शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

आरक्षित जागेवरील गुंठेवारी नियमित करा

By admin | Updated: February 26, 2015 00:06 IST

महापालिका सभा : सभागृह नेत्यांनीच केली शिफारस, तातडीने निर्णय घेण्याची प्रशासनाकडे मागणी

सांगली : आरक्षित जागेवर ७0 टक्केपेक्षा अधिक लोकवस्ती झाली असेल, तर अशी गुंठेवारीतील घरे नियमित करता येऊ शकतात. त्यामुळे याबाबत महापालिका प्रशासनाने निर्णय घ्यावा, अशी शिफारस सभागृह नेते किशोर जामदार यांनी आज, मंगळवारी महापालिका सभेत केली. महापौर विवेक कांबळे यांनी याबाबत निर्णय घेण्याची सूचना आयुक्तांना केली. महापालिका क्षेत्रातील गुंठेवारी नियमितीकरणाचा आणि वाढत्या गुंठेवारी क्षेत्राचा विषय चर्चेला आला. काँग्रेस सदस्य शेखर माने यांनी हा विषय उपस्थित केला. महापालिका प्रशासनाने गुंठेवारी नियमितीकरण कायद्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे शहराचा बेशिस्तपणे विस्तार सुरू आहे. वाढत्या गुंठेवारीवर महापालिकेचे नियंत्रण नाही. गुंठेवारी कायदा अस्तित्वात आल्यानंतर गोरगरीब लोकांची एक किंवा दोन गुंठे जागेतील घरे नियमित व्हावीत, असा उद्देश होता. या उद्देशाला तडा देत बोगसगिरी करून नव्याने गुंठेवारी होत आहे. याबाबत नगररचना विभाग सक्षम नाही. महापालिका क्षेत्रातील गुंठेवारीचे ७ हजार ८३७ प्रस्ताव सध्या पडून आहेत. ब्ल्यू झोन, बफर झोन व अन्य गोष्टींसाठी आरक्षित असलेल्या जागांवर ही गुंठेवारी आहे. तसेच आरक्षित जागेवरील प्रस्ताव सध्या प्रलंबित आहेत. ज्यांनी फायली सादर केल्या, ते परत चौकशीकरिताही आले नाहीत. त्यामुळे शहराची शिस्तबद्ध वाढ व्हायची असेल, तर गुंठेवारीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. शिवसेनेचे गौतम पवार म्हणाले की, महापालिकेने गुंठेवारी नियंत्रणासाठी क्षेत्र बंधनाचे धोरण स्वीकारावे. यासाठी फौजदारी व दंडात्मक कारवाईची तरतूद करावी. जगन्नाथ ठोकळे यांनी, गुंठेवारीतील नैसर्गिक नाल्यांचा विषय मांडला. सभागृह नेते जामदार म्हणाले की, आरक्षित जमिनींवरील गुंठेवारी नियमित करता येऊ शकते. एमआरटीपी अ‍ॅक्ट (महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना कायदा) नुसार अशी गुंठेवारी नियमित करण्याचा अधिकार महापालिकांना आहे. ७0 टक्केपेक्षा अधिक लोकवस्ती अशा आरक्षित जागांवर असेल, तर त्याठिकाणी नियमितीकरण करून संबंधितांचे बांधकाम अधिकृत करता येऊ शकते. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी याबाबतची तपासणी करून आरक्षित जागांवरील गुंठेवारी नियमित करण्याबाबत सूचना द्यावी. यावर नगरसेवक संतोष पाटील, हारुण शिकलगार, विष्णू माने यांनी मते मांडली. (प्रतिनिधी)मजलेकर-कांबळे यांच्यात वादमाजी उपमहापौर प्रशांत पाटील-मजलेकर यांनी एक विषय मांडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी महापौर कांबळे यांनी त्यांना रोखले. ज्या विषयावर आदेश दिलेले आहेत, त्यावर पुन्हा बोलण्याचा कोणालाही अधिकार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले व त्यांना खाली बसण्याचे आदेश दिले. त्यामुळे संतप्त मजलेकर यांनी ‘तुम्ही गरिबांचे महापौर नाही’, असा आरोप केला. यावेळी कांबळे व मजलेकर यांच्यात वाद झाला. महापौरांचे सभागृहातील नियम...परवानगीशिवाय कोणत्याही सदस्याला बोलता येणार नाहीकोणताही आरोप करायचा असेल, तर त्याबाबतचे पुरावे सादर करावे लागतील.गटनेता बोलल्यानंतर त्या पक्षाच्या अन्य सदस्याने पुन्हा बोलू नये. चुकीचे व अर्थहीन शब्दप्रयोग सभागृहात करू नयेत. मुद्दे मांडताना त्याला कागदोपत्री किंवा अभ्यासाचा आधार असावा.सभेत चिरीमिरी आणि बिलंदर महापौर कांबळे यांनी आज सभागृहात सदस्यांना शिस्त लावतानाच सदस्यांच्या भाषणामधील अनेक मुद्द्यांवर चिमटे काढत त्यांनी सभागृहात हशाही पिकविला. राष्ट्रवादीचे नगरसेवक विष्णू माने यांनी, अधिकारी चिरीमिरी खातात, असा आरोप केला. महापौरांनी त्यांना मध्येच रोखले आणि ‘चिरीमिरी’ म्हणजे काय? असा सवाल केला. असा शब्दप्रयोग पुन्हा नको, अशी सूचनाही त्यांनी दिली. शेखर माने यांनी अधिकाऱ्यांना ‘बिलंदर’ म्हटल्यानंतरही, महापौरांनी बिलंदरपेक्षा ‘चाणाक्ष’ हा शब्द वापरण्याची सूचना केली. त्यामुळे सभागृहात हशा पिकला.