शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

शिल्लक साखरेच्या साठवण, विक्रीची चिंता-सांगली जिल्ह्यात ७१ लाख क्विंटल साखर शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 23:39 IST

साखर कारखान्यांकडे २०१७-१८ च्या गळीत हंगामातील २५ लाख २२ हजार क्विंटल साखर शिल्लक आहे. २०१८-१९ च्या हंगामातील ३९ लाख ४८ हजार १५५ टन उसाचे गाळप करून ४६ लाख

ठळक मुद्देकारखान्यांची गोदामे भरली : ; अजूनही ४६ लाख टन गाळप बाकी

अशोक डोंबाळे ।सांगली : साखर कारखान्यांकडे २०१७-१८ च्या गळीत हंगामातील २५ लाख २२ हजार क्विंटल साखर शिल्लक आहे. २०१८-१९ च्या हंगामातील ३९ लाख ४८ हजार १५५ टन उसाचे गाळप करून ४६ लाख ६५ हजार १४९ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. जिल्ह्यात एकत्रित ७१ लाख क्विंटल साखर शिल्लक असल्यामुळे कारखान्यांची गोदामे भरली आहेत. अजून ४६ लाख टन उसाचे गाळप शिल्लक असल्यामुळे साखर विक्रीसह ती ठेवण्याचाही प्रश्न कारखानदारांसमोर निर्माण होणार आहे.

केंद्र शासनाने साखरेची किमान आधारभूत किंमत प्रतिक्विंटल २९०० रुपये केल्यामुळे व्यापाऱ्यांनी महाराष्ट्रातील साखर खरेदीकडे पाठ फिरविली आहे. म्हणूनच १४ कारखान्यांकडे मागील गळीत हंगामातील साखरेची विक्री झालेली नाही. सध्या जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे २५ लाख क्विंटल साखर विक्री होत नसल्यामुळे शिल्लक आहे. राजारामबापू पाटील साखर कारखान्याच्या तीन युनिटकडेच जवळपास चार लाख क्विंटल जुनी साखर शिल्लक आहे.

२०१८-१९ च्या गळीत हंगाम सुरू होऊन अडीच महिन्यांचा कालावधी संपला असून, या कालावधित ३९ लाख ४८ हजार १५५ टन उसाचे गाळप करून ४६ लाख ६५ हजार १४९ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. जुनी आणि मागील दोन महिन्यात उत्पादन झालेली मिळून ७१ लाख क्विंटल साखर झाली आहे. जिल्ह्यातील बहुतांशी साखर कारखान्यांचे गळीत हंगाम एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालण्याची शक्यता आहे. आतापर्यंत साखर कारखान्यांनी ४५ टक्केच उसाचे गाळप केले आहे.

कारखान्यांकडे नोंदणी असलेल्या ५५ टक्के म्हणजे ४६ लाख टन उसाचे गाळप होणार आहे. सध्या जिल्ह्यातील कारखान्यांची गोदामे साखरेने भरली आहेत. भविष्यात तयार होणारी साखर कुठे ठेवायची, असा प्रश्न कारखानदारांसमोर निर्माण होणार आहे. शिल्लक साखरेचा विचार करून राज्य शासनाने तातडीने साखर उद्योगासमोरील या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. केंद्र सरकारने किमान आधारभूत किंमत २९०० रुपये क्विंटल केल्यामुळे महाराष्ट्रातील साखरेऐवजी व्यापारी उत्तर प्रदेशातील साखर खरेदीला प्राधान्य देत आहेत.

राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात राज्यांना साखर जास्त लागते. या राज्यांना साखर पुरवठा करणारे व्यापारी वाहतूक खर्च कमी येत असल्यामुळे उत्तर प्रदेशातून साखर खरेदी करून पाठवत आहेत.महाराष्ट्रातून साखर खरेदी करुन अन्य राज्यांना पाठविण्यासाठी वाहतूक खर्च जादा येत असल्यामुळे व्यापाºयांचे दुर्लक्ष आहे. शासनाने साखर कारखान्यांना वाहतूक खर्चासाठी अनुदान दिले तरीही साखरेच्या विक्रीत वाढ होण्यास मदत होणार आहे.अनुदान द्यावे : आर. डी. माहुलीदेशातच सलग दोन वर्षे साखरेचे उत्पादन विक्रमी झाले आहे. यामुळे साखरेचे दर वाढण्याची शक्यता फारच कमी आहे. केंद्र शासनाने साखरेची आधारभूत किंमत प्रति क्विंटल २९०० रुपये केली असल्याने व्यापाºयांना उत्तर प्रदेशातील साखर वाहतूक सोयीची होते. म्हणून बहुतांशी व्यापारी उत्तर प्रदेशातून साखर खरेदी करुन राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेशात पाठवत आहेत. महाराष्ट्रातील साखर खरेदीसाठी ते व्यापारी येत नाहीत. यावर शासनाने उपाय म्हणून प्रति क्विंटल साखरेला वाहतूक अनुदान द्यावे, अशी प्रतिक्रिया राजारामबापू कारखान्याचे व्यवस्थापक आर. डी. माहुली यांनी दिली.जिल्ह्यातील गळीत हंगामाची सद्यस्थिती (गाळप मेट्रिक टन, साखर क्विंटल)कारखाना ऊस गाळप साखर उत्पादन उतारावसंतदादा ३८८९८० ४५७७५० ११.७७राजारामबापू (साखराळे) ४७४४०५ ५७१७०० १२.०५विश्वासराव नाईक ३२४४०० ३८५००० ११.८७हुतात्मा ३१४६४० ३६९२२५ ११.७३महांकाली ११३७३० ११६८५० १०.३७राजारामबापू (वाटेगाव) २८०७०० ३३३७०० ११.८९सोनहिरा ४४१४१५ ५११६९० ११.५९क्रांती ३८४७१० ४३६४७० ११.३५कारखाना ऊस गाळप साखर उत्पादन उतारासर्वोदय १९१८५० २२६६७० ११.८१मोहनराव शिंदे १९३८७० २१५००० ११.०९निनाईदेवी (दालमिया) ११९२२५ १४०६०० ११़७९केन अ‍ॅग्रो १६४९२० १७६६०० १०़७१उदगिरी शुगर २५५४७० २९२८५० ११.४६सद्गुरु श्री श्री शुगर २९९८४० ३३१०४४ ११़०४एकूण ३९४८१५५ ४५६५१४९ ११़५६

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखाने