शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
4
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
5
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
6
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
7
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
8
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
9
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
10
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
11
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
12
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
13
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
14
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
15
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
16
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
17
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
18
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
19
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
20
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ

वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे दुर्मीळ खवले मांजर गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:27 IST

कवठेमहांकाळ : वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे दुर्मीळ खवले मांजर गायब झाले असून, त्याची तस्करी झाली की ते पळून गेले याबाबत साशंकता ...

कवठेमहांकाळ :

वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे दुर्मीळ खवले मांजर गायब झाले असून, त्याची तस्करी झाली की ते पळून गेले याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. याबाबत चौकशी करावी, अशी मागणी कुकटोळी (ता. कवठेमहांकाळ) येथील वन्यप्रेमी व नागरिकांनी केली आहे.

कुकटोळी येथील कारंडे वस्तीवरील शुभम कारंडे यांच्या पोल्ट्रीजवळ गुरुवारी रात्री खवले मांजर निदर्शनास आले. ते पोल्ट्रीमध्ये गेले असता कारंडे यांनी पोल्ट्रीचा दरवाजा बंद केला. गावातील तरुण, नागरिकांना फोन केले. कारंडे वस्तीवर रात्री साडेनऊ वाजता बघ्यांची गर्दी झाली. गर्दीतील एकाने वनविभागाला कळविले. रात्री अकराला वनविभागाचे संजय चव्हाण व पांडुरंग कांबळे हे दोन कर्मचारी वस्तीवर पोहोचले. त्यांनी बाहेरूनच खवले मांजर पाहिले. कारंडे बाहेर गेले असल्याने पोल्ट्रीच्या दाराला कुलूप होते. यावेळी नागरिक उपस्थित होते. परंतु कर्मचारी सकाळी येतो म्हणून तिथून निघून गेले.

शुक्रवारी सकाळी वनविभागाचे कर्मचारी परत कारंडे यांच्या पोल्ट्रीवर आले तर त्या ठिकाणी मागील जाळे फाडून खवले मांजर गायब होते. तेथे रक्ताचे डाग व जाळी मारलेल्या भिंतीला भगदाड पडलेले दिसत होते.

याबाबत वनअधिकारी शिंदे यांना विचारले असता, ‘आम्हाला काही माहीत नाही, मांजर जाळे फाडून पळून गेले. आम्ही काय करू?’ अशी बेजबाबदारपणाची व उद्धट उत्तरे दिली.

गुरुवारी रात्रीच खवले मांजर ताब्यात घेतले असते तर ही वेळ आली नसती, अशी चर्चा आहे.

याबाबत दबक्या आवाजात चर्चा सुरू असून खवल्या मांजराची तस्करी करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

चौकट

चीन व व्हिएतनाममध्ये तस्करी

खवले मांजर दुर्मीळ असून त्याची तस्करी चीन व व्हिएतनाममध्ये केली जाते. त्याच्या शिकारीवर बंदी आहे. त्याच्या खवल्यापासून दमा व संधिवातावर औषध तयार केले जाते. त्यामुळे त्याची मोठ्या प्रमाणावर तस्करी केली जाते.