शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

डिझेल-पेट्रोलप्रमाणे गाई, म्हैशीच्या दूधाला दर द्या, रघुनाथ पाटील यांची मागणी

By अशोक डोंबाळे | Updated: July 8, 2024 18:09 IST

ऑगस्टमध्ये पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या

सांगली : देशात १९७५ मध्ये गाई, म्हैशीच्या एक लिटर दुधामध्ये तीन लिटर पेट्रोल, डिझेल येत होते. सध्या उलट झाले असून तीन लिटर दुधाच्या दरातही एक लिटर पेट्रोल येत नाही. यावरून शेतीमाल आणि औद्योगिक दरामध्ये किती तफावत निर्माण झाली आहे, ते स्पष्ट होत आहे. म्हणून शासनाकडून आम्हाला फुकटची योजना नको, पण शेतीला योग्य भाव द्या, अशी मागणी शेतकरी संघटना अध्यक्ष रघुनाथ (दादा) पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. तसेच ९ ऑगस्टला पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या मारणार आहे, असेही त्यांनी सांगितले.रघुनाथ पाटील म्हणाले, केंद्र आणि राज्य शासनाने सर्व मोफत योजना बंद करावेत. आम्हाला शासनाचे काही मोफत नको आहे. पण, शासनाने शेतीमालावर कोणतेही निर्बंध घालू नयेत. सरकारच्या हस्तक्षेपामुळे गेल्या ६० वर्षात शेतीमालाचे दर आहे तसेच आहेत. परंतु, उद्योजकांच्या मालाचे दर दहा पटीने वाढले आहेत. सरकारच्या या दुटप्पी धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. केंद्र शासन वर्षाला सहा हजार रुपये देत आहे. पण, शेतकऱ्यांकडून वर्षाला जीएसटी करातून लाखो रुपये वसूल करत आहे. सर्व रासायनिक खते, कीटकनाशकांसह सर्वच शेतीमालाची जीएसटी करातून मुक्तता केला पाहिजे.

दोनशे कारखान्याची मालकी २५ कुटुंबीयांकडेराज्यातील २०० साखर कारखान्यांची मालकी केवळ २५ कुटुंबीयांकडे आली. म्हणून केंद्र शासनाने दोन साखर कारखान्यातील २५ किलोमीटर अंतराची अट रद्द केली पाहिजे, अशी मागणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे केली आहे. निर्मला सीतारामन यांनी माहिती घेऊन लवकरच दोन कारखान्यातील अंतराच्या अटीबद्दल निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे, अशी माहिती रघुनाथ (दादा) पाटील यांनी दिली.

ऊस बिलाकडे सुळे, लंके यांचे दुर्लक्ष का?खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार नीलेश लंके यांनी कांदा आणि दूध उत्पादकांच्या प्रश्नावर आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन राजकीय आहे. सुळे, लंके यांनी शेतकऱ्यांच्या अन्य प्रश्नावरही बोलण्याची गरज आहे. ऊस उत्पादकांना बिल मिळत नाहीत, त्याकडेही का ते दुर्लक्ष करत आहेत, असा सवालही रघुनाथदादा यांनी उपस्थित केला.

प्रामाणिक अधिकाऱ्यांचे खच्चीकरणराज्यातील आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यात प्रचंड दुजाभाव सुरू आहे. राज्यकर्त्यांच्या सोयीच्या अधिकाऱ्यांना बडती दिली जाते तर जनतेची प्रामाणिक सेवा करणाऱ्या अधिकाऱ्यांना दुय्यम ठिकाणी नेमणूक दिली जात आहे. यातून प्रामाणिक अधिकाऱ्यांचे खच्चीकरण होत आहे, असा आरोपही रघुनाथदादा यांनी सरकारवर केला.

टॅग्स :SangliसांगलीmilkदूधPetrolपेट्रोलFarmerशेतकरी