शहरं
Join us  
Trending Stories
1
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
2
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
3
"सरकार निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचे काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
4
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
5
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
6
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
7
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
8
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
9
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
10
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
11
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
13
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
14
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
15
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
16
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
17
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!
18
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
19
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
20
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  

मतदारसंघ पुनर्रचनेत अपेक्षाभंगाची शक्यता

By admin | Updated: June 30, 2016 00:03 IST

जि. प. गट, पंचायत समिती गण ‘जैसे थे’च राहणार : निवडणूक आयोगाने लोकसंख्या मागविली

सांगली : शिराळा, पलूस, कडेगाव, खानापूर, कवठेमहांकाळ, जत ग्रामपंचायतींचे रूपांतर नगरपालिका व नगरपंचायतीत झाले आहे. मात्र तरीही मतदारसंघ पुनर्रचनेत जिल्हा परिषद गट आणि गणांची संख्या कमी होणार नाही. हा लोकसंख्या वाढीचा परिणाम आहे. निवडणूक आयोगाने २०११ पासूनच्या जनगणनेची लोकसंख्या मागवून घेतली असून, दि. १ जुलैपासून मतदारसंघाच्या पुनर्रचनेची प्रक्रिया होणार आहे. दोन महिन्यात जिल्हा परिषद गट व गणांची रचना निश्चित होणार आहे. पुनर्रचनेत खुल्या गटातील दिग्गज नेत्यांचे मतदारसंघ बदलणार असल्यामुळे त्यांचा अपेक्षाभंग होण्याची शक्यता आहे.जिल्हा परिषदेचे गट दोन आणि पंचायत समितीचे गण चार वाढणे अपेक्षित होते. परंतु, गट आणि गणांची पुनर्रचना करण्यापूर्वीच जत, शिराळा, पलूस, कडेगाव, खानापूर, कवठेमहांकाळ या मोठ्या ग्रामपंचायती नगरपालिका आणि नगरपंचायती म्हणून शासनाने घोषित केल्या आहेत. यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघ पुनर्रचनेतून या नवीन नगरपालिका व नगरपंचायतींची लोकसंख्या वगळण्यात येणार आहे. ही लोकसंख्या वगळल्यानंतरही जिल्ह्यात २० लाख १५ हजार ८०० लोकसंख्या शिल्लक राहते. लोकसंख्या वाढल्यामुळे गट आणि गण कमी होणार नाहीत, असेच चित्र आहे. तथापि नेत्यांचा दबदबा आणि वर्चस्व असलेली मोठी गावे जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघातून कमी होणार आहेत. याचा फटका अनेक नेत्यांना आणि त्यांच्या वारसांना बसणार, हे निश्चित आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपद खुले असल्यामुळे स्पर्धकही मोठ्याप्रमाणात आहेत. अनेकांनी आतापासूनच रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. परंतु, मतदारसंघ पुनर्रचनेचा दिग्गजांना फटका बसणार आहे.शिराळा ग्रामपंचायतीवर माजी आमदार मानसिंगराव नाईक यांचे वर्चस्व आहे. आतापर्यंत येथून त्यांचे समर्थकच जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले आहेत. शिराळा नगरपंचायत झाल्यामुळे जिल्हा परिषद गट व गणातून ती लोकसंख्या वगळण्यात येणार आहे. साहजिकच मानसिंगराव नाईक गटाला त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यांच्या घरातील सम्राटसिंह नाईक अध्यक्षपदाच्या स्पर्धेतून बाहेर गेले आहेत. तालुक्यातील अन्य जि. प. गट आणि पंचायत समित्यांच्या गणांची रचनाही बदलणार आहे. पलूस, कडेगावमध्येही तशीच परिस्थिती असून येथील बदलाचा काँग्रेसला फायदा होणार की राष्ट्रवादी-भाजपला हे आगामी निवडणुकांतच स्पष्ट होणार आहे. कडेगावचे शांताराम कदम, संग्रामसिंह देशमुख यांनाही सुरक्षित मतदारसंघ शोधावा लागणार आहे. पलूसमध्ये बापूसाहेब येसुगडे, सुहास पुदाले, अमरसिंह फडनाईक, विक्रम पाटील यांचा जिल्हा परिषदेत जाण्याचा मार्ग जवळजवळ बंद झाला आहे. खानापूर नगरपंचायत झाल्यामुळे येथील शिवसेनेचे हक्काचे मतदार कमी होणार आहेत. याचा राष्ट्रवादी, काँग्रेसला फायदा होणार, की शिवसेनाच चांगली बांधणी करून गड शाबूत ठेवणार, हे पुनर्रचनेत निश्चित होणार आहे. कवठेमहांकाळ नगरपंचायत झाल्याचा विजय सगरे गटाला फटका बसणार आहे. जि. प.चे माजी सभापती गजानन कोठावळे, गणपती सगरे अध्यक्षपदाच्या स्पर्धेतून बाजूला गेले आहेत. येथील उर्वरित ग्रामीण भागावर आमदार सुमनताई पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे गटाचे वर्चस्व आहे. जत नगरपालिका झाल्यामुळे येथील काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जाणारा जिल्हा परिषद गट व गणाचे भवितव्यही अडचणीत येणार आहे. जत गट आणि या अंतर्गत येणारे गणच रद्द होणार आहेत. जत वगळून रामपूर आणि अमृतवाडी ही गावे अन्य मतदारसंघाला जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे तेथील नेते सुरेश शिंदे यांची पंचाईत झाली आहे.जत, शिराळा, कडेगाव, पलूस, खानापूर तालुक्यातील जि. प. गट आणि पंचायत समिती गणांमध्ये मोठे बदल होणार आहेत. परंतु, वाळवा तालुक्यात मतदारसंघ वाढण्याची शक्यता आहे.दीड लाखाने लोकसंख्या वाढीने चित्र बदलले मागील वेळी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघांची पुनर्रचना करण्यासाठी २००१ च्या लोकसंख्येचा विचार केला होता. त्यावेळी महापालिका व चार नगरपालिका वगळता जिल्ह्याची लोकसंख्या १९ लाख ७९ हजार ९४९ होती. तिचा विचार करता, जिल्हा परिषदेची सदस्यसंख्या ६३ होणे अपेक्षित होते. ती एकूण सदस्यसंख्येपेक्षा एकने जास्त असल्यामुळे वाळवा तालुक्यातील जिल्हा परिषदेचा एक गट कमी करण्यात आला होता. २०११ च्या जनगणनेमध्ये महापालिका व नगरपालिका सोडून जिल्ह्याची लोकसंख्या २१ लाख २८ हजार ६२० झाली आहे. एक लाख ४८ हजार ६७१ लोकसंख्या वाढली आहे.