शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

शिल्लक साखरेच्या साठवण, विक्रीची चिंता-सांगली जिल्ह्यात ७१ लाख क्विंटल साखर शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 23:39 IST

साखर कारखान्यांकडे २०१७-१८ च्या गळीत हंगामातील २५ लाख २२ हजार क्विंटल साखर शिल्लक आहे. २०१८-१९ च्या हंगामातील ३९ लाख ४८ हजार १५५ टन उसाचे गाळप करून ४६ लाख

ठळक मुद्देकारखान्यांची गोदामे भरली : ; अजूनही ४६ लाख टन गाळप बाकी

अशोक डोंबाळे ।सांगली : साखर कारखान्यांकडे २०१७-१८ च्या गळीत हंगामातील २५ लाख २२ हजार क्विंटल साखर शिल्लक आहे. २०१८-१९ च्या हंगामातील ३९ लाख ४८ हजार १५५ टन उसाचे गाळप करून ४६ लाख ६५ हजार १४९ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. जिल्ह्यात एकत्रित ७१ लाख क्विंटल साखर शिल्लक असल्यामुळे कारखान्यांची गोदामे भरली आहेत. अजून ४६ लाख टन उसाचे गाळप शिल्लक असल्यामुळे साखर विक्रीसह ती ठेवण्याचाही प्रश्न कारखानदारांसमोर निर्माण होणार आहे.

केंद्र शासनाने साखरेची किमान आधारभूत किंमत प्रतिक्विंटल २९०० रुपये केल्यामुळे व्यापाऱ्यांनी महाराष्ट्रातील साखर खरेदीकडे पाठ फिरविली आहे. म्हणूनच १४ कारखान्यांकडे मागील गळीत हंगामातील साखरेची विक्री झालेली नाही. सध्या जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे २५ लाख क्विंटल साखर विक्री होत नसल्यामुळे शिल्लक आहे. राजारामबापू पाटील साखर कारखान्याच्या तीन युनिटकडेच जवळपास चार लाख क्विंटल जुनी साखर शिल्लक आहे.

२०१८-१९ च्या गळीत हंगाम सुरू होऊन अडीच महिन्यांचा कालावधी संपला असून, या कालावधित ३९ लाख ४८ हजार १५५ टन उसाचे गाळप करून ४६ लाख ६५ हजार १४९ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. जुनी आणि मागील दोन महिन्यात उत्पादन झालेली मिळून ७१ लाख क्विंटल साखर झाली आहे. जिल्ह्यातील बहुतांशी साखर कारखान्यांचे गळीत हंगाम एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालण्याची शक्यता आहे. आतापर्यंत साखर कारखान्यांनी ४५ टक्केच उसाचे गाळप केले आहे.

कारखान्यांकडे नोंदणी असलेल्या ५५ टक्के म्हणजे ४६ लाख टन उसाचे गाळप होणार आहे. सध्या जिल्ह्यातील कारखान्यांची गोदामे साखरेने भरली आहेत. भविष्यात तयार होणारी साखर कुठे ठेवायची, असा प्रश्न कारखानदारांसमोर निर्माण होणार आहे. शिल्लक साखरेचा विचार करून राज्य शासनाने तातडीने साखर उद्योगासमोरील या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. केंद्र सरकारने किमान आधारभूत किंमत २९०० रुपये क्विंटल केल्यामुळे महाराष्ट्रातील साखरेऐवजी व्यापारी उत्तर प्रदेशातील साखर खरेदीला प्राधान्य देत आहेत.

राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात राज्यांना साखर जास्त लागते. या राज्यांना साखर पुरवठा करणारे व्यापारी वाहतूक खर्च कमी येत असल्यामुळे उत्तर प्रदेशातून साखर खरेदी करून पाठवत आहेत.महाराष्ट्रातून साखर खरेदी करुन अन्य राज्यांना पाठविण्यासाठी वाहतूक खर्च जादा येत असल्यामुळे व्यापाºयांचे दुर्लक्ष आहे. शासनाने साखर कारखान्यांना वाहतूक खर्चासाठी अनुदान दिले तरीही साखरेच्या विक्रीत वाढ होण्यास मदत होणार आहे.अनुदान द्यावे : आर. डी. माहुलीदेशातच सलग दोन वर्षे साखरेचे उत्पादन विक्रमी झाले आहे. यामुळे साखरेचे दर वाढण्याची शक्यता फारच कमी आहे. केंद्र शासनाने साखरेची आधारभूत किंमत प्रति क्विंटल २९०० रुपये केली असल्याने व्यापाºयांना उत्तर प्रदेशातील साखर वाहतूक सोयीची होते. म्हणून बहुतांशी व्यापारी उत्तर प्रदेशातून साखर खरेदी करुन राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेशात पाठवत आहेत. महाराष्ट्रातील साखर खरेदीसाठी ते व्यापारी येत नाहीत. यावर शासनाने उपाय म्हणून प्रति क्विंटल साखरेला वाहतूक अनुदान द्यावे, अशी प्रतिक्रिया राजारामबापू कारखान्याचे व्यवस्थापक आर. डी. माहुली यांनी दिली.जिल्ह्यातील गळीत हंगामाची सद्यस्थिती (गाळप मेट्रिक टन, साखर क्विंटल)कारखाना ऊस गाळप साखर उत्पादन उतारावसंतदादा ३८८९८० ४५७७५० ११.७७राजारामबापू (साखराळे) ४७४४०५ ५७१७०० १२.०५विश्वासराव नाईक ३२४४०० ३८५००० ११.८७हुतात्मा ३१४६४० ३६९२२५ ११.७३महांकाली ११३७३० ११६८५० १०.३७राजारामबापू (वाटेगाव) २८०७०० ३३३७०० ११.८९सोनहिरा ४४१४१५ ५११६९० ११.५९क्रांती ३८४७१० ४३६४७० ११.३५कारखाना ऊस गाळप साखर उत्पादन उतारासर्वोदय १९१८५० २२६६७० ११.८१मोहनराव शिंदे १९३८७० २१५००० ११.०९निनाईदेवी (दालमिया) ११९२२५ १४०६०० ११़७९केन अ‍ॅग्रो १६४९२० १७६६०० १०़७१उदगिरी शुगर २५५४७० २९२८५० ११.४६सद्गुरु श्री श्री शुगर २९९८४० ३३१०४४ ११़०४एकूण ३९४८१५५ ४५६५१४९ ११़५६

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखाने