शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

राजस्थानच्या मुलीसाठी महाराष्ट्रातून विमानाने दुर्मीळ रक्तपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 00:33 IST

अविनाश कोळी । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जन्मानेच पदरी आलेल्या रक्ताच्या नात्यांचा गोतावळा घेऊन त्याच चौकटीत रमणाऱ्या माणसांना ...

अविनाश कोळी ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जन्मानेच पदरी आलेल्या रक्ताच्या नात्यांचा गोतावळा घेऊन त्याच चौकटीत रमणाऱ्या माणसांना माणुसकीच्या रक्तातून नव्या नातेविश्वात घेऊन जाण्याचे काम ‘बॉम्बे ओ ब्लड ग्रुप आॅर्गनायझेशनमार्फत’ अनेक वर्षांपासून सुरू आहे. याच भावनेतून राजस्थानमधील एका सोळावर्षीय शाळकरी मुलीला पुण्यातून विमानाने सहा तासात रक्त उपलब्ध करून देऊन तिचे प्राण वाचविले.अत्यंत दुर्मिळ असलेल्या ‘बॉम्बे ओ’ या रक्तगटातील संपूर्ण देशभरातील लोकांची संघटना बांधण्याचे काम तासगाव (जि. सांगली) येथील विक्रम यादव यांनी केली आहे. गेल्या काही वर्षात विविध राज्यांमधील तसेच परदेशातील रुग्णांचे प्राण त्यांनी त्यांच्या या संघटनेच्या माध्यमातून वाचविले आहेत. यात आणखी एका पुण्यकर्माची भर नुकतीच पडली. किशनगंज (जि. बारां, राजस्थान) येथील किशोरी मनभर या सोळावर्षीय मुलीला गावातील आरोग्य शिबिरातच अ‍ॅनिमिया आणि मलेरिया या दोन्ही आजाराने ग्रासल्याचे आढळले. तिला तातडीने कोटा शहरातील महाराव भीमसेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याठिकाणी तिच्या तपासणीत ‘बॉम्बे ओ’ हा दुर्मिळ रक्तगट तिच्यात आढळला. एकीकडे आजाराने ग्रस्त असताना, दुर्मिळ रक्तगट तिच्यात आढळल्याने डॉक्टरांची चिंता वाढली. तिचे हिमोग्लोबिनही ४ मिलिग्रॅमपर्यंत खाली आले होते.राजस्थानसह शेजारील अन्य राज्यांमध्ये त्यांनी चौकशी केली असता, हा रक्तगट त्यांना कुठेच आढळून आला नाही. त्यानंतर डॉक्टरांनी बॉम्बे ब्लड ग्रुप आॅर्गनायझेशनच्या हेल्पलाईन क्रमांकावरून सांगलीच्या विक्रम यादव यांच्याशी संपर्क साधला आणि सहा तासात मुलीला रक्त हवे असल्याचे सांगितले. यादव यांनी आपली यंत्रणा कार्यान्वित केली. पुण्यातील रक्तदाते मेधा वैद्य आणि प्रतीक माथी या दोघांना त्यांनी पुण्यातच रक्तदान करण्यास सांगितले. विमानाने ते रक्त जयपूरपर्यंत नेले आणि तिथून कारने कोटा येथील हॉस्पिटलपर्यंत पोहोचविले. वेळेत रक्त पोहोचल्यामुळे किशोरी मनभरचे प्राण वाचले.विक्रम यादव यांनी डॉक्टरांमार्फत या मुलीशी व्हिडिओ कॉलिंगद्वारे संपर्क साधला आणि तिची चौकशीही केली. या मुलीने यादव यांना धन्यवाद दिले. तिच्या चेहºयावर फुललेले हसू डॉक्टरांच्या मनातील समाधानाच्या लाटांना उधाण आणणारे ठरले. हॉस्पिटलच्या रक्तपेढीच्या प्रमुख डॉ. एच. एल. मीणा यांनीही यादव, वैद्य आणि माथी यांना धन्यवाद दिले.काय आहे ‘बॉम्बे ब्लड’मुंबईमध्ये १९५२ मध्ये वाय. एम. भेंडे नावाच्या डॉक्टरनी या रक्तगटाचा शोध लावला होता. पूर्वी मुंबईला बॉम्बे म्हटले जायचे. म्हणून या शहराचेच नाव रक्तगटाला देण्यात आले. हा सर्वात दुर्मिळ रक्तगट मानला जातो. याचे जगभरातील प्रमाण 0.000४ इतके आहे. या रक्तगटातील व्यक्तीचे रक्त अन्य लोकांना चालते, मात्र या लोकांना त्यांच्याच गटाचे रक्त लागते. त्यामुळे गंभीर स्थितीत असलेल्या रुग्णांसाठी सहजासहजी हे रक्त उपलब्ध होणे कठीण असते. त्यामुळेच यादव यांनी देशभरातील अशा गटातील लोकांची संघटना बांधली आहे. त्याचा हेल्पलाईन क्र. ९९७00१८00१ हा आहे.खर्च नव्हे, जीव महत्त्वाचा : विक्रम यादवगेल्या काही वर्षांपासून पदरमोड करून रुग्णांचे प्राण वाचविण्याचे काम बॉम्बे ब्लड ग्रुप आॅर्गनायझेशन व त्यांचे रक्तदाते करीत आहेत. राजस्थानला रक्त पाठविण्याचा खर्चही संघटनेनेच केला. याविषयी यादव म्हणाले की, खर्चापेक्षा एखाद्याचा जीव महत्त्वाचा असतो. चांगल्या विचाराचे रक्तदाते आम्हाला लाभल्यामुळे या गोष्टी शक्य होत आहेत.यांनी केली धडपड...रक्त पोहोचविण्याच्या मोहिमेत विक्रम यादव यांच्यासह हरजिंदर सिंह, सचिन सिंगला, अलोक पदकर, सागर पंडित, पुणे जनकल्याण रक्तपेढीचे संतोष अनगोळकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.