शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

भरपावसात तासगावचा रथोत्सव

By admin | Updated: August 31, 2014 00:06 IST

‘मोरयाऽ मोरयाऽऽ’चा गजर : गुलाल-पेढे-खोबऱ्याची उधळण

तासगाव : ‘मोरयाऽ मोरयाऽऽ’चा गजर, गुलाल-पेढे-खोबऱ्याची उधळण, सकाळपासून सुरू असलेला पाऊस, त्यात चिंब भिजलेल्या भाविकांच्या उत्साहाला उधाण आलेले... अशा वातावरणात तासगावचा ऐतिहासिक २३५वा रथोत्सव आज, शनिवारी पार पडला. त्यानंतर रात्री उशिरा संस्थानच्या दीड दिवसाच्या गणरायाला निरोप देण्यात आला. येथील श्री गणपती पंचायतनच्या रथोत्सवाला ऐतिहासिक परंपरा आहे. मराठा साम्राज्याचे सरसेनापती श्रीमंत परशुरामभाऊ पटवर्धन यांनी समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन सुरू केलेल्या या रथोत्सवास २३४ वर्षे पूर्ण झाली. सध्या त्यांची नववी पिढी कार्यरत आहे. त्यातील श्री गणपती पंचायतनचे विश्वस्त श्रीमंत राजेंद्र पटवर्धन व श्रीमंत निरंजन पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव पार पडला. काल, शुक्रवार गणरायाच्या आगमनापासून पावसाची संततधार सुरू होती. आज, शनिवार सकाळपासूनच मुसळधार पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे भरपावसात रथोत्सव होणार का, याबाबत सर्वत्र चर्चा होती. मात्र, दुपारी साडेबारानंतर पावसाचा जोर ओसरला. दुपारी एकच्या दरम्यान पावसाने पूर्ण उघडीप दिली. प्रत्यक्ष रथ ओढण्यास सुरुवात झाली, तेव्हापासून सायंकाळपर्यंत पावसाची उघडीप होती. त्यामुळे रथोत्सवात अडचण आली नाही.दुपारी एकच्या सुमारास पटवर्धन राजवाड्यातून छबिना बाहेर पडला. त्यात पटवर्धन यांच्यासह मानकरी सहभागी झाले होते. श्री गणपती मंदिरातील १२१ किलो वजनाची पंचधातूंची श्रींची उत्सवमूर्ती पालखीतून मंदिराबाहेर रथापर्यंत आणण्यात आली. रथाच्या मध्यभागी उत्सवमूर्ती विराजमान झाल्यानंतर प्रथेप्रमाणे श्रींची आरती झाली. यावेळी रथापुढे असणाऱ्या गणेशभक्तांनी ‘गणपती बाप्पा मोरयाऽऽ’ची घोषणा दिली.रथाचे दोरखंड हातात घेऊन भाविकांनी रथ ओढण्यास प्रारंभ केला. रस्त्यावर सर्वत्र पाणी-पाणी झाले होते. ‘मोरयाऽ... मोरयाऽऽ’च्या गजरात तल्लीन झालेल्या भाविकांनी जोशात रथ ओढण्यास सुरुवात केली. काही फूट पुढे गेल्यानंतर ओंडक्याच्या साहाय्याने रथ थांबविण्यात येत होता. काही वेळ विश्रांती व पुन्हा ‘मोरयाऽऽ’चा गजर करीत भाविकांनी श्री काशीविश्वेश्वराचे मंदिर गाठले. रथापुढे हत्ती, बैलगाडी, सनई-चौघडे होते. झांजपथकातील विविध खेळ यावेळी सादर करण्यात आले.केळीचे खुंट, नारळांची तोरणे, पताका, फुलांच्या माळा, आदींनी रथ सजविण्यात आला होता. रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या नागरिकांनी रथमार्गावर रांगोळी काढून रथाचे स्वागत केले. गणेशभक्तांना ठिकठिकाणी प्रसादाचे वाटप करण्यात येत होते. संपूर्ण रथयात्रेदरम्यान रथाभोवती मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रथेप्रमाणे श्री गणपती मंदिरापुढे असणाऱ्या श्री काशीविश्वेश्वराच्या मंदिरापर्यंत रथ ओढण्यात येतो. श्री शंकर व श्री गणपती या पिता-पुत्रांची भेट होते व रथ परतीच्या प्रवासाला लागतो. त्याप्रमाणे श्री काशीविश्वेश्वराच्या मंदिरापर्यंत रथ गेल्यानंतर तेथे श्रींची आरती झाली व रथाचा परतीचा प्रवास सुरू झाला. दरम्यान, सकाळपासून श्रींच्या दर्शनासाठी व रथावर नारळांचे तोरण बांधण्यासाठी गणेशभक्तांनी गर्दी केली होती. गणेशमंदिरात भक्तांना दर्शन घेता यावे, यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. मंदिर परिसरातही मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. रथयात्रेच्या मार्गावर तसेच गुरुवार पेठ, बसस्थानक चौकापर्यंतच्या रस्त्यावर यात्रा भरली होती. सर्वत्र प्रसादाचे, नारळांचे स्टॉल्स लावण्यात आले होते. लहान मुलांच्या खेळण्यांचेही स्टॉल्स होते. रथयात्रेनंतर गणपती मंदिरात श्रीमंत राजेंद्र पटवर्धन यांनी सर्व मानकऱ्यांना मानाचे श्रीफळ दिले. रात्री उशिरा संस्थानच्या दीड दिवसाच्या गणरायाचे विसर्जन करण्यात आले. (वार्ताहर)