शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचे गुऱ्हाळ संपेना

By admin | Updated: January 28, 2016 00:29 IST

राष्ट्रवादी नेत्यांच्या केवळ बैठकाच : जिल्हा परिषदेतील इच्छुक सदस्यांची फरफट

सांगली : जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि चार विषय समिती सभापतींचे बुधवारी राजीनामे मंजूर करण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार सर्वच पदाधिकारी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांच्या निरोपाच्या प्रतीक्षेत होते. प्रत्यक्षात सायंकाळपर्यंत शिंदे यांच्याकडून निरोपच न आल्यामुळे सर्वच पदाधिकारी शासकीय गाड्या घेऊन गावाकडे रवाना झाले. यामुळे इच्छुक सदस्यांची मात्र निराशा झाली आहे.जिल्हा परिषद उपाध्यक्ष लिंबाजी पाटील, बांधकाम व आरोग्य सभापती गजानन कोठावळे, कृषी व पशुसंवर्धन सभापती मनीषा पाटील, समाजकल्याण समिती सभापती उज्वला लांडगे, महिला व बालकल्याण समिती सभापती पपाली कचरे यांचे राजीनामे घेऊन पंधरा दिवस झाले आहेत. या सर्वांचे राजीनामे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांच्याकडे आहेत. राजीनामे मंजुरीनंतर लगेच नवीन पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. त्यापूर्वी उपाध्यक्ष व चार विषय समिती सभापतींची नावे निश्चित करण्याची गरज आहे. परंतु, पाच पदाधिकाऱ्यांच्या नावावर राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप नेत्यांचे एकमत होत नाही. राष्ट्रवादीमध्ये सध्या कार्यरत असणाऱ्या सदस्यांना पदे देण्यास काही भाजप व शिवसेना नेत्यांचा विरोध आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीतील दुसऱ्या फळीतील नेत्यांनी कुणालाही पदाधिकारी करा, पणे ते राष्ट्रवादीचेच असले पाहिजेत, अशी भूमिका घेतली आहे. विशेषत: हा वाद खानापूर, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ आणि तासगाव तालुक्यात टोकाचा चालू आहे. स्थानिक कार्यकर्ते आणि नेत्यांचा वाद मिटविण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील आणि राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांनी अनेक बैठका घेतल्या आहेत. बुधवारी पाच पदाधिकाऱ्यांचे राजीनामे मंजूर करण्यासाठी बैठक बोलाविली होती. त्यानुसार उपाध्यक्ष पाटील, सभापती कोठावळे, मनीषा पाटील, लांडगे, कचरे उपस्थित होते. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष शिंदे राजीनामे मंजूर झाल्याचा कधी आदेश देतात याकडे त्यांचे लक्ष लागून होते. अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर यांच्या दालनात पदाधिकाऱ्यांच्या दोनवेळा बैठका झाल्या. पण, सायंकाळी ६ वाजेपर्यंत कुणाचाही निरोप न आल्यामुळे शासकीय गाड्या घेऊन पदाधिकारी पुन्हा गावाकडे रवाना झाले. विलासराव शिंदे यांच्या मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी कोणतेच उत्तर दिले नाही. यामुळे पदाधिकाऱ्यांचे राजीनामे मंजुरीचे गुऱ्हाळ महिन्याभरापासून चालू आहे. (प्रतिनिधी)काँग्रेसबरोबरही चर्चाराष्ट्रवादीमधील काही नेते भाजप व शिवसेनेमध्ये गेल्यामुळे त्यांचे आणि राष्ट्रवादी नेत्यांचे सूर जुळत नाहीत. राष्ट्रवादीने पदाधिकारी बदलाची शिवसेना व भाजप नेत्यांबरोबरच आता काँग्रेसच्या नेत्यांबरोबरही चर्चा सुरु केल्याची जिल्हा परिषदेत चर्चा चालू आहे. परंतु, काँग्रेस जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी यापूर्वीच सत्तेत सहभागी होणार नसल्याचे जाहीर केले आहे. यामुळे ते राष्ट्रवादी नेत्यांच्या चर्चेला प्रतिसाद देतील का, हे आगामी काळातच निश्चित होणार आहे.झेडपीची सर्वसाधारण सभा १२ फेब्रुवारीलाजिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचा प्रश्न कधी संपायचा तो संपू दे, असे म्हणत अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर यांनी सर्वसाधारण सभा दि. १२ फेब्रुवारी रोजी आयोजित केली आहे. अनेक विकास कामांना मंजुरी देण्याचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे सभा आयोजित केली आहे. असे असले तरी सभा घेण्याच्या मुद्द्यावरून पदाधिकाऱ्यांचे राजीनामे पुन्हा लांबणीवर जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही.काही सदस्य बंडाच्या पवित्र्यातजिल्हा परिषद पदाधिकारी बदलामध्ये काही सदस्यांना शिवसेना व भाजपमध्ये असल्याचे कारण पुढे करून त्यांना डावलण्यात येण्याची शक्यता आहे. नेत्यांमध्ये तशी चर्चाही झाल्यामुळे या नाराज सदस्यांनी भाजप व शिवसेना नेत्यांच्या मदतीने निवडीवेळी बंड करण्याचा पवित्रा घेतल्याची चर्चा आहे. या संभाव्य बंडाचा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी धसका घेतल्याची जि. प.मध्ये चर्चा सुरु आहे.