांगलेच लक्ष घातले आहे. जि. प. अध्यक्षांनीही पक्षातील बंडखोरी रोखण्यासाठी व विरोधकांना शह देण्यासाठी विधानपरिषद अध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर, आ. जयंत पाटील, आ. सुमनताई पाटील यांच्या उपस्थित पक्षाचा मेळावा घेतला. दुसरीकडे भाजप व काँग्रेसमध्ये मात्र येळावी पं. स. गण वगळता, वादळापूर्वीची शांतता असल्याचे बोलले जात आहे. भाजपची पूर्ण मदार आयात उमेदवारावर असल्याचे ज्येष्ठांचे मत आहे.