शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याची पुन्हा डागडुजी- : जयंत पाटील यांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 00:08 IST

हातकणंगले लोकसभा मतदार संघातील खासदार राजू शेट्टी आणि धैर्यशील माने यांच्यात झालेल्या चुरशीच्या लढतीची चर्चा रंगू लागली आहे. माने यांनी दिलेल्या झुंजीची धास्ती वाळवा-शिराळ्यात भक्कम असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली

ठळक मुद्देमतदार संघातील बुथ कमिट्या सक्षम करण्यावर भर

अशोक पाटील ।इस्लामपूर : हातकणंगले लोकसभा मतदार संघातील खासदार राजू शेट्टी आणि धैर्यशील माने यांच्यात झालेल्या चुरशीच्या लढतीची चर्चा रंगू लागली आहे. माने यांनी दिलेल्या झुंजीची धास्ती वाळवा-शिराळ्यात भक्कम असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली आहे. यामुळे विधानसभेची चाहूल लागण्यापूर्वीच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, आ. जयंत पाटील आणि माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी बुथ कमिट्यांच्या माध्यमातून मतदार संघात संपर्क वाढवला आहे. या माध्यमातून बालेकिल्ल्याची डागडुजी सुरू केली आहे.

गत विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेतही इस्लामपूर मतदारसंघ राष्ट्रवादीने अभेद्य ठेवला होता. मात्र शिराळा मतदारसंघात परिवर्तन झाले. येथे भाजपने राष्ट्रवादीच्या मानसिंगराव नाईक यांचा पराभव केला. हा पराभव आ. पाटील यांच्या जिव्हारी लागला होता. वेळोवेळी त्यांनी जवळच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या देऊन, या पराभवाची सल किती जिव्हारी लागली, हे स्पष्ट केले होते. त्यानंतर वाळवा-शिराळ्यातील राजकीय समीकरणे बदलत गेली आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना जिल्हा परिषद, महापालिका आणि इस्लामपूर नगरपरिषदेवर भाजपचा झेंडा फडकविण्यात यश मिळाले. आता त्यांचे ‘टार्गेट’ आमदार जयंत पाटील हेच आहेत. त्यांच्या पराभवासाठी भाजपकडून शर्थीचे प्रयत्न सुरू झाले आहेत.स्वत:च्या गटात विभागलेल्यांना एकत्र आणणारजयंत पाटील यांच्याकडे पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद असल्याने त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात मोर्चेबांधणीसाठी फिरावे लागणार आहे. त्यामुळे त्यांनी आतापासूनच मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. बुथ कमिट्यांच्या माध्यमातून सामान्यांचे प्रश्न सोडविण्याविषयी गांभीर्याने विचार केला जात आहे. ज्या ज्या गावात दोन दोन गट सक्रिय आहेत, त्यांना एकत्र करून बालेकिल्ल्याची डागडुजी केली जात आहे.

टॅग्स :SangliसांगलीJayant Patilजयंत पाटीलPoliticsराजकारण