शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

कोविडनंतर मिरजेत पुन्हा अरब नागरिकांचे आगमन; व्यावसायिकांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2022 12:50 IST

मिरजेत वैद्यकीय सुविधा उपलब्ध असल्याने आखाती देशातील कतार, मस्कत, ओमान, बहारीन, सौदी, दुबई या देशांतील अरब भारतात मुंबई, दिल्ली, हैदराबादसह मिरजेतही येतात.

सदानंद औंधेमिरज : कोविड साथीमुळे गेली दोन वर्षे आखाती देशातून मिरजेत येणाऱ्या अरब नागरिकांच्या आगमन बंद होते. निर्बंध हटल्याने या वर्षी पुन्हा अरबांचे मिरजेत आगमन झाल्याने त्यांच्यावर अवलंबून असलेले लॉजेस, दवाखाने व इतर छोट्या व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.मिरजेत वैद्यकीय सुविधा उपलब्ध असल्याने आखाती देशातील कतार, मस्कत, ओमान, बहारीन, सौदी, दुबई या देशांतील अरब भारतात मुंबई, दिल्ली, हैदराबादसह मिरजेतही येतात. एकेकाळी हजारोच्या संख्येने मिरजेत येणाऱ्या अरबांची संख्या वेगवेगळ्या कारणांमुळे घटली आहे. मात्र, कोविड साथीदरम्यान आखाती देशांनी त्यांच्या नागरिकांना परदेशात प्रवासबंदी केल्याने गेल्या दोन वर्षांत मिरजेत अरब पर्यटकांचे आगमन बंद झाले होते.पर्यटक म्हणून येणाऱ्या अरबांवर मिरजेतील लाॅजेस काही रुग्णालये, रिक्षाचालक, टॅक्सीचालक व इतर व्यावसायिक अवलंबून आहेत. अरबांचे येणे बंद झाल्याने गेली दोन वर्षे हे व्यावसायिक अडचणीत आले होते. गेली ४० वर्षे पर्यटन व उपचारासाठी अरब मिरजेत येतात. मिरजेत केवळ अरबांसाठी काही लॉजेस आहेत. ऑगष्ट ते फेब्रुवारी या हंगामात मिरजेत येणाऱ्या अरबांना सर्व सुविधा पुरविणारे एजंट प्रत्येक लॉजवर आहेत.अरबांच्या संपर्कामुळे लॉजवरील वेटरपासून रिक्षावाल्यांपर्यंत सर्वजण अरबी बोलतात. अरब मोठ्या संख्येने येत असल्याने मिरजेत यापूर्वी लॉजेससह काही रुग्णालयांतील फलकही अरबी भाषेत झळकत होते. आता अरब पर्यटकांची संख्या कमी झाल्याने त्यांच्यावर अवलंबून असणारे व्यवसायही कमी झाले आहेत. या वर्षी अरबांचे मोठ्या संख्येने मिरजेत आल्याने लाॅजेस फुल्ल आहेत.

ईदनंतर आगमनमौजमजेसाठी मिरजेत येणाऱ्या अरब पर्यटकांविरुद्ध ३५ वर्षांपूर्वी मिरजेत अरब हटाव आंदोलन झाले होते. यामुळे मिरजेकडे येणाऱ्या अरबांची संख्या कमी झाली. मात्र अरब येणे कधी बंद झाले नव्हते. मात्र कोविड साथीमुळे गेली दोन वर्षे मिरजेत अरब आले नव्हते. या वर्षी ईदनंतर पुन्हा अरबांचे आगमन झाले आहे.

पोलीस ठाण्यात होते नोंदणी

स्थानिक पोलीस ठाण्यात अरबांच्या आगमनाची व सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ वास्तव्य करणाऱ्या अरबांची जिल्हा पोलीस मुख्यालयात नोंद करण्यात येते. दरवर्षी मिरजेत सुमारे पाचशे अरब येतात. मात्र गतवर्षी मार्चपासून मध्यपूर्वेतील अनेक देशांनी भारतात प्रवासबंदी केली होती.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजtourismपर्यटन