शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

डिझेल-पेट्रोलप्रमाणे गाई, म्हैशीच्या दूधाला दर द्या, रघुनाथ पाटील यांची मागणी

By अशोक डोंबाळे | Updated: July 8, 2024 18:09 IST

ऑगस्टमध्ये पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या

सांगली : देशात १९७५ मध्ये गाई, म्हैशीच्या एक लिटर दुधामध्ये तीन लिटर पेट्रोल, डिझेल येत होते. सध्या उलट झाले असून तीन लिटर दुधाच्या दरातही एक लिटर पेट्रोल येत नाही. यावरून शेतीमाल आणि औद्योगिक दरामध्ये किती तफावत निर्माण झाली आहे, ते स्पष्ट होत आहे. म्हणून शासनाकडून आम्हाला फुकटची योजना नको, पण शेतीला योग्य भाव द्या, अशी मागणी शेतकरी संघटना अध्यक्ष रघुनाथ (दादा) पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. तसेच ९ ऑगस्टला पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या मारणार आहे, असेही त्यांनी सांगितले.रघुनाथ पाटील म्हणाले, केंद्र आणि राज्य शासनाने सर्व मोफत योजना बंद करावेत. आम्हाला शासनाचे काही मोफत नको आहे. पण, शासनाने शेतीमालावर कोणतेही निर्बंध घालू नयेत. सरकारच्या हस्तक्षेपामुळे गेल्या ६० वर्षात शेतीमालाचे दर आहे तसेच आहेत. परंतु, उद्योजकांच्या मालाचे दर दहा पटीने वाढले आहेत. सरकारच्या या दुटप्पी धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. केंद्र शासन वर्षाला सहा हजार रुपये देत आहे. पण, शेतकऱ्यांकडून वर्षाला जीएसटी करातून लाखो रुपये वसूल करत आहे. सर्व रासायनिक खते, कीटकनाशकांसह सर्वच शेतीमालाची जीएसटी करातून मुक्तता केला पाहिजे.

दोनशे कारखान्याची मालकी २५ कुटुंबीयांकडेराज्यातील २०० साखर कारखान्यांची मालकी केवळ २५ कुटुंबीयांकडे आली. म्हणून केंद्र शासनाने दोन साखर कारखान्यातील २५ किलोमीटर अंतराची अट रद्द केली पाहिजे, अशी मागणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे केली आहे. निर्मला सीतारामन यांनी माहिती घेऊन लवकरच दोन कारखान्यातील अंतराच्या अटीबद्दल निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे, अशी माहिती रघुनाथ (दादा) पाटील यांनी दिली.

ऊस बिलाकडे सुळे, लंके यांचे दुर्लक्ष का?खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार नीलेश लंके यांनी कांदा आणि दूध उत्पादकांच्या प्रश्नावर आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन राजकीय आहे. सुळे, लंके यांनी शेतकऱ्यांच्या अन्य प्रश्नावरही बोलण्याची गरज आहे. ऊस उत्पादकांना बिल मिळत नाहीत, त्याकडेही का ते दुर्लक्ष करत आहेत, असा सवालही रघुनाथदादा यांनी उपस्थित केला.

प्रामाणिक अधिकाऱ्यांचे खच्चीकरणराज्यातील आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यात प्रचंड दुजाभाव सुरू आहे. राज्यकर्त्यांच्या सोयीच्या अधिकाऱ्यांना बडती दिली जाते तर जनतेची प्रामाणिक सेवा करणाऱ्या अधिकाऱ्यांना दुय्यम ठिकाणी नेमणूक दिली जात आहे. यातून प्रामाणिक अधिकाऱ्यांचे खच्चीकरण होत आहे, असा आरोपही रघुनाथदादा यांनी सरकारवर केला.

टॅग्स :SangliसांगलीmilkदूधPetrolपेट्रोलFarmerशेतकरी