शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

मुंबईच्या कलादालनात रवींद्र शिंदेचे पहिले पाऊल

By admin | Updated: November 14, 2014 23:22 IST

१७ ला प्रदर्शन : सागराची गाज, शिंपल्यांचा आविष्कार

युनूस शेख-इस्लामपूर -कुंचल्याचे फटकारे मारताना स्वत: समुद्री शिंपल्यांच्या कोंदणात गाडून घेतलेला देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथील हरहुन्नरी चित्र व शिल्पकार रवींद्र शिंदे कुंचल्यातून उमटलेली सागराची गाज अन् शिंपल्यांतून साकारलेली व अस्सल जिवंतपणाची अनुभूती देणारी शिल्पकृती घेऊन मुंबईच्या कलादालनात पहिलं पाऊल ठेवत आहे.मुंबईतील काळा घोडा चौकातील आर्टिस्ट सेंटरच्या आर्ट गॅलरीमध्ये १७ नोव्हेंबरपासून रवींद्र आपल्या प्रतिभेतून साकारलेल्या कलाकृतींच्या ऐश्वर्याचे प्रदर्शन मांडणार आहे. २३ नोव्हेंबरपर्यंत हे प्रदर्शन खुले आहे. विश्वजित कदम आणि स्वप्नाली कदम यांच्याहस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होईल, अशी माहिती ज्येष्ठ चित्रकार अ‍ॅड. बी. एस. पाटील यांनी दिली.वडिलांच्या कोकणातील नोकरीमुळे रवीला लहानपणीच समुद्रकिनारा गवसला. मग त्याने डोळ्यात साठलेल्या या सागराची गाज, हवेचा बाज, झावळ्यांचा साज कुंचल्यातून कॅनव्हासवर उतरवला. चित्रकलेतील रवीची आवड पाहून कुटुंबाने त्याला प्रोत्साहन दिले. त्यातून रवीने सांगलीच्या ‘कलाविश्व’मधून जी. डी. आर्ट आणि आर्ट टिचर डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केले.