शहरं
Join us  
Trending Stories
1
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
2
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
3
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
4
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
5
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
6
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
7
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
8
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
9
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
10
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
11
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
12
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
13
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
14
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
15
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
16
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
17
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
18
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
19
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
20
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट

सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागावर पावसाची अवकृपा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 23:28 IST

< p >अविनाश कोळी ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यात ३० जुलैअखेर झालेल्या पावसाची आकडेवारी फारशी समाधानकारक नसल्याचे दिसत आहे. गतवर्षी याच तारखेपर्यंत झालेल्या एकूण पावसाच्या तुलनेत यंदा पाच तालुक्यांमधील पावसाचे प्रमाण कमी आहे. यात दुष्काळी तालुक्यावर पावसाची सर्वात जास्त अवकृपा झाल्याचे दिसत आहे.चांगल्या पर्जन्यमानासाठी ओळखल्या जाणाऱ्या वाळवा तालुक्यातही यंदा गतवर्षाच्या ...

<p>अविनाश कोळी ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यात ३० जुलैअखेर झालेल्या पावसाची आकडेवारी फारशी समाधानकारक नसल्याचे दिसत आहे. गतवर्षी याच तारखेपर्यंत झालेल्या एकूण पावसाच्या तुलनेत यंदा पाच तालुक्यांमधील पावसाचे प्रमाण कमी आहे. यात दुष्काळी तालुक्यावर पावसाची सर्वात जास्त अवकृपा झाल्याचे दिसत आहे.चांगल्या पर्जन्यमानासाठी ओळखल्या जाणाऱ्या वाळवा तालुक्यातही यंदा गतवर्षाच्या तुलनेत कमी पाऊस नोंदला गेला आहे. ग्रामीण भाग व दुष्काळी भागाला सर्वाधिक पावसाची गरज असताना त्याठिकाणी पावसाने अपेक्षाभंग केला आहे. गतवर्षी मान्सूनपूर्व पावसाने दुष्काळी भागास मोठा दिलासा दिला होता. यंदा मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली होती, तरीही ती पुरेशी ठरली नाही. आटपाडी तालुक्याला सर्वाधिक फटका यंदाच्या पावसाळ््यात बसला. गतवर्षी ३० जुलैपर्यंत झालेल्या पावसाची आकडेवारी पाहता यंदा ७९ टक्के कमी पाऊस नोंदला गेला आहे. त्याखालोखाल जत तालुक्याची स्थिती आहे. याठिकाणी ४९ टक्के कमी पाऊस झाल्याचे चित्र आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातही गतवर्षीपेक्षा २३ टक्के कमी पाऊस नोंदला गेला आहे. तासगावमध्ये ७ टक्के कमी, तर वाळवा तालुक्यात १६ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे.सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, सांगली, मिरज, तासगावचा काही भाग पावसाकरिता पोषक म्हणून ओळखले जातात. तरीही गतवर्षीच्या तुलनेत वाळवा, तासगाव या भागात कमी पाऊस झाला आहे. केवळ पलूस, शिराळा, मिरज, विटा, कडेगाव या तालुक्यातच गतवर्षीपेक्षा चांगला पाऊस झाल्याची नोंद आहे. तुलनेत सर्वाधिक पावसाची नोंद विटा म्हणजेच खानापूर तालुक्यात झाली आहे. गतवर्षीपेक्षा ७१ टक्के अधिक पाऊस याठिकाणी नोंदला गेला. शिराळा तालुक्यात ६८ टक्के, कडेगाव तालुक्यात ६४ टक्के, मिरज तालुक्यात ६० टक्के व पलूसमध्ये ५२ टक्के गतवर्षीपेक्षा अधिक पाऊस दिसून येत आहे. सांगली शहर व परिसरात गतवर्षीपेक्षा ५७ टक्के अधिक पाऊस नोंदला गेला आहे. त्यामुळे यंदाचा पावसाळा निम्म्या जिल्ह्यास लाभदायी, तर निम्म्या जिल्ह्यास अडचणी निर्माण करणारा ठरत आहे. आॅगस्ट व सप्टेंबरमधील पावसाच्या भरवशावर आता यातील पाच जिल्ह्यांना रहावे लागेल. दुष्काळी भागात बºयाचदा परतीच्या पावसाची समाधानकारक हजेरी लागते. त्यामुळे परतीच्या पावसाकडेही या भागाचे लक्ष असेल.तालुकानिहाय तुलनात्मक पाऊसतालुका ३० जुलै ३० जुलै२०१७ २०१८इस्लामपूर २५७ २१५पलूस ८६.५ १६५.३तासगाव १२८ १२०सांगली परिसर १५० २५९शिराळा ३७९ ५६१मिरज १३७ २२८विटा १५९ २२५आटपाडी १७३ ३७कवठेमहांकाळ १८६ १४४जत २६९ १३९कडेगाव १९५ ३०६