शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेच्या अर्थचक्रास आपत्तीचे ग्रहण-५८४ कोटी रुपये पीककर्ज थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 00:44 IST

आपत्तीमुळे जिल्ह्यातील अर्थचक्राला दणका बसला आहे. कृषी क्षेत्राला जिल्हा बँकेवर विसंबून राहावे लागते. त्यामुळे एकूण पीक कर्जापैकी सर्वाधिक वाटा जिल्हा बँकेचा असतो. बँकेने १ एप्रिल २0१९ ते ३0 सप्टेंबर २0१९ या काळात ९३ हजार ६२४ कर्जदारांना ५९ हजार ४२४ हेक्टरसाठी ५८४ कोटी ५३ लाखाचा कर्जपुरवठा केला आहे.

ठळक मुद्देप्रशासनासमोर कर्जवसुली बनली डोकेदुखी

अविनाश कोळी ।सांगली : आपत्तीच्या दुष्टचक्रात सापडलेल्या जिल्ह्यातील शेतकरी उद्ध्वस्त होत असताना, कृषी क्षेत्राचा मुख्य कणा असलेल्या जिल्हा बँकेच्या अर्थचक्रालाही दणका बसला आहे. सध्या बँकेची ५८४ कोटी ५३ लाख १३ हजार रुपयांची पीक कर्जाची थकबाकी असून, यातील ४0 टक्के कर्जदारांना अवकाळी पावसाने कवेत घेतल्याने, अडीचशे कोटीची वसुली थांबणार आहे.

आपत्तीमुळे जिल्ह्यातील अर्थचक्राला दणका बसला आहे. कृषी क्षेत्राला जिल्हा बँकेवर विसंबून राहावे लागते. त्यामुळे एकूण पीक कर्जापैकी सर्वाधिक वाटा जिल्हा बँकेचा असतो. बँकेने १ एप्रिल २0१९ ते ३0 सप्टेंबर २0१९ या काळात ९३ हजार ६२४ कर्जदारांना ५९ हजार ४२४ हेक्टरसाठी ५८४ कोटी ५३ लाखाचा कर्जपुरवठा केला आहे. यातील ४0 टक्के शेतकऱ्यांना अवकाळी पावसाने उद्ध्वस्त केल्याचा अंदाज आहे. त्यामुळे सुमारे २३0 ते २५0 कोटी रुपयांची वसुली बाधित होणार आहे.

एप्रिल महिन्यात शासनाच्या कर्जमाफी योजनेमुळे जिल्हा बँकेच्या वसुलीवर परिणाम झाला. आॅगस्टमध्ये महापुराने जिल्ह्याला कवेत घेतले. महापुराने बाधित १0४ गावांतील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे अद्याप पूर्ण झालेले नाहीत. पीक कर्जाची वसुली बँकेला करता आली नाही. आता आॅक्टोबरमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातल्याने ५५ हजार १३३ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यांच्या वसुलीचा प्रश्नही जिल्हा बँकेसमोर आहे. वर्षातील आठ महिने आपत्तीला तोंड देणाºया शेतकऱ्यांबरोबरच जिल्हा बँकेसमोरही आर्थिक आपत्ती निर्माण झाली आहे. बिघडलेले अर्थचक्र आता पूर्वपदावर येण्यासाठी मोठा काळ जाणार आहे. शेतकºयांना कर्जमाफी किंवा भरपाई मिळत असताना, बँकांना मात्र कोणत्याही प्रकारची भरपाई मिळत नाही.एनपीएवर होणार परिणामबँकेचा सध्याचा एनपीए (नॉन प्रोडक्टीव्ह असेट्स) ५३६ कोटीचा असून त्यात पीक कर्जाचे ६२ कोटी आहेत. याची टक्केवारी ११.८३ टक्के असून नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकºयांबरोबर बँकेच्या एनपीएलाही मोठा दणका बसणार आहे. उसाचे नुकसान झाल्यामुळे यावर्षी कारखान्यांचे गाळप घटणार आहे. त्यामुळे बिगरशेती कर्जदार म्हणून बँकेला दुहेरी नुकसानीस सामोरे जावे लागेल.दरवर्षी ३२ कोटीचा तोटाशेतीकर्जातून बँकेला कधीही फायदा होत नाही. दरवर्षी ३२ ते ३४ कोटी रुपये शेतीकर्जातून नुकसान होत असते. तरीही शेतकºयांची बॅँक म्हणून शेतीकर्जाची सेवा ती बजावत असते.

  • उसाच्या ३0,४0३ हेक्टर क्षेत्राकरिता
  • ४९ हजार ३0४ शेतकºयांना
  • जिल्हा बँकेमार्फत यावर्षी ऊस लागवडीकरिता ३00 कोटी ९९ लाख ९३ हजाराचा कर्जपुरवठा

 

  • जिल्ह्यातील ५,१९६.३५ हेक्टर द्राक्षबागांसाठी

१0 हजार ५१४ शेतकºयांना१४४ कोटी ७२ लाख५८ हजार रुपये कर्ज

  • डाळिंबाच्या ७,३८८.८९ हेक्टर क्षेत्राकरिता

११ हजार ४५७ शेतक-यांना८३ कोटी ९२ लाख ७४ हजार रुपयांचा कर्जपुरवठा केला आहे.

  • याशिवाय अन्य पिकांना केलेला कर्जपुरवठाही मोठा आहे.

 

शासनाकडून दुर्लक्ष: दिलीपतात्या पाटीलशेतकऱ्यांना कर्जमाफी, भरपाई मिळालीच पाहिजे. बँक त्यासाठी आग्रही आहे. मात्र बँकेच्या अर्थकारणावर त्याचा परिणाम होत असताना बँकेलाही शासनाने मदतीचा हात दिला पाहिजे. बँक आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्यामुळे इतक्या संकटातही तरली आहे, असे मत जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी व्यक्त केले.