शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

जिल्ह्याच्या सीमेवर पार पडला रंक्षाबंधन सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 18:42 IST

खटाव तालुक्यातील मायणी येथील माजी सरपंच प्रकाश कणसे व माहुली (ता. खानापूर, जि. सांगली) येथील सरपंच सिंधुताई माने या बहिणभावांनी नियमांचे पालन करत सातारा-सांगली जिल्ह्याच्या सीमेवरच राखी बांधून उत्सव पार पाडला.

ठळक मुद्देजिल्ह्याच्या सीमेवर पार पडला रंक्षाबंधन कोरोनामुळे सीमाबंदी : सातारा जिल्ह्यातील भावाला व सांगली जिल्ह्यातील बहिनीने बांधली चेकपोस्टवर राखी

संदीपकुंभार

मायणी : बहिण-भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणून रक्षाबंधनकडे पाहिले जाते. सध्या कोरोनाच्या पाश्वभूमीवर जिल्ह्यांच्या सीमा बंद केल्या आहेत.

खटाव तालुक्यातील मायणी येथील माजी सरपंच प्रकाश कणसे व माहुली (ता. खानापूर, जि. सांगली) येथील सरपंच सिंधुताई माने या बहिणभावांनी नियमांचे पालन करत सातारा-सांगली जिल्ह्याच्या सीमेवरच राखी बांधून उत्सव पार पाडला.

याबाबत माहिती अशी की, मिरज-भिगवण राज्यमार्गावर मायणीपासून चार किलोमीटरवर सांगली जिल्ह्याची हद्द सुरू होते. या हद्दीवर तीन-चार महिन्यांपासून पोलीस विभागाकडून तपासणी नाका उभारण्यात आला आहे.

या ठिकाणी योग्य कारण व वैद्यकीय सेवेसाठी ये-जा करणाऱ्या नागरिकांना काही तासांसाठी इकडे येण्यासाठी संबंधित चेक पोस्टवरील कर्मचारी स्वत:च्या जबाबदारीवर सोडत आहेत.

सर्वसामान्य नागरिकांना जिल्ह्याच्या सीमेवरून येणे-जाणे अडचणीचे ठरत आहे. यावर्षी रक्षाबंधन सण हा याच काळात आला आहे. त्यामुळे राखी बांधण्यासाठी जाणेही सीमावर्ती गावातील नागरिकांना मुश्कील झाले आहे. त्यामुळे मायणीचे माजी सरपंच प्रकाश कणसे यांनी माहुली (ता. खानापूर) येथील सरपंच असलेल्या आपल्या सिंधुताई माने या बहिणीला येथील चेक पोस्टवर येण्यासाठी सांगितले.

सातारा आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या तपासणी नाक्यावर आल्यानंतर बहिणीने आपल्या भावाच्या हातात राखी बांधली. हे करत असताना शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून जिल्हा बंदीचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेतली. यावेळी पोस्टवर उपस्थित असलेल्या पोलीस बांधवांनाही राखी बांधण्यात आली.सातारा-सांगली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या या तपासणी नाक्यावर अनेक नागरिक शुल्लक कारणासाठीही प्रशासनाकडे परवानगी मागत असतात. मात्र भाऊबहिणीच्या प्रेमाचा सणानिमित्तही त्यांनी या भागात थोडी परवानगी मिळत असतानाही नियमांचे पालन केले. नियमभंग कोठेही होऊ न देता प्रशासनाला विनाकारण त्रास देणाऱ्यांना चांगला संदेश दिला आहे.

आमच्या शेतजमिनी सांगली जिल्ह्याच्या हद्दीत आहेत. आमचे शेतात येणे-जाणे असते. शेतीकामासाठी प्रशासनाकडून सतत सहकार्य मिळत असते. मात्र या सणासाठी सहकार्य न मागता मी जिल्ह्याच्या सीमेवरच बहिणीला बोलून रक्षाबंधन साजरा केला.- प्रकाशकणसे,माजी सरपंच मायणी

 

तपासणी नाक्यावरून दोन किलोमीटर अंतरावरच घर असतानाही भावाने नियमांचे उल्लंघन न करता मला चेकपोस्टवर बोलून राखी बांधण्यास सांगितले. तेथेच राखी बांधून निघून गेले.- सिंधुताईमानेमाहुली, ता. खानापूर

 

 

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधनSangliसांगली