शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
3
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी सर्वात कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
5
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
8
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
9
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
10
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
11
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
12
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
13
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
14
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
15
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
16
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
17
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
18
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

डिझेल-पेट्रोलप्रमाणे गाई, म्हैशीच्या दूधाला दर द्या, रघुनाथ पाटील यांची मागणी

By अशोक डोंबाळे | Updated: July 8, 2024 18:09 IST

ऑगस्टमध्ये पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या

सांगली : देशात १९७५ मध्ये गाई, म्हैशीच्या एक लिटर दुधामध्ये तीन लिटर पेट्रोल, डिझेल येत होते. सध्या उलट झाले असून तीन लिटर दुधाच्या दरातही एक लिटर पेट्रोल येत नाही. यावरून शेतीमाल आणि औद्योगिक दरामध्ये किती तफावत निर्माण झाली आहे, ते स्पष्ट होत आहे. म्हणून शासनाकडून आम्हाला फुकटची योजना नको, पण शेतीला योग्य भाव द्या, अशी मागणी शेतकरी संघटना अध्यक्ष रघुनाथ (दादा) पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. तसेच ९ ऑगस्टला पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या मारणार आहे, असेही त्यांनी सांगितले.रघुनाथ पाटील म्हणाले, केंद्र आणि राज्य शासनाने सर्व मोफत योजना बंद करावेत. आम्हाला शासनाचे काही मोफत नको आहे. पण, शासनाने शेतीमालावर कोणतेही निर्बंध घालू नयेत. सरकारच्या हस्तक्षेपामुळे गेल्या ६० वर्षात शेतीमालाचे दर आहे तसेच आहेत. परंतु, उद्योजकांच्या मालाचे दर दहा पटीने वाढले आहेत. सरकारच्या या दुटप्पी धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. केंद्र शासन वर्षाला सहा हजार रुपये देत आहे. पण, शेतकऱ्यांकडून वर्षाला जीएसटी करातून लाखो रुपये वसूल करत आहे. सर्व रासायनिक खते, कीटकनाशकांसह सर्वच शेतीमालाची जीएसटी करातून मुक्तता केला पाहिजे.

दोनशे कारखान्याची मालकी २५ कुटुंबीयांकडेराज्यातील २०० साखर कारखान्यांची मालकी केवळ २५ कुटुंबीयांकडे आली. म्हणून केंद्र शासनाने दोन साखर कारखान्यातील २५ किलोमीटर अंतराची अट रद्द केली पाहिजे, अशी मागणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे केली आहे. निर्मला सीतारामन यांनी माहिती घेऊन लवकरच दोन कारखान्यातील अंतराच्या अटीबद्दल निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे, अशी माहिती रघुनाथ (दादा) पाटील यांनी दिली.

ऊस बिलाकडे सुळे, लंके यांचे दुर्लक्ष का?खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार नीलेश लंके यांनी कांदा आणि दूध उत्पादकांच्या प्रश्नावर आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन राजकीय आहे. सुळे, लंके यांनी शेतकऱ्यांच्या अन्य प्रश्नावरही बोलण्याची गरज आहे. ऊस उत्पादकांना बिल मिळत नाहीत, त्याकडेही का ते दुर्लक्ष करत आहेत, असा सवालही रघुनाथदादा यांनी उपस्थित केला.

प्रामाणिक अधिकाऱ्यांचे खच्चीकरणराज्यातील आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यात प्रचंड दुजाभाव सुरू आहे. राज्यकर्त्यांच्या सोयीच्या अधिकाऱ्यांना बडती दिली जाते तर जनतेची प्रामाणिक सेवा करणाऱ्या अधिकाऱ्यांना दुय्यम ठिकाणी नेमणूक दिली जात आहे. यातून प्रामाणिक अधिकाऱ्यांचे खच्चीकरण होत आहे, असा आरोपही रघुनाथदादा यांनी सरकारवर केला.

टॅग्स :SangliसांगलीmilkदूधPetrolपेट्रोलFarmerशेतकरी