शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

नियमित कर्जदार शेतकऱ्यांनाही दिलासा : जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 15:02 IST

इस्लामपूर : सरकार जशी थकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार आहे, त्याच पद्धतीने नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांनाही दिलासा देणार आहे. वाळवा तालुक्याच्या ...

ठळक मुद्देनियमित कर्जदार शेतकऱ्यांनाही दिलासाइंद्रप्रस्थ सहकारी पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षाची सांगता

इस्लामपूर : सरकार जशी थकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार आहे, त्याच पद्धतीने नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांनाही दिलासा देणार आहे. वाळवा तालुक्याच्या सुबत्तेत वाढ होऊन तो आता समृद्ध झाला आहे. यापुढे विद्वत्तेची कास धरून त्यांचा गौरव करण्याची परंपरा जपली पाहिजे. इंद्रप्रस्थ पतसंस्थेने सर्वांशी आपुलकी जपल्याने या संस्थेचा आता वटवृक्ष झाला आहे, असे गौरवोद्गार जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी काढले.जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या इंद्रप्रस्थ सहकारी पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षाची सांगता आणि गौरव अंकाचे प्रकाशन जयंत पाटील, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, दिलीपराव पाटील, राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, इंद्रप्रस्थ पतसंस्थेचे अध्यक्ष युवराज सूर्यवंशी यांच्याहस्ते राजारामबापू नाट्यगृहात करण्यात आले.

यावेळी जयंत पाटील बोलत होते. यावेळी मॅरेथॉनपटू संग्रामसिंह पाटील, नेदरलँडमध्ये पर्यावरण शाखेचे शिक्षण घेणाऱ्या युगंधर विजयकुमार पाटील, उद्योजक हौसेराव भोसले, सुजित पाटील, रवींद्र पाटील यांचा जयंत पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.जयंत पाटील म्हणाले, जुन्या पिढीने कष्टातून, संघर्षातून सहकाराची उभारणी केली. मात्र नव्या पिढीला सहकाराविषयी आपुलकी नाही. इथला सहकार बळकट असल्याने तालुक्यातील माणूस डगमगत नाही, ही सहकाराची ताकद आहे.

वाकुर्डे योजनेचे पाणी जूनपर्यंत शिराळा तालुक्यात तर आॅगस्टमध्ये वाळवा तालुक्यात येईल. आमचे सरकार पूर्ण पाच वर्षे टिकणार आहे. त्यामुळे सर्वांचा सात-बारा कोरा होईल. नदीकाठच्या शेती उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय लवकरच होईल.

सहकार मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, इंद्रप्रस्थ पतसंस्थेने सामान्य, गरजूंना आर्थिक पाठबळ देत तालुक्यात आर्थिक परिवर्तन केले आहे. गुणवत्तापूर्ण सेवा देत ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. मागील युतीच्या शासनाने सहकारात मोठा गोंधळ घातला. त्याला अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले. आमचे सरकार या सर्व कायदेबाह्य व्यवस्था बाजूला करणार आहे.जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील म्हणाले, सहकार क्षेत्रात इंद्रप्रस्थ पतसंस्था २५ वर्षे कार्यरत राहिली, हे मोठे यश आहे. अनेक स्थित्यंतरे आली, तरी इंद्रप्रस्थ संस्थेने सामान्य माणसांचा विश्वास संपादन करत आपला ब्रँड निर्माण केला आहे.अध्यक्ष युवराज सूर्यवंशी यांनी स्वागत केले. प्रा. डॉ. सूरज चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष विश्वास धस यांनी आभार मानले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, प्रशांत थोरात, माजी आमदार भगवानराव साळुंखे, विनायकराव पाटील, विजय पाटील, बाळासाहेब पाटील, नेताजी पाटील, डॉ. प्रवीण पोरवाल, प्रसाद तगारे, मोहनराव शिंदे, मेघा पाटील, छाया पाटील, कमल पाटील, अलका शहा, रोजा किणीकर, सुस्मिता जाधव, श्रद्धा चरापले, रंजना बारहते, शहाजी पाटील, बशीर मोमीन, राजारामबापू पाटील, अमोल पारेख उपस्थित होते. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलSangliसांगली