शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
5
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
6
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
7
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
8
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
9
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
10
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
11
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
12
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
13
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
14
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
15
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
16
'मदर्स डे'निमित्त मराठी कलाकारांनी व्यक्त केलं आईवरचं प्रेम, शेअर केले खास फोटो
17
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
18
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
19
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
20
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक

येळावीत आरक्षणामुळे मातब्बरांची नाराजी

By admin | Updated: January 19, 2017 00:26 IST

निवडणुकीचे वातावरण तापू लागले : बंडखोरीच्या शक्यतेने पक्षश्रेष्ठी अस्वस्थ, बहुरंगी लढत होणार

मोहन बाबर ल्ल येळावीयेळावी जिल्हा परिषद मतदार संघात ओबीसी पुरुष आरक्षण झाल्याने प्रमुख मातब्बर नाराज झाले आहेत. आरक्षणाअगोदर सर्व गटाच्या कार्यकर्त्यांनी चांगलेच रान उठविले होते. राष्ट्रवादीविरोधात काँग्रेस अशी होणारी निवडणूक प्रथमच बहुरंगी होणार आहे. दोन्ही काँग्रेसबरोबर भाजप-शिवसेनाही रिंगणात उतरली आहे, तर स्थानिक रयत पॅनेलनेही शड्डू ठोकला आहे. परंतु गटात राष्ट्रवादी, भाजप व काँग्रेसमध्ये होणाऱ्या बंडखोरीच्या राजकीय भूकंपाने मात्र जि. प. इच्छुक उमेदवारांबरोबर पक्षश्रेष्ठींचीही झोप उडाली आहे.मागील जि. प. निवडणुकीत आर. आर. पाटील व खासदार संजय पाटील हे एकत्र होते. तडजोडीच्या अनेक फेऱ्यानंतर या मतदारसंघाची जबाबदारी आर. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखालील सध्याच्या विद्यमान अध्यक्षा स्नेहल पाटील यांच्यावर टाकण्यात आली. अर्ज भरण्याच्या शेवटच्यादिवशी अर्ज भरण्यात आला. आबा-काका गट एकत्र असतानाही अवघ्या ३११७ मतांनी काँग्रेसविरोधात विजयी झाल्या. तुल्यबळ प्रतिस्पर्धी नसतानाही येळावी, जुळेवाडीपुरत्या मर्यादित असणाऱ्या काँग्रेसने जबरदस्त झुंज दिली. तरीही राष्ट्रवादीने जि. प. बरोबर पंचायत समितीच्या तुरचीच्या हर्षदा पाटील व नागावचे शिवाजीराव पाटील या दोन्ही ठिकाणी बाजी मारली. सध्या या मतदार संघात परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आबा, काका गट वेगवेगळे लढत असून, संजय पाटील भाजपमधून खासदार झाले आहेत. खासदारकीनंतरच्या राजकीय वाटचालीमध्ये त्यांनी राष्ट्रवादी व काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते भाजपमय केले आहेत. तासगाव नगरपालिका व तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींवर सत्ता स्थापन केली आहे. मात्र त्यांना येळावी गणातून फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. येळावी गणात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची फळी भक्कम आहे. आरक्षणाअगोदर भाजपच्या येळावीतील अनेक शिलेदारांनी जि. प. साठी शड्डू ठोकला होता. त्यातच गावात आलेली अध्यक्षपदाची लाल दिव्याची गाडी सर्व गटाच्या नेत्यांना खुणावत होती.राष्ट्रवादीचा विचार करता या गणातून तुरचीचे संजय पाटील, संदीप पाटील, येळावीतून बापू माळी, शांताराम गावडे, वासुंबेतून बाळासाहेब एडके, गुंडूभाऊ एडके इच्छुक आहेत, तर भाजप व काँग्रेसमधील वातावरण पूर्णपणे शांत आहे. जि. प. गणाचा विचार करता, भाजपमधून येळावी गावचे विद्यमान सरपंच विश्वनाथ पांढरे, तुरचीचे आबास तांदळे, काँग्रेसकडून ग्रामपंचायत सदस्य सचिन गावडे इच्छुक आहेत, मात्र भाजप गटात तगडा उमेदवार नसल्याने विरोधी गटातील बंडखोर उमेदवारांवर भिस्त आहे. काँग्रेस कार्यकर्ते मात्र राष्ट्रवादीबरोबर किमान या मतदार संघापुरती आघाडी करावी, अशी अपेक्षा व्यक्त करीत आहेत. जि. प. मतदार संघाचा विचार करता, राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची भक्कम फळी आहे, परंतु आबांच्यानंतर आबा घराण्याबरोबर मोजक्याच कार्यकर्त्यांचे सूत जुळले आहे. याबरोबरच गावात जि. प. ची उमेदवारी न मिळाल्यास सर्व बहुजन समाजातील कार्यकर्ते एकत्र येऊन उमेदवार देऊन मोठा भूकंप करण्याच्या प्रयत्नात आहेत. असा प्रयोग याअगोदर येळावी ग्रामपंचायतीमध्ये रयत पॅनेलच्या रूपाने झाला होता. याचा मोठ्ठा तोटा प्रमुख गटांना होऊन भाजपचा फायदा झाला होता. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. राष्ट्रवादीत जि. प. साठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. खासदार संजय पाटील यांनी टीका केल्याने जयंत पाटील यांनी तालुक्यात चांगलेच लक्ष घातले आहे. जि. प. अध्यक्षांनीही पक्षातील बंडखोरी रोखण्यासाठी व विरोधकांना शह देण्यासाठी विधानपरिषद अध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर, आ. जयंत पाटील, आ. सुमनताई पाटील यांच्या उपस्थित पक्षाचा मेळावा घेतला. दुसरीकडे भाजप व काँग्रेसमध्ये मात्र येळावी पं. स. गण वगळता, वादळापूर्वीची शांतता असल्याचे बोलले जात आहे. भाजपची पूर्ण मदार आयात उमेदवारावर असल्याचे ज्येष्ठांचे मत आहे.