शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA: भारताला मोठा धक्का! शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, अनुभवी खेळाडूला कर्णधारपद
2
भारतीय नौदलाची INS सुकन्या अन् पाकिस्तानचं PNS सैफ युद्धनौका समोरासमोर, त्यानंतर...
3
कोलकाताला भूकंपाचे हादरे, ५.२ रिश्टर स्केलची तीव्रता, लोक घाबरून घराबाहेर पडले...
4
दिल्ली ब्लास्ट: जहाल भाषणे, बाँब बनवण्याचे धडे... अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या फोनमध्ये काय काय सापडले?
5
Anil Ambani Stocks: अनिल अंबानींच्या कंपन्यांच्या शेअर्सची बिकट स्थिती, ६०% पेक्षा अधिक आपटले; तुमच्याकडे आहेत का?
6
'माफियांचा खरा चेहरा...', दिव्या खोसला कुमारने मुकेश भट यांच्यासोबतचं कॉल रेकॉर्डिंग केलं लीक
7
मुंबई महानगरपालिकेत भाजपा मुसंडी मारणार? १००हून अधिक जागा जिंकणार, अंतर्गत सर्व्हेतून दावा
8
IND vs SA 2nd Test : MS धोनीच्या एलिट क्लबमध्ये सामील होणार रिषभ पंत! जाणून घ्या त्याचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड!
9
पगार मिळताच अकाउंट होते खाली? '५०-३०-२०' नियमाचा वापर करून ६ महिन्यांत फरक पाहा
10
"मनसे महाविकास आघाडीचा भाग नाही, आमचा निर्णय..."; नेते संदीप देशपांडेंनी मांडली स्पष्ट भूमिका
11
नोटांचे बंडल, सोन्याचे दागिने...; बंगाल, झारखंडमध्ये कोळसा व्यापाऱ्यांच्या घरांवर ईडीचे छापे
12
"सुनील तटकरे लवकरच भाजपमध्ये जातील, हे त्रिवार सत्य आहे", एकनाथ शिंदेंच्या नेत्याचा खळबळजनक दावा
13
खेडमध्ये वैभव खेडेकरांच्या पदरी निराशा; पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आली वेळ, काय घडलं?
14
"देवाच्या कृपेने वाचलो...", बिग बॉस विजेत्या शिव ठाकरेच्या घरी लागलेल्या आगीत ट्रॉफीही जळाल्या
15
वाद चिघळणार! ठाण्यात शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण; भाजपाच्या माजी नगरसेवकावर आरोप
16
Spiritual: आयुष्याच्या अखेरीस प्रत्येकाची पडते शनी महाराजांशी गाठ; मार्गशीर्षात करा 'हे' बदल!
17
अल फलाह विद्यापीठाचे पुढे काय होणार? डॉक्टरकीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला!
18
जपानवर मोठे आर्थिक संकट? ३० वर्षांचा 'येन कॅरी ट्रेड' मोडीत; जागतिक बाजारात मोठा उलटाफेर होण्याची भीती!
19
TATA ची 'ही' कंपनी ५० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार, यापूर्वी TCS मधून १२ हजार कर्मचाऱ्यांना दिलेला नारळ
20
मतविभाजनाची भीती! ठाकरे गटाकडून काँग्रेसची मनधरणी, बड्या नेत्याची वर्षा गायकवाडांशी चर्चा 
Daily Top 2Weekly Top 5

नियमित कर्जदार शेतकऱ्यांनाही दिलासा : जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 15:02 IST

इस्लामपूर : सरकार जशी थकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार आहे, त्याच पद्धतीने नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांनाही दिलासा देणार आहे. वाळवा तालुक्याच्या ...

ठळक मुद्देनियमित कर्जदार शेतकऱ्यांनाही दिलासाइंद्रप्रस्थ सहकारी पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षाची सांगता

इस्लामपूर : सरकार जशी थकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार आहे, त्याच पद्धतीने नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांनाही दिलासा देणार आहे. वाळवा तालुक्याच्या सुबत्तेत वाढ होऊन तो आता समृद्ध झाला आहे. यापुढे विद्वत्तेची कास धरून त्यांचा गौरव करण्याची परंपरा जपली पाहिजे. इंद्रप्रस्थ पतसंस्थेने सर्वांशी आपुलकी जपल्याने या संस्थेचा आता वटवृक्ष झाला आहे, असे गौरवोद्गार जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी काढले.जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या इंद्रप्रस्थ सहकारी पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षाची सांगता आणि गौरव अंकाचे प्रकाशन जयंत पाटील, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, दिलीपराव पाटील, राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, इंद्रप्रस्थ पतसंस्थेचे अध्यक्ष युवराज सूर्यवंशी यांच्याहस्ते राजारामबापू नाट्यगृहात करण्यात आले.

यावेळी जयंत पाटील बोलत होते. यावेळी मॅरेथॉनपटू संग्रामसिंह पाटील, नेदरलँडमध्ये पर्यावरण शाखेचे शिक्षण घेणाऱ्या युगंधर विजयकुमार पाटील, उद्योजक हौसेराव भोसले, सुजित पाटील, रवींद्र पाटील यांचा जयंत पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.जयंत पाटील म्हणाले, जुन्या पिढीने कष्टातून, संघर्षातून सहकाराची उभारणी केली. मात्र नव्या पिढीला सहकाराविषयी आपुलकी नाही. इथला सहकार बळकट असल्याने तालुक्यातील माणूस डगमगत नाही, ही सहकाराची ताकद आहे.

वाकुर्डे योजनेचे पाणी जूनपर्यंत शिराळा तालुक्यात तर आॅगस्टमध्ये वाळवा तालुक्यात येईल. आमचे सरकार पूर्ण पाच वर्षे टिकणार आहे. त्यामुळे सर्वांचा सात-बारा कोरा होईल. नदीकाठच्या शेती उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय लवकरच होईल.

सहकार मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, इंद्रप्रस्थ पतसंस्थेने सामान्य, गरजूंना आर्थिक पाठबळ देत तालुक्यात आर्थिक परिवर्तन केले आहे. गुणवत्तापूर्ण सेवा देत ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. मागील युतीच्या शासनाने सहकारात मोठा गोंधळ घातला. त्याला अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले. आमचे सरकार या सर्व कायदेबाह्य व्यवस्था बाजूला करणार आहे.जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील म्हणाले, सहकार क्षेत्रात इंद्रप्रस्थ पतसंस्था २५ वर्षे कार्यरत राहिली, हे मोठे यश आहे. अनेक स्थित्यंतरे आली, तरी इंद्रप्रस्थ संस्थेने सामान्य माणसांचा विश्वास संपादन करत आपला ब्रँड निर्माण केला आहे.अध्यक्ष युवराज सूर्यवंशी यांनी स्वागत केले. प्रा. डॉ. सूरज चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष विश्वास धस यांनी आभार मानले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, प्रशांत थोरात, माजी आमदार भगवानराव साळुंखे, विनायकराव पाटील, विजय पाटील, बाळासाहेब पाटील, नेताजी पाटील, डॉ. प्रवीण पोरवाल, प्रसाद तगारे, मोहनराव शिंदे, मेघा पाटील, छाया पाटील, कमल पाटील, अलका शहा, रोजा किणीकर, सुस्मिता जाधव, श्रद्धा चरापले, रंजना बारहते, शहाजी पाटील, बशीर मोमीन, राजारामबापू पाटील, अमोल पारेख उपस्थित होते. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलSangliसांगली