शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
3
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
6
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
7
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
8
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
9
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
10
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
11
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
12
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
14
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
15
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
16
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
17
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
18
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
19
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
20
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 

कापूसखेडच्या राजश्रीची ‘किलिमांजारो’वर धडक; अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी फडकाविला तिरंगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2022 13:02 IST

राज्यातील सर्वोच्च असणारे कळसूबाई शिखर त्यांनी ५ वेळा सर केले आहे

इस्लामपूर : कापूसखेड (ता. वाळवा) येथील राजश्री जाधव-पाटील यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा आनंद द्विगुणीत करताना १८ तासांच्या खडतर प्रवासानंतर दक्षिण आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर मानल्या गेलेल्या किलिमांजारोवर भारतीय ध्वज फडकावला.अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला १४ ऑगस्ट रोजी त्यांनी चढाईला सुरुवात केली. १८ तासांनंतर पाच हजार ८९५ मीटर उंचीवर असलेल्या शिखरावर १५ ऑगस्टच्या सकाळी भारताचा तिरंगा फडकावला. याचवेळी त्यांनी जगाला सूर्य नमस्काराचे महत्त्व पटवून देण्यासाठी एक सूर्य नमस्कार घातला.राजश्री शिवाजीराव जाधव-पाटील या दापोली येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात नियंत्रक म्हणून काम पाहतात. महाराष्ट्र वित्त व लेखासेवा या मूळ विभागात त्या सेवेत आहेत. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून दापोलीच्या कृषी विद्यापीठात प्रतिनियुक्तीवर आल्या आहेत. या विद्यापीठाचेसुद्धा सुवर्णमहोत्सवी वर्ष सुरू आहे.त्यांनी अटलबिहारी वाजपेयी माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूटमधून गिरिभ्रमणाचे प्रशिक्षण घेतले आहे. राज्यातील सर्वोच्च असणारे कळसूबाई शिखर त्यांनी ५ वेळा सर केले आहे. प्रशासनातील अनेक महिला अधिकाऱ्यांना घेऊन त्यांनी गिरिभ्रमणाच्या मोहिमा पूर्ण केल्या आहेत. लिंगाना या चढाईसाठी कठीण समजला जाणारा किल्लाही त्यांनी सर केला आहे. सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यात रायगड प्रदक्षिणा, पन्हाळा-पावणखिंड-विशाळगड असे सलग गिरिभ्रमणही त्यांनी केले आहे. प्रतापगड, राजगड, तोरणा हे गडकिल्ले अनेकवेळा सर केले आहेत.त्यांच्या या गिरिभ्रमणाच्या मोहिमेला कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु संदीप सावंत, राजश्री शाहू अकॅडमीचे डॉ. विक्रांत पाटील, संदीप नाझरे, वैभव राजे-घाडगे आणि आई-वडिलांचे प्रोत्साहन लाभले आहे.

टॅग्स :Sangliसांगली