शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मतदारसंघ पुनर्रचनेत अपेक्षाभंगाची शक्यता

By admin | Updated: June 30, 2016 00:03 IST

जि. प. गट, पंचायत समिती गण ‘जैसे थे’च राहणार : निवडणूक आयोगाने लोकसंख्या मागविली

सांगली : शिराळा, पलूस, कडेगाव, खानापूर, कवठेमहांकाळ, जत ग्रामपंचायतींचे रूपांतर नगरपालिका व नगरपंचायतीत झाले आहे. मात्र तरीही मतदारसंघ पुनर्रचनेत जिल्हा परिषद गट आणि गणांची संख्या कमी होणार नाही. हा लोकसंख्या वाढीचा परिणाम आहे. निवडणूक आयोगाने २०११ पासूनच्या जनगणनेची लोकसंख्या मागवून घेतली असून, दि. १ जुलैपासून मतदारसंघाच्या पुनर्रचनेची प्रक्रिया होणार आहे. दोन महिन्यात जिल्हा परिषद गट व गणांची रचना निश्चित होणार आहे. पुनर्रचनेत खुल्या गटातील दिग्गज नेत्यांचे मतदारसंघ बदलणार असल्यामुळे त्यांचा अपेक्षाभंग होण्याची शक्यता आहे.जिल्हा परिषदेचे गट दोन आणि पंचायत समितीचे गण चार वाढणे अपेक्षित होते. परंतु, गट आणि गणांची पुनर्रचना करण्यापूर्वीच जत, शिराळा, पलूस, कडेगाव, खानापूर, कवठेमहांकाळ या मोठ्या ग्रामपंचायती नगरपालिका आणि नगरपंचायती म्हणून शासनाने घोषित केल्या आहेत. यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघ पुनर्रचनेतून या नवीन नगरपालिका व नगरपंचायतींची लोकसंख्या वगळण्यात येणार आहे. ही लोकसंख्या वगळल्यानंतरही जिल्ह्यात २० लाख १५ हजार ८०० लोकसंख्या शिल्लक राहते. लोकसंख्या वाढल्यामुळे गट आणि गण कमी होणार नाहीत, असेच चित्र आहे. तथापि नेत्यांचा दबदबा आणि वर्चस्व असलेली मोठी गावे जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघातून कमी होणार आहेत. याचा फटका अनेक नेत्यांना आणि त्यांच्या वारसांना बसणार, हे निश्चित आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपद खुले असल्यामुळे स्पर्धकही मोठ्याप्रमाणात आहेत. अनेकांनी आतापासूनच रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. परंतु, मतदारसंघ पुनर्रचनेचा दिग्गजांना फटका बसणार आहे.शिराळा ग्रामपंचायतीवर माजी आमदार मानसिंगराव नाईक यांचे वर्चस्व आहे. आतापर्यंत येथून त्यांचे समर्थकच जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले आहेत. शिराळा नगरपंचायत झाल्यामुळे जिल्हा परिषद गट व गणातून ती लोकसंख्या वगळण्यात येणार आहे. साहजिकच मानसिंगराव नाईक गटाला त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यांच्या घरातील सम्राटसिंह नाईक अध्यक्षपदाच्या स्पर्धेतून बाहेर गेले आहेत. तालुक्यातील अन्य जि. प. गट आणि पंचायत समित्यांच्या गणांची रचनाही बदलणार आहे. पलूस, कडेगावमध्येही तशीच परिस्थिती असून येथील बदलाचा काँग्रेसला फायदा होणार की राष्ट्रवादी-भाजपला हे आगामी निवडणुकांतच स्पष्ट होणार आहे. कडेगावचे शांताराम कदम, संग्रामसिंह देशमुख यांनाही सुरक्षित मतदारसंघ शोधावा लागणार आहे. पलूसमध्ये बापूसाहेब येसुगडे, सुहास पुदाले, अमरसिंह फडनाईक, विक्रम पाटील यांचा जिल्हा परिषदेत जाण्याचा मार्ग जवळजवळ बंद झाला आहे. खानापूर नगरपंचायत झाल्यामुळे येथील शिवसेनेचे हक्काचे मतदार कमी होणार आहेत. याचा राष्ट्रवादी, काँग्रेसला फायदा होणार, की शिवसेनाच चांगली बांधणी करून गड शाबूत ठेवणार, हे पुनर्रचनेत निश्चित होणार आहे. कवठेमहांकाळ नगरपंचायत झाल्याचा विजय सगरे गटाला फटका बसणार आहे. जि. प.चे माजी सभापती गजानन कोठावळे, गणपती सगरे अध्यक्षपदाच्या स्पर्धेतून बाजूला गेले आहेत. येथील उर्वरित ग्रामीण भागावर आमदार सुमनताई पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे गटाचे वर्चस्व आहे. जत नगरपालिका झाल्यामुळे येथील काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जाणारा जिल्हा परिषद गट व गणाचे भवितव्यही अडचणीत येणार आहे. जत गट आणि या अंतर्गत येणारे गणच रद्द होणार आहेत. जत वगळून रामपूर आणि अमृतवाडी ही गावे अन्य मतदारसंघाला जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे तेथील नेते सुरेश शिंदे यांची पंचाईत झाली आहे.जत, शिराळा, कडेगाव, पलूस, खानापूर तालुक्यातील जि. प. गट आणि पंचायत समिती गणांमध्ये मोठे बदल होणार आहेत. परंतु, वाळवा तालुक्यात मतदारसंघ वाढण्याची शक्यता आहे.दीड लाखाने लोकसंख्या वाढीने चित्र बदलले मागील वेळी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघांची पुनर्रचना करण्यासाठी २००१ च्या लोकसंख्येचा विचार केला होता. त्यावेळी महापालिका व चार नगरपालिका वगळता जिल्ह्याची लोकसंख्या १९ लाख ७९ हजार ९४९ होती. तिचा विचार करता, जिल्हा परिषदेची सदस्यसंख्या ६३ होणे अपेक्षित होते. ती एकूण सदस्यसंख्येपेक्षा एकने जास्त असल्यामुळे वाळवा तालुक्यातील जिल्हा परिषदेचा एक गट कमी करण्यात आला होता. २०११ च्या जनगणनेमध्ये महापालिका व नगरपालिका सोडून जिल्ह्याची लोकसंख्या २१ लाख २८ हजार ६२० झाली आहे. एक लाख ४८ हजार ६७१ लोकसंख्या वाढली आहे.