शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

तासगावात काबील निष्ठेने राष्ट्रवादी रईस

By admin | Updated: February 24, 2017 23:47 IST

मतदारच ‘राजा’ : भाजपचा फुगा फुटला; खासदार संजयकाका पाटील स्वत:च्या तालुक्यात बॅकफूटवर

दत्ता पाटील ल्ल तासगाव निवडणुकीत मतदारच राजा असतो, हे पुन्हा एकदा तासगाव तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत सिध्द झाले. राष्ट्रवादीत पडझड होत असताना आणि प्रभावी नेतृत्व नसतानादेखील, माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याशी एकनिष्ठ राहिलेल्या मतदारांनीच भाजपचा फुगा फोडला. त्यामुळे सत्तेचा वारु चौफेर उधळत असलेल्या खासदारांना येथे बॅकफूटवर जावे लागले, तर तालुक्यातील मतदारांची निष्ठाच काबील असल्यामुळे राष्ट्रवादी मात्र रईस झाली.जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून तालुक्यात जोरदार मोर्चेबांधणी झाली. राष्ट्रवादीतून अनेक पदे भोगणाऱ्या आणि आर. आर. पाटील यांच्याशी एकनिष्ठ असणाऱ्या अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपचा रस्ता धरला. काहींनी तळ्यात-मळ्यातची भूमिका घेतली, तर काहींनी सक्रिय राजकारणातून फारकत घेतली. परिणामी तालुक्यात भाजपची आणि खासदार संजयकाकांची लाट निर्माण झाली. या लाटेमुळे राष्ट्रवादीचे उमेदवारदेखील हबकून गेले होते. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अबाधित राहणार का? असाच प्रश्न उपस्थित होत होता. मात्र मतदारांना गृहीत धरुन नेत्यांनी केलेले संधिसाधू राजकारण मतदारांना पचनी पडले नसल्याचे मतपेटीतून दिसून आले. भाजपकडून निष्ठावंत कार्यकर्त्यांना, तर राष्ट्रवादीशी सोडचिठ्ठी घेणाऱ्या कारभाऱ्यांकडून त्यांच्या हक्काच्या मतदारांना गृहीत धरुन घेतलेल्या नव्या घरोब्याच्या निर्णयाला मतदारांनी मतपेटीतून चपराक दिली. या निकालाने भाजपच्या वर्चस्वाचा फुगा फुटला असून, खासदार गट पुन्हा बॅकफूटवरच राहिला आहे.सावळज गटात राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात नाराजीचे मोठे धक्के बसले असतानादेखील, या गटातील मतदारांनी सर्वाधिक मताधिक्य देऊन आबांच्या बालेकिल्ल्याचा लौकिक कायम ठेवला.मांजर्डेत राष्ट्रवादीच्या उमेदवारीची घोडचूक राष्ट्रवादीच्या अंगलट आली, तर राष्ट्रवादीअंतर्गत बंडाळीचा भाजपने फायदा घेत जिल्हा परिषदेची जागा पदरात पाडून घेतली. मणेराजुरी हा देखील राष्ट्रवादीचा बालेकिल्ला कायम राहिला. मात्र सावर्डे येथील भाजपशी फारकत घेतलेल्या दिलीप पाटील यांच्या गटाची पंचायत समितीची बंडखोरी भाजपच्या पथ्यावर पडली. चिंंचणीत डी. के. पाटील यांच्या भाजपमधील उमेदवारीने दिनकरआबा घराण्यातील संघर्ष टळला. त्यामुळे ही जागा एकहाती भाजपच्या पदारात पडली. विसापुरात राष्ट्रवादीशी फारकत घेऊन भाजपमधून रिंगणात उतरलेल्या सुनील पाटील यांना मतदारांनी नाकारले. किंबहुना काही गावांत खासदारांची हक्काची व्होट बँक असतानादेखील, मिळालेली कमी मते चर्चेचा विषय ठरला. येळावी गटात विजय निश्चित करण्यासाठी निर्णायक ठरलेले येळावी गाव खासदारांचा बालेकिल्ला होता. मात्र याठिकाणीही राष्ट्रवादीचे उमेदवार संजय पाटील यांनी मताधिक्क्य मिळविण्याची किमया केली. लोकसभा निवडणुकीपासून खासदार संजयकाका पाटील यांचा वारु सुसाट होता. नगरपालिका निवडणुकीत तासगाव पालिकेवर भाजपचा झेंडा फडकला. त्यामुळे यावेळी पंचायत समितीवरही भाजपचा झेंडा फडकणार, हे निश्चित मानले जात होते. मात्र मतदारांनी संधिसाधू राजकारणाला चपराक देत, निष्ठा जोपासल्यामुळे जिल्ह्यात भाजप सुसाट असतानाही तालुक्यात त्यांना अपयशाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे खासदारांना बदलत्या राजकीय शैलीचे आत्मचिंंतन करायला हवे. राष्ट्रवादीच्या नेत्यांसाठी हे यश दिलासा देणारे असले तरी, नेत्यांपेक्षा मतदारांचा मोठा वाटा यात आहे. पंचायत समितीत मिळालेला निसटता विजय ही धोक्याची घंटा आहे. केवळ निष्ठेचे राजकारण फार काळ चालणारे नाही. निष्ठा दाखविलेल्या मतदारांना कामाची पोहोच मिळायला हवी.