शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
3
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
4
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
5
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
6
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
7
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
8
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
9
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
10
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
11
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
12
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
13
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
14
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
15
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
16
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
17
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
18
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
19
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
20
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ

कोयना धरण परिसरात अतिवृष्टी, 99 टक्के भरले, सतर्क राहण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 18:10 IST

सांगली : कोयना धरण पाणीसाठा 104.72 टी.एम.सी (99 टक्के) इतका झालेला आहे. कोयना धरण परिसरात अतिवृष्टी होत असून आज ...

ठळक मुद्देकोयना धरण परिसरात अतिवृष्टी, 99 टक्के भरले, सतर्क राहण्याचे आवाहन वारणा धरणात 34.16  तर कोयना धरणामध्ये 104.72 टी.एम.सी पाणीसाठा

सांगली : कोयना धरण पाणीसाठा 104.72 टी.एम.सी (99 टक्के) इतका झालेला आहे. कोयना धरण परिसरात अतिवृष्टी होत असून आज सकाळी 10.45 वाजता कोयना धरणाचे रेडियल गेट 8 फूटाने उघडण्यात आले. पाण्याचा विसर्ग 73 हजार 63 क्युसेक्स इतका करण्यात आला आहे. तसेच वारणा धरणातील विसर्ग 3 हजार 620 क्युसेक्स इतका आहे.

यामुळे सांगली येथील सद्याच्या कृष्णा नदीच्या पात्रामधील पाण्याची पातळी 25 फूटापर्यंत वाढण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या विशेषत: वाळवा, शिराळा, मिरज, पलूस तालुक्यातील तसेच महानगरपालिका क्षेत्रातील लोकांनी सावधानता बाळगावी व नदीपात्रामध्ये कोणीही जावू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.कोयना नदीकाठची गावे, वाड्या, वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षेच्या कारणास्तव नदीपात्रात प्रवेश करु नये व सुरक्षेची काळजी घेवून सतर्क रहावे, असे आवाहन सांगली पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता नामदेव करे यांनी केले आहे. धरणामध्ये पुढील प्रमाणे पाणीसाठा व विसर्ग चालू आहे.

कोयना धरणात 104.72 टीएमसी पाणीसाठा असून हे धरण 99 टक्के भरले आहे. कोयना धरणातून 73 हजार 63 क्युसेस्क पाण्याचा विसर्ग सुरु आहे. धोम धरणात 12.82 टीएमसी पाणीसाठा असून हे धरण 95 टक्के भरले आहे. धोम धरणातून 460 क्युसेस्क पाण्याचा विसर्ग सुरु आहे. कन्हेर धरणात 9.89 टीएमसी पाणीसाठा असून हे धरण 98 टक्के भरले आहे. कन्हेर धरणातून 50 क्युसेस्क पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

उरमोडी धरणात 9.90 टीएमसी पाणीसाठा असून हे धरण 99 टक्के भरले आहे. उरमोडी धरणातून 450 क्युसेस्क पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तारळी धरणात 5.20 टीएमसी पाणीसाठा असून हे धरण 89 टक्के भरले आहे. वारणा धरणात 34.16 टीएमसी पाणीसाठा असून हे धरण 99 टक्के भरले आहे. वारणा धरणातून 3620 क्युसेस्क पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

पावसाची आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे. कोयना 71,नवजा 90,महाबळेश्वर 104,धोम 20,कन्हेर 12,उरमोडी 14,तारळी 2 वारणा 36.वारणा धरणात 34.16  तर कोयना धरणामध्ये 104.72 टी.एम.सी पाणीसाठासांगली जिल्ह्यातील वारणा धरणात दिनांक 4 सप्टेंबर रोजी सकाळी 8 पर्यंत 34.16 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.दिनांक 4 सप्टेंबर रोजीच्या सकाळी 8 वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार सातारा जिल्ह्यातील कोयना धरणामध्ये 104.72 टी.एम.सी. इतका पाणीसाठा असून धरणाची साठवण क्षमता 105.25 टी.एम.सी, आहे. धोम धरणात 12.82 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 13.50 टी.एम.सी, कन्हेर धरणात 9.89 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 10.10 टी.एम.सी. आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा धरणात 25.10 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 25.40 व राधानगरी धरणात 8.36 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 8.36 टी.एम.सी.आहे. अलमट्टी धरणाची साठवण क्षमता 123 टी.एम.सी. असून हे धरण 100 टक्के भरले असल्याचे जलसंपदा विभागामार्फत कळविण्यात आले आहे.सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे वारणा धरणातून 3620 क्युसेक्स तर कोयना धरणातून 27 हजार 659 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. अलमट्टी धरणातून 60 हजार 283 क्युसेक्स इतका विसर्ग सुरू आहे. आयर्विन पुल सांगली येथे 10 फूट 6 इंच इतकी पाण्याची पातळी आहे (धोका पातळी 45 फूट) तर अंकली पुल हरिपूर येथे 14 फूट 9 इंच इतकी पाण्याची पातळी आहे (धोका पातळी 50 फूट 3 इंच).जिल्ह्यात सरासरी 2 मि. मी. पावसाची नोंदजिल्ह्यात कालपासून आज सकाळपर्यंत सरासरी 2 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. मिरज -1.6 (494.6),जत - निरंक (183.8),खानापूर-विटा - निरंक (311.6),वाळवा-इस्लामपूर -2 (668.9),तासगाव -0.3 (378.5),शिराळा - 13.8 (1721),आटपाडी - निरंक (184.1),कवठेमहांकाळ - निरंक (289.2),पलूस - 0.3 (401.8) कडेगाव - 0.6 (664.8). 

 

टॅग्स :Koyana Damकोयना धरणSangliसांगली