शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; जन्मदात्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
4
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
5
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
6
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
7
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
8
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
9
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
11
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
12
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
13
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
14
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
15
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
16
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
17
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
18
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर टाकण्याची धमकी: कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
19
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
20
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू

आरक्षित जागेवरील गुंठेवारी नियमित करा

By admin | Updated: February 26, 2015 00:06 IST

महापालिका सभा : सभागृह नेत्यांनीच केली शिफारस, तातडीने निर्णय घेण्याची प्रशासनाकडे मागणी

सांगली : आरक्षित जागेवर ७0 टक्केपेक्षा अधिक लोकवस्ती झाली असेल, तर अशी गुंठेवारीतील घरे नियमित करता येऊ शकतात. त्यामुळे याबाबत महापालिका प्रशासनाने निर्णय घ्यावा, अशी शिफारस सभागृह नेते किशोर जामदार यांनी आज, मंगळवारी महापालिका सभेत केली. महापौर विवेक कांबळे यांनी याबाबत निर्णय घेण्याची सूचना आयुक्तांना केली. महापालिका क्षेत्रातील गुंठेवारी नियमितीकरणाचा आणि वाढत्या गुंठेवारी क्षेत्राचा विषय चर्चेला आला. काँग्रेस सदस्य शेखर माने यांनी हा विषय उपस्थित केला. महापालिका प्रशासनाने गुंठेवारी नियमितीकरण कायद्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे शहराचा बेशिस्तपणे विस्तार सुरू आहे. वाढत्या गुंठेवारीवर महापालिकेचे नियंत्रण नाही. गुंठेवारी कायदा अस्तित्वात आल्यानंतर गोरगरीब लोकांची एक किंवा दोन गुंठे जागेतील घरे नियमित व्हावीत, असा उद्देश होता. या उद्देशाला तडा देत बोगसगिरी करून नव्याने गुंठेवारी होत आहे. याबाबत नगररचना विभाग सक्षम नाही. महापालिका क्षेत्रातील गुंठेवारीचे ७ हजार ८३७ प्रस्ताव सध्या पडून आहेत. ब्ल्यू झोन, बफर झोन व अन्य गोष्टींसाठी आरक्षित असलेल्या जागांवर ही गुंठेवारी आहे. तसेच आरक्षित जागेवरील प्रस्ताव सध्या प्रलंबित आहेत. ज्यांनी फायली सादर केल्या, ते परत चौकशीकरिताही आले नाहीत. त्यामुळे शहराची शिस्तबद्ध वाढ व्हायची असेल, तर गुंठेवारीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. शिवसेनेचे गौतम पवार म्हणाले की, महापालिकेने गुंठेवारी नियंत्रणासाठी क्षेत्र बंधनाचे धोरण स्वीकारावे. यासाठी फौजदारी व दंडात्मक कारवाईची तरतूद करावी. जगन्नाथ ठोकळे यांनी, गुंठेवारीतील नैसर्गिक नाल्यांचा विषय मांडला. सभागृह नेते जामदार म्हणाले की, आरक्षित जमिनींवरील गुंठेवारी नियमित करता येऊ शकते. एमआरटीपी अ‍ॅक्ट (महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना कायदा) नुसार अशी गुंठेवारी नियमित करण्याचा अधिकार महापालिकांना आहे. ७0 टक्केपेक्षा अधिक लोकवस्ती अशा आरक्षित जागांवर असेल, तर त्याठिकाणी नियमितीकरण करून संबंधितांचे बांधकाम अधिकृत करता येऊ शकते. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी याबाबतची तपासणी करून आरक्षित जागांवरील गुंठेवारी नियमित करण्याबाबत सूचना द्यावी. यावर नगरसेवक संतोष पाटील, हारुण शिकलगार, विष्णू माने यांनी मते मांडली. (प्रतिनिधी)मजलेकर-कांबळे यांच्यात वादमाजी उपमहापौर प्रशांत पाटील-मजलेकर यांनी एक विषय मांडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी महापौर कांबळे यांनी त्यांना रोखले. ज्या विषयावर आदेश दिलेले आहेत, त्यावर पुन्हा बोलण्याचा कोणालाही अधिकार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले व त्यांना खाली बसण्याचे आदेश दिले. त्यामुळे संतप्त मजलेकर यांनी ‘तुम्ही गरिबांचे महापौर नाही’, असा आरोप केला. यावेळी कांबळे व मजलेकर यांच्यात वाद झाला. महापौरांचे सभागृहातील नियम...परवानगीशिवाय कोणत्याही सदस्याला बोलता येणार नाहीकोणताही आरोप करायचा असेल, तर त्याबाबतचे पुरावे सादर करावे लागतील.गटनेता बोलल्यानंतर त्या पक्षाच्या अन्य सदस्याने पुन्हा बोलू नये. चुकीचे व अर्थहीन शब्दप्रयोग सभागृहात करू नयेत. मुद्दे मांडताना त्याला कागदोपत्री किंवा अभ्यासाचा आधार असावा.सभेत चिरीमिरी आणि बिलंदर महापौर कांबळे यांनी आज सभागृहात सदस्यांना शिस्त लावतानाच सदस्यांच्या भाषणामधील अनेक मुद्द्यांवर चिमटे काढत त्यांनी सभागृहात हशाही पिकविला. राष्ट्रवादीचे नगरसेवक विष्णू माने यांनी, अधिकारी चिरीमिरी खातात, असा आरोप केला. महापौरांनी त्यांना मध्येच रोखले आणि ‘चिरीमिरी’ म्हणजे काय? असा सवाल केला. असा शब्दप्रयोग पुन्हा नको, अशी सूचनाही त्यांनी दिली. शेखर माने यांनी अधिकाऱ्यांना ‘बिलंदर’ म्हटल्यानंतरही, महापौरांनी बिलंदरपेक्षा ‘चाणाक्ष’ हा शब्द वापरण्याची सूचना केली. त्यामुळे सभागृहात हशा पिकला.