शहरं
Join us  
Trending Stories
1
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
2
'स्वतःचे अपयश लपवण्याची पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
3
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
4
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
5
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले
6
Bogus Voter: 'त्या' घरात ८०० नव्हे, पाचच सदस्यांचे वास्तव्य; जयंत पाटील यांच्या आरोपात किती सत्यता? काय आढळलं?
7
Video - ऑनलाईन ऑर्डर केलं फूड; डिलिव्हरी बॉयची अवस्था पाहून डोकंच फिरेल, दारू पिऊन...
8
RCB फॅन्स... सावधान!! विराट कोहली IPL मधून निवृत्त होणार? 'या' घटनेमुळे चर्चांना उधाण
9
खेडेगावातील लोकांसाठी परवडणाऱ्या बाईक्स, किंमत ५५ हजारांपासून सुरू; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
10
Gujarat Cabinet: मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळातील १६ मंत्र्यांनी दिला राजीनामा, गुजरातमध्ये मोठी राजकीय घडामोड
11
"मला सुटी नको, WFH द्या..."; आईच्या अपघातानंतर तरुणीची विनंती, कंपनीचा पुरावे मागत नकार
12
Laxmi Pujan 2025: दिवाळी उंबरठ्यावर, तरी लक्ष्मी पूजेच्या तारखेचा गोंधळ; पंचांग काय सांगतं?
13
Maithili Thakur News: मैथिली ठाकूर यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांचाच विरोध, अलीनगरमध्ये राजकारण का तापलं?
14
"ठाण्यात महापौर भाजपाचा बसेल, आम्ही गाफील नाही; स्वबळावर लढण्याची वेळ आली तर..."
15
बिरोबाचे दर्शन घेऊन निघाले, हल्लेखोरांनी पतीच्या पाठीत सत्तूरने केला वार; पत्नीचे मंगळसूत्र घेऊन पळाले
16
कष्टाचं फळ मिळालंच! स्मृती मानधनानं दुसऱ्यांदा जिंकला आयसीसीचा स्पेशल अवॉर्ड
17
बाजारात तेजीचा डबल धमाका! सेन्सेक्सची ८६२ अंकांची उडी; गुंतवणूकदारांनी कमावले २.०९ लाख कोटी
18
मोठा नफा कमावूनही कंपनीचा धक्कादायक निर्णय! तब्बल १६,००० कर्मचाऱ्यांना देणार नारळ
19
आशिया कप स्पर्धेत कार जिंकली; आता स्फोटक बॅटर अभिषेक शर्माला ICC कडून मिळालं मोठं बक्षीस
20
पवार कुटुंब यंदा दिवाळी साजरी करणार नाही; सुप्रिया ताईंची सोशल मीडियावर पोस्ट, कारण काय?

जिल्ह्याच्या सीमेवर पार पडला रंक्षाबंधन सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 18:42 IST

खटाव तालुक्यातील मायणी येथील माजी सरपंच प्रकाश कणसे व माहुली (ता. खानापूर, जि. सांगली) येथील सरपंच सिंधुताई माने या बहिणभावांनी नियमांचे पालन करत सातारा-सांगली जिल्ह्याच्या सीमेवरच राखी बांधून उत्सव पार पाडला.

ठळक मुद्देजिल्ह्याच्या सीमेवर पार पडला रंक्षाबंधन कोरोनामुळे सीमाबंदी : सातारा जिल्ह्यातील भावाला व सांगली जिल्ह्यातील बहिनीने बांधली चेकपोस्टवर राखी

संदीपकुंभार

मायणी : बहिण-भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणून रक्षाबंधनकडे पाहिले जाते. सध्या कोरोनाच्या पाश्वभूमीवर जिल्ह्यांच्या सीमा बंद केल्या आहेत.

खटाव तालुक्यातील मायणी येथील माजी सरपंच प्रकाश कणसे व माहुली (ता. खानापूर, जि. सांगली) येथील सरपंच सिंधुताई माने या बहिणभावांनी नियमांचे पालन करत सातारा-सांगली जिल्ह्याच्या सीमेवरच राखी बांधून उत्सव पार पाडला.

याबाबत माहिती अशी की, मिरज-भिगवण राज्यमार्गावर मायणीपासून चार किलोमीटरवर सांगली जिल्ह्याची हद्द सुरू होते. या हद्दीवर तीन-चार महिन्यांपासून पोलीस विभागाकडून तपासणी नाका उभारण्यात आला आहे.

या ठिकाणी योग्य कारण व वैद्यकीय सेवेसाठी ये-जा करणाऱ्या नागरिकांना काही तासांसाठी इकडे येण्यासाठी संबंधित चेक पोस्टवरील कर्मचारी स्वत:च्या जबाबदारीवर सोडत आहेत.

सर्वसामान्य नागरिकांना जिल्ह्याच्या सीमेवरून येणे-जाणे अडचणीचे ठरत आहे. यावर्षी रक्षाबंधन सण हा याच काळात आला आहे. त्यामुळे राखी बांधण्यासाठी जाणेही सीमावर्ती गावातील नागरिकांना मुश्कील झाले आहे. त्यामुळे मायणीचे माजी सरपंच प्रकाश कणसे यांनी माहुली (ता. खानापूर) येथील सरपंच असलेल्या आपल्या सिंधुताई माने या बहिणीला येथील चेक पोस्टवर येण्यासाठी सांगितले.

सातारा आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या तपासणी नाक्यावर आल्यानंतर बहिणीने आपल्या भावाच्या हातात राखी बांधली. हे करत असताना शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून जिल्हा बंदीचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेतली. यावेळी पोस्टवर उपस्थित असलेल्या पोलीस बांधवांनाही राखी बांधण्यात आली.सातारा-सांगली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या या तपासणी नाक्यावर अनेक नागरिक शुल्लक कारणासाठीही प्रशासनाकडे परवानगी मागत असतात. मात्र भाऊबहिणीच्या प्रेमाचा सणानिमित्तही त्यांनी या भागात थोडी परवानगी मिळत असतानाही नियमांचे पालन केले. नियमभंग कोठेही होऊ न देता प्रशासनाला विनाकारण त्रास देणाऱ्यांना चांगला संदेश दिला आहे.

आमच्या शेतजमिनी सांगली जिल्ह्याच्या हद्दीत आहेत. आमचे शेतात येणे-जाणे असते. शेतीकामासाठी प्रशासनाकडून सतत सहकार्य मिळत असते. मात्र या सणासाठी सहकार्य न मागता मी जिल्ह्याच्या सीमेवरच बहिणीला बोलून रक्षाबंधन साजरा केला.- प्रकाशकणसे,माजी सरपंच मायणी

 

तपासणी नाक्यावरून दोन किलोमीटर अंतरावरच घर असतानाही भावाने नियमांचे उल्लंघन न करता मला चेकपोस्टवर बोलून राखी बांधण्यास सांगितले. तेथेच राखी बांधून निघून गेले.- सिंधुताईमानेमाहुली, ता. खानापूर

 

 

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधनSangliसांगली