शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागावर पावसाची अवकृपा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 23:28 IST

< p >अविनाश कोळी ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यात ३० जुलैअखेर झालेल्या पावसाची आकडेवारी फारशी समाधानकारक नसल्याचे दिसत आहे. गतवर्षी याच तारखेपर्यंत झालेल्या एकूण पावसाच्या तुलनेत यंदा पाच तालुक्यांमधील पावसाचे प्रमाण कमी आहे. यात दुष्काळी तालुक्यावर पावसाची सर्वात जास्त अवकृपा झाल्याचे दिसत आहे.चांगल्या पर्जन्यमानासाठी ओळखल्या जाणाऱ्या वाळवा तालुक्यातही यंदा गतवर्षाच्या ...

<p>अविनाश कोळी ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यात ३० जुलैअखेर झालेल्या पावसाची आकडेवारी फारशी समाधानकारक नसल्याचे दिसत आहे. गतवर्षी याच तारखेपर्यंत झालेल्या एकूण पावसाच्या तुलनेत यंदा पाच तालुक्यांमधील पावसाचे प्रमाण कमी आहे. यात दुष्काळी तालुक्यावर पावसाची सर्वात जास्त अवकृपा झाल्याचे दिसत आहे.चांगल्या पर्जन्यमानासाठी ओळखल्या जाणाऱ्या वाळवा तालुक्यातही यंदा गतवर्षाच्या तुलनेत कमी पाऊस नोंदला गेला आहे. ग्रामीण भाग व दुष्काळी भागाला सर्वाधिक पावसाची गरज असताना त्याठिकाणी पावसाने अपेक्षाभंग केला आहे. गतवर्षी मान्सूनपूर्व पावसाने दुष्काळी भागास मोठा दिलासा दिला होता. यंदा मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली होती, तरीही ती पुरेशी ठरली नाही. आटपाडी तालुक्याला सर्वाधिक फटका यंदाच्या पावसाळ््यात बसला. गतवर्षी ३० जुलैपर्यंत झालेल्या पावसाची आकडेवारी पाहता यंदा ७९ टक्के कमी पाऊस नोंदला गेला आहे. त्याखालोखाल जत तालुक्याची स्थिती आहे. याठिकाणी ४९ टक्के कमी पाऊस झाल्याचे चित्र आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातही गतवर्षीपेक्षा २३ टक्के कमी पाऊस नोंदला गेला आहे. तासगावमध्ये ७ टक्के कमी, तर वाळवा तालुक्यात १६ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे.सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, सांगली, मिरज, तासगावचा काही भाग पावसाकरिता पोषक म्हणून ओळखले जातात. तरीही गतवर्षीच्या तुलनेत वाळवा, तासगाव या भागात कमी पाऊस झाला आहे. केवळ पलूस, शिराळा, मिरज, विटा, कडेगाव या तालुक्यातच गतवर्षीपेक्षा चांगला पाऊस झाल्याची नोंद आहे. तुलनेत सर्वाधिक पावसाची नोंद विटा म्हणजेच खानापूर तालुक्यात झाली आहे. गतवर्षीपेक्षा ७१ टक्के अधिक पाऊस याठिकाणी नोंदला गेला. शिराळा तालुक्यात ६८ टक्के, कडेगाव तालुक्यात ६४ टक्के, मिरज तालुक्यात ६० टक्के व पलूसमध्ये ५२ टक्के गतवर्षीपेक्षा अधिक पाऊस दिसून येत आहे. सांगली शहर व परिसरात गतवर्षीपेक्षा ५७ टक्के अधिक पाऊस नोंदला गेला आहे. त्यामुळे यंदाचा पावसाळा निम्म्या जिल्ह्यास लाभदायी, तर निम्म्या जिल्ह्यास अडचणी निर्माण करणारा ठरत आहे. आॅगस्ट व सप्टेंबरमधील पावसाच्या भरवशावर आता यातील पाच जिल्ह्यांना रहावे लागेल. दुष्काळी भागात बºयाचदा परतीच्या पावसाची समाधानकारक हजेरी लागते. त्यामुळे परतीच्या पावसाकडेही या भागाचे लक्ष असेल.तालुकानिहाय तुलनात्मक पाऊसतालुका ३० जुलै ३० जुलै२०१७ २०१८इस्लामपूर २५७ २१५पलूस ८६.५ १६५.३तासगाव १२८ १२०सांगली परिसर १५० २५९शिराळा ३७९ ५६१मिरज १३७ २२८विटा १५९ २२५आटपाडी १७३ ३७कवठेमहांकाळ १८६ १४४जत २६९ १३९कडेगाव १९५ ३०६