शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा अनिकेत कोथळे होऊ देणार नाही..: राजू शेट्टी -सांगलीत सर्वपक्षीय मोर्चा;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 01:37 IST

सांगली : पोलिस कोठडीत खून झालेल्या अनिकेत कोथळेच्या कुटुंबाला जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. यापुढे पुन्हा अनिकेत कोथळे होऊ देणार नाही, असा इशारा खा. राजू शेट्टी यांनी शनिवारी दिला.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांनी वर्दीतील गुंडांची साफसफाई करावी, तपास सीबीआयकडे द्यावा‘सुपारी’ घेऊन ते संशयित आरोपींचा खून करीत आहेत.

सांगली : पोलिस कोठडीत खून झालेल्या अनिकेत कोथळेच्या कुटुंबाला जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. यापुढे पुन्हा अनिकेत कोथळे होऊ देणार नाही, असा इशारा खा. राजू शेट्टी यांनी शनिवारी दिला. मुख्यमंत्र्यांनी पोलिस दलातील वर्दीतील गुंडांची साफसफाई करावी, असे आवाहनही खा. शेट्टी यांनी केले.

अनिकेत कोथळे खून प्रकरणात पोलिस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांना सहआरोपी करावे, हा तपास सीबीआयकडे द्यावा, विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करावी, या मागणीसाठी सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी खा. शेट्टी बोलत होते. विश्रामबाग चौकातील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून मोर्चास प्रारंभ झाला. खा. शेट्टी, माकपचे नेते अजित अभ्यंकर व सेवानिवृत्त पोलिस अधिकारी समशेरखान पठाण यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर त्याचे सभेत रूपांतर झाले.

खा. शेट्टी म्हणाले की, अनिकेतच्या खुनामुळे पोलिसांचा समाजातील आदरभाव संपला आहे. मुख्यमंत्र्यांकडे गृहखाते आहे. ते आज सांगली जिल्ह्यात असल्याने मोर्चा काढला आहे. मोर्चाद्वारे आमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या असतील. अशी अनेक प्रकरणे घडली आहेत. ती पोलिसांनी दाबून टाकली आहेत. विश्वनाथ घनवट, युवराज कामटेसारखे अनेक पोलिस अधिकारी आजही मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. इस्लामपूरमधील डॉक्टर कुलकर्णी दाम्पत्याच्या खुनाचा तपासही गुंडाळून टाकला. मी गेली पंधरा वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येत आहे; पण कधीही पोलिसांच्या कामात हस्तक्षेप केला नाही. पण सामान्यांवर अन्याय होत असेल तर, कधीच गप्प बसत नाही.

ते म्हणाले की, पोलिस दलातील भ्रष्ट अधिकाºयांना बाजूला केले पाहिजे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी साफसफाई करावी. खरे तर या सर्वपक्षीय मोर्चात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी झाडून सहभागी व्हायला पाहिजे होते. पण ते आले नाहीत. कारण पोलिस अधिकारी व कर्मचाºयांच्या बदल्या करण्यासाठी ते ‘सुपारी’ घेतात. त्यांचे हातही भ्रष्टाचाराने बरबटले आहेत. दर तीन वर्षांनी हे लोकप्रतिनिधी मर्जीतील जिल्हा व पोलिस ठाणे देण्यासाठी अधिकाºयांकडून खंडण्या घेतात.

या लोकप्रतिनिधींचाही बंदोबस्त करायला हवा. जोपर्यंत अनिकेतच्या कुटुंबास न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. तसेच पुन्हा अनिकेत कोथळे होऊ देणार नाही.या मोर्चात पृथ्वीराज पवार, गौतम पवार, कॉ. उमेश देशमुख, अमर पडळकर, आश्रफ वांकर, नितीन चव्हाण, महेश खराडे, महेश पाटील, आनंद देसाई, आशिष कोरी, सतीश साखळकर, रेखा पाटील आदी सहभागी झाले होते.आंदोलकांनी आणलेले ‘आज अनिकेत उद्या कोण?’, ‘आई हे पप्पांना मारून आलेत का?’, ‘हा लढा सर्वांसाठी’ असे फलक लक्षवेधी ठरत होते.सीआयडीवर विश्वास नाही : पठाणसेवानिवृत्त पोलिस अधिकारी समशेरखान पठाण म्हणाले की, अनिकेत कोथळे प्रकरणात सांगलीकरांनी लढा दिल्याने पोलिसप्रमुख व उपअधीक्षकांची बदली झाली. अनिकेतचा मृत्यू झाल्यानंतर कामटेने वरिष्ठ पोलिस अधिकाºयांशी संपर्क साधला असण्याची शक्यता आहे. कामटेचे ‘कॉल डिटेल्स’ काढून या अधिकाºयांचा शोध घ्यावा. त्यांनाही सीआयडीने आरोपी करावे. सीआयडी विभागातील अधिकारी पोलिस दलातीलच असतात. शिक्षा म्हणून त्यांची सीआयडीत बदली केली जाते. त्यामुळे सीआयडीच्या तपासावर विश्वास नाही. हा तपास सीबीआयकडे द्यावा. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी.शेट्टींच्या कडेवर प्रांजलअनिकेत कोथळेचे संपूर्ण कुटुंबही मोर्चात सहभागी झाले होते. अनिकेतची पत्नी संध्या हिच्याबरोबर तिची तीन वर्षाची मुलगी प्रांजल होती. खा. शेट्टी यांनी प्रांजलला स्वत:च्या कडेवर घेतले. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा येईपर्यंत प्रांजल शेट्टी यांच्या कडेवर होती.सुपारी घेऊन खून : अभ्यंकरमाकपचे नेते अजित अभ्यंकर म्हणाले की, अनिकेत कोथळे प्रकरणामुळे गुंडाराज व पोलिसराज यामधील फरक आता मिटला आहे. दोन हजाराच्या चोरीसाठी अनिकेतचा जीव घेतला. त्याचा मृतदेह जाळला. यावरुन पोलिसांमध्ये किती गुंडाराज आहे, याची प्रचिती येते. पोलिस गुंड व दरोडेखोर झाले आहेत. ‘सुपारी’ घेऊन ते संशयित आरोपींचा खून करीत आहेत. तत्कालीन जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे व उपअधीक्षक दीपाली काळे यांनी कामटेला मदत केली असेल तर, त्यांनाही सहआरोपी केले पाहिजे. कोथळे कुटुंबास न्याय देण्यासाठी प्रसंगी राज्यभरात लढा उभा केला जाईल.