शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

राजू शेट्टी यांना मिळाली सदाभाऊंची गुरुदक्षिणा लोकसभा-विधानसभेचे वेध : दूध आंदोलनात होतेय पाण्याचे राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 00:52 IST

‘दूध आंदोलनाशी काहीही संबंध नसलेल्यांनी आमच्यामध्ये लुडबूड करू नये’ असा टोला खासदार राजू शेट्टी यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना नाव न घेता लगावला होता.

अशोक पाटील ।इस्लामपूर : ‘दूध आंदोलनाशी काहीही संबंध नसलेल्यांनी आमच्यामध्ये लुडबूड करू नये’ असा टोला खासदार राजू शेट्टी यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना नाव न घेता लगावला होता. याला मंत्री खोत यांनीही तितकेच सडेतोडपणे उत्तर दिले आहे. ‘मीही त्यातूनच आलो आहे, आंदोलनातील दुधात किती पाणी असते, हे मला माहिती आहे,’ असा गौप्यस्फोट करून, गुरूला शिष्याने सरकारच्यावतीने गुरुदक्षिणा दिली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी आंदोलन करून साखरसम्राटांना उसाला दर देण्यास भाग पाडले. ते दोघेही एकमेकांच्या सुख-दु:खाला धावले. त्यानंतर स्वाभिमानीला भाजपचे ग्रहण लागले आणि शेट्टी-खोत संघर्ष पेटला. आता दोघांनाही लोकसभा, विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत.

खासदार शेट्टी यांनी दूध आंदोलनाच्या माध्यमातून पुन्हा शेतकऱ्यांची ताकद एकत्र केली आहे. या ताकदीला साथ देण्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेस सरसावले आहेत. परंतु शेतकरी नेते म्हणवणारे मात्र दूध आंदोलनाविरोधात आहेत. यामध्ये प्रामुख्याने दुग्धविकासमंत्री महादेव जानकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा समावेश आहे. त्यांनी शेट्टी यांना टार्गेट केले आहे. जानकर यांनी तर दूध आंदोलनात सहभागी होणाºयांना सज्जड दम दिला आहे. त्याची उलट प्रतिक्रिया खासदार राजू शेट्टी यांच्या हातकणंगले मतदार संघात उमटू लागली आहे.

यापूर्वी शेट्टी आणि खोत यांनी शेतकºयांच्या प्रश्नांवर अनेक आंदोलने केली आहेत. या आंदोलनांमध्ये नेमके काय चालते, हे दोघांनाही चांगलेच ज्ञात आहे. त्याचाच गौप्यस्फोट मंत्री खोत यांनी करून गुरूवरच कुरघोडी केली आहे. त्यामुळे रस्त्यावर ओतल्या जाणाºया दुधात किती पाणी मुरलेले असते, याचा अंदाज यावरुन लावता येऊ शकतो. एकूणच शेट्टी व खोत या दोघांनीही आता आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकºयांचा कळवळा मिळविण्यासाठी प्रयत्न चालवले असल्याचे दिसून येते. 

शेट्टी-खोत एकाच नाण्याच्या दोन बाजूकेवळ दूध उत्पादक शेतकरीच नव्हे, तर सर्वच शेतकरी अडचणीत आहेत. शेतकºयांच्या आत्महत्या सुरू आहेत. दुधाची मुबलक उपलब्धता असताना दूध आंदोलन करणे चुकीचे आहे. दूध संघांनी राजू शेट्टींना हाताशी धरुन संघाकडे दूध येणार नाही, याची व्यवस्था केलेली आहे. शेट्टी आणि खोत एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दूध संघांनी २७ रुपये दर दिला पाहिजे, याबाबत कोणीच बोलत नाही. राज्य सरकार २७ रुपये दर न देणाºया संघांवर कारवाई करत नाही, उलट शेतकºयांचे दूध संघाकडे येणार नाही, अशा पध्दतीचा शेतकरीविरोधी खेळ सुरू आहे. यापूर्वी उसाच्याबाबतीतही १०० टक्के एफआरपी कायद्याने बंधनकारक असताना, मुख्यमंत्री आणि राजू शेट्टी यांनी ८० टक्के एफआरपी दिली तरी चालेल, अशी भूमिका घेऊन कारखानदारांना खूश केले आहे. आता दूध संघांना खूश करण्यासाठी हे दूध आंदोलन सुरू आहे.- रघुनाथदादा पाटील, शेतकरी संघटना.

टॅग्स :SangliसांगलीSadabhau Khotसदाभाउ खोत Raju Shettyराजू शेट्टी