शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

दुष्काळी भागासह जिल्ह्यात पावसाची हजेरी

By admin | Updated: June 20, 2016 00:31 IST

कवठेमहांकाळला शेतीचे बांध फुटले : जत, तासगाव, शिराळा तालुक्यासह मिरज, सांगली शहरातही रिमझिम सरी

सांगली : दुष्काळी जत, कवठेमहांकाळ तालुक्यासह तासगाव शिराळा, मिरज तालुक्यातही शनिवारी पावसाने हजेरी लावली. कवठेमहांकाळमध्ये वादळी वाऱ्याने द्राक्षबाग कोसळली, तर अनेकठिकाणी शेतीचे बांध फुटले. विद्युत तारा तुटल्यानेही हानी झाली. सांगली व मिरज शहरात तुरळक स्वरुपाचा पाऊस झाला. तासगाव शहरासह तालुक्याच्या पूर्व ग्रामीण भागाला रविवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. हा पाऊस खरड छाटणी घेतलेल्या द्राक्षबागायतदारांना सुखावणारा आहे, तर पेरणीपूर्व मशागतीसाठी तो उत्तम असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. मात्र पेरण्या जोमाने सुरू होण्यासाठी दमदार पावसाच्या अपेक्षेत शेतकरी आहे. उन्हाच्या झळा सोसलेला द्राक्षबागायतदार व सर्वसामान्य शेतकरी पावसासाठी आभाळाकडे डोळे लावून बसला होता. पाऊस नसल्याने पेरणीसाठीही शेतकरी खोळंबला होता. रविवारी सायंकाळी आभाळ दाटून आले व वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. तासगाव शहरासह तालुक्याच्या लोढे, बस्तवडे, आरवडे, वायफळे, डोंगरसोनी, सावळज, यमगरवाडी, बिरणवाड़ी, अंजनी, वडगाव, लोकरेवाडी, सावर्डे, मणेराजुरी, खुजगाव, चिंचणी, विसापूर, हातनूर, पेड़, येळावी, कवठेएकंद, बोरगाव, योगेवाड़ी, उपळावी यासह तालुक्याच्या सर्व भागात कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. द्राक्षबागांना हा पाऊस पोषक ठरत बागांच्या काड्या लवकर तयार होण्यासाठी मदत करणारा आहे. पेरणीपूर्व जमिनीच्या मशागती करण्यासाठी या पावसाची आवश्यकता होती. त्या कामांना आता वेग येण्याची शक्यता आहे. तसेच माळरानावर या पावसाने गवत उगवण्यास मदत होणार आहे. मात्र पेरण्या जोमाने सुरु होण्यासाठी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहे. जत शहर व परिसर आणि तालुक्याच्या पश्चिम भागातील कुंभारी, धावडवाडी, बागेवाडी परिसरात आज दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान सुमारे अर्धा तास दमदार पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. रविवारी दुपारी तीन वाजण्याच्यादरम्यान वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह सुमारे अर्धा तास दमदार पाऊस झाला. त्यामुळे या भागातील ओढे आणि नाल्यांना पाणी येऊन ते भरुन वाहत होते. तालुक्यातील बनाळी, जत, शेगाव, कुंभारी, बिळूर व डफळापूर भागातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरण्या केल्या आहेत. पेरण्या करण्यापुरताच पाऊस झाला होता, त्यानंतर गडबड करुन शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या. पिकासाठी या पावसाने पोषक वातावरण तयार झाले आहे. कवठेमहांकाळ : तालुक्यात दुसऱ्या दिवशीही पावसाने जोरदार हजेरी लावली. तालुक्यात सर्वत्रच दिवसभर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडल्याने नाले, ओढे भरून वाहू लागले आहेत. काही ठिकाणी शेताचे बांध फुटले, तर शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. तसेच माणसांची वर्दळ कमी झाली होती. शहरातील भाजीमंडईतही शुकशुकाट होता. रविवारी दुपारी दोन वाजल्यापासून संपूर्ण तालुक्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली. तालुक्यातील नागज, केरेवाडी, शेळकेवाडी, आगळगाव, कुची, शिरढोण, लांडगेवाडी, रांजणी, पिंपळवाडी, करोली (टी) तसेच कवठेमहांकाळ शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे शहरात रस्त्यावरून पाणीच पाणी झाले होते. पावसामुळे तहसील कार्यालयाच्या आवारात पाणी साचले होते. पिंपळवाडी व तालुक्यातील इतर काही गावातही मोठा पाऊस झाल्याने शेतीचे बांध फुटले. अनेक शेतींमध्ये पावसाच्या पाण्याने तलाव साचले होते. दिवसभर वातावरण ढगाळ होते. सूर्याचे दर्शन झाले नाही. रात्रभर पावसाच्या सरी येत होत्या. या पावसाने शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळाला आहे. तालुक्यात काहीठिकाणी विजेच्या तारा तुटल्यामुळे विद्युत पुरवठाही खंडित झाला होता.