शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
3
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
4
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
5
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
6
२० मिनिटांत ८.८ लाख रुपये लंपास, 'या' ४ चुकांमुळे बँक खाते रिकामे! तुम्ही तर करत नाहीयेत ना?
7
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
8
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
9
"इंडस्ट्रीत माझी एकच चांगली मैत्रीण आहे...", शशांक केतकरने घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव
10
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
11
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
12
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
13
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
14
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
15
समृद्धीने सुसाट निघाल तर पकडले जाल, तुमच्यावर लक्ष ठेवणार एक हजार ‘डोळे’
16
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
17
‘महादेवी’ हत्तीण प्रकरणात शासनाचा आदेश नाही, उद्या मुंबईत बैठक : मुख्यमंत्री
18
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
19
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
20
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!

राजस्थानच्या मुलीसाठी महाराष्ट्रातून विमानाने दुर्मीळ रक्तपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 00:33 IST

अविनाश कोळी । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जन्मानेच पदरी आलेल्या रक्ताच्या नात्यांचा गोतावळा घेऊन त्याच चौकटीत रमणाऱ्या माणसांना ...

अविनाश कोळी ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जन्मानेच पदरी आलेल्या रक्ताच्या नात्यांचा गोतावळा घेऊन त्याच चौकटीत रमणाऱ्या माणसांना माणुसकीच्या रक्तातून नव्या नातेविश्वात घेऊन जाण्याचे काम ‘बॉम्बे ओ ब्लड ग्रुप आॅर्गनायझेशनमार्फत’ अनेक वर्षांपासून सुरू आहे. याच भावनेतून राजस्थानमधील एका सोळावर्षीय शाळकरी मुलीला पुण्यातून विमानाने सहा तासात रक्त उपलब्ध करून देऊन तिचे प्राण वाचविले.अत्यंत दुर्मिळ असलेल्या ‘बॉम्बे ओ’ या रक्तगटातील संपूर्ण देशभरातील लोकांची संघटना बांधण्याचे काम तासगाव (जि. सांगली) येथील विक्रम यादव यांनी केली आहे. गेल्या काही वर्षात विविध राज्यांमधील तसेच परदेशातील रुग्णांचे प्राण त्यांनी त्यांच्या या संघटनेच्या माध्यमातून वाचविले आहेत. यात आणखी एका पुण्यकर्माची भर नुकतीच पडली. किशनगंज (जि. बारां, राजस्थान) येथील किशोरी मनभर या सोळावर्षीय मुलीला गावातील आरोग्य शिबिरातच अ‍ॅनिमिया आणि मलेरिया या दोन्ही आजाराने ग्रासल्याचे आढळले. तिला तातडीने कोटा शहरातील महाराव भीमसेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याठिकाणी तिच्या तपासणीत ‘बॉम्बे ओ’ हा दुर्मिळ रक्तगट तिच्यात आढळला. एकीकडे आजाराने ग्रस्त असताना, दुर्मिळ रक्तगट तिच्यात आढळल्याने डॉक्टरांची चिंता वाढली. तिचे हिमोग्लोबिनही ४ मिलिग्रॅमपर्यंत खाली आले होते.राजस्थानसह शेजारील अन्य राज्यांमध्ये त्यांनी चौकशी केली असता, हा रक्तगट त्यांना कुठेच आढळून आला नाही. त्यानंतर डॉक्टरांनी बॉम्बे ब्लड ग्रुप आॅर्गनायझेशनच्या हेल्पलाईन क्रमांकावरून सांगलीच्या विक्रम यादव यांच्याशी संपर्क साधला आणि सहा तासात मुलीला रक्त हवे असल्याचे सांगितले. यादव यांनी आपली यंत्रणा कार्यान्वित केली. पुण्यातील रक्तदाते मेधा वैद्य आणि प्रतीक माथी या दोघांना त्यांनी पुण्यातच रक्तदान करण्यास सांगितले. विमानाने ते रक्त जयपूरपर्यंत नेले आणि तिथून कारने कोटा येथील हॉस्पिटलपर्यंत पोहोचविले. वेळेत रक्त पोहोचल्यामुळे किशोरी मनभरचे प्राण वाचले.विक्रम यादव यांनी डॉक्टरांमार्फत या मुलीशी व्हिडिओ कॉलिंगद्वारे संपर्क साधला आणि तिची चौकशीही केली. या मुलीने यादव यांना धन्यवाद दिले. तिच्या चेहºयावर फुललेले हसू डॉक्टरांच्या मनातील समाधानाच्या लाटांना उधाण आणणारे ठरले. हॉस्पिटलच्या रक्तपेढीच्या प्रमुख डॉ. एच. एल. मीणा यांनीही यादव, वैद्य आणि माथी यांना धन्यवाद दिले.काय आहे ‘बॉम्बे ब्लड’मुंबईमध्ये १९५२ मध्ये वाय. एम. भेंडे नावाच्या डॉक्टरनी या रक्तगटाचा शोध लावला होता. पूर्वी मुंबईला बॉम्बे म्हटले जायचे. म्हणून या शहराचेच नाव रक्तगटाला देण्यात आले. हा सर्वात दुर्मिळ रक्तगट मानला जातो. याचे जगभरातील प्रमाण 0.000४ इतके आहे. या रक्तगटातील व्यक्तीचे रक्त अन्य लोकांना चालते, मात्र या लोकांना त्यांच्याच गटाचे रक्त लागते. त्यामुळे गंभीर स्थितीत असलेल्या रुग्णांसाठी सहजासहजी हे रक्त उपलब्ध होणे कठीण असते. त्यामुळेच यादव यांनी देशभरातील अशा गटातील लोकांची संघटना बांधली आहे. त्याचा हेल्पलाईन क्र. ९९७00१८00१ हा आहे.खर्च नव्हे, जीव महत्त्वाचा : विक्रम यादवगेल्या काही वर्षांपासून पदरमोड करून रुग्णांचे प्राण वाचविण्याचे काम बॉम्बे ब्लड ग्रुप आॅर्गनायझेशन व त्यांचे रक्तदाते करीत आहेत. राजस्थानला रक्त पाठविण्याचा खर्चही संघटनेनेच केला. याविषयी यादव म्हणाले की, खर्चापेक्षा एखाद्याचा जीव महत्त्वाचा असतो. चांगल्या विचाराचे रक्तदाते आम्हाला लाभल्यामुळे या गोष्टी शक्य होत आहेत.यांनी केली धडपड...रक्त पोहोचविण्याच्या मोहिमेत विक्रम यादव यांच्यासह हरजिंदर सिंह, सचिन सिंगला, अलोक पदकर, सागर पंडित, पुणे जनकल्याण रक्तपेढीचे संतोष अनगोळकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.