शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सुट्ट्यांमुळे रेल्वे आरक्षण फुल्ल

By admin | Updated: March 14, 2016 00:12 IST

तिकिटे संपली : प्रवाशांची धडपड; मेअखेर स्थिती कायम राहणार

सदानंद औंधे -- मिरज  --उन्हाळी सुट्टीच्या हंगामात आरक्षित रेल्वे तिकिटांना मोठी मागणी असल्याने, लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसची मेअखेरपर्यंतची आरक्षित तिकिटे संपली आहेत. मे महिन्यात प्रवासासाठी आरक्षित रेल्वे तिकिटे मिळणे अवघड असल्याने, तात्काळ तिकिटे मिळविण्यासाठी प्रवाशांची धडपड सुरू आहे. त्यामुळे तात्काळ तिकिटे मिळवून देणाऱ्या एजंटांचा व्यवसाय जोमात आहे. उन्हाळी सुट्टीच्या हंगामातील रेल्वे तिकिटांचे आरक्षण मार्च महिन्यातच संपले आहे. तिकिटांची प्रतीक्षा यादी मोठी असल्याने रेल्वे प्रवासी हैराण झाले आहेत. सुट्टीच्या हंगामात लांबच्या प्रवासासाठी रेल्वे हाच स्वस्त व सोयीचा पर्याय असल्याने रेल्वे तिकीट खिडकीवर मोठी गर्दी आहे. मिरज रेल्वे स्थानकातून दररोज ६५ पॅसेंजर व एक्स्प्रेस रेल्वेगाड्या ये- जा करतात. सुट्टीच्या हंगामात एप्रिल व मे महिन्यात रेल्वे प्रवासासाठी मोठी गर्दी असते. मिरजेतून सुटणाऱ्या पुणे, बेळगाव, कुर्डूवाडी, पंढरपूर, परळी या पॅसेंजर गाड्यांना मोठी गर्दी आहे. गोवा, दिल्ली, अजमेर, गांधीधाम, बेंगलोर, नागपूर, मुंबई, तिरुपतीला जाणाऱ्या एक्स्प्रेसची मेअखेरची आरक्षित तिकिटे संपली आहेत. आरक्षित तिकिटांची प्रतीक्षा यादी दोनशेवर पोहोचल्याने तात्काळ तिकिटांना मागणी आहे. तात्काळ तिकिटांसाठी मागणीप्रमाणे प्रिमियम दर लागू असल्याने, दुप्पट व तिप्पट दराने तात्काळ तिकिटे घ्यावी लागणार आहेत. महागड्या तात्काळ तिकिटांसाठीही प्रतीक्षा यादी असल्याने प्रवाशांची निराशा होत आहे. दिल्ली, अजमेर, गांधीधाम, एर्नाकुलम, तिरूनेलवेल्ली, चंदीगड, बेंगलोर, अहमदाबाद या नियमित व साप्ताहिक एक्स्प्रेससाठी मोठी प्रतीक्षा यादी आहे. मोठ्या प्रमाणात मागणीमुळे मे महिन्याच्या सुट्टीतील आरक्षित तिकिटे संपली आहेत. मागणीप्रमाणे दर वाढणाऱ्या प्रिमियम तात्काळ तिकिटांमुळे रेल्वेच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली असली तरी, प्रवाशांना त्याचा फटका बसत आहे. गर्दी असलेल्या रेल्वे गाड्यांची तात्काळ तिकिटे एजंटांकडून मिळविण्यासाठी पाचशे ते हजार रुपये जादा मोजावे लागत आहेत. वातानुकूलित दर्जाची तात्काळ तिकिटे मिळणे तर अशक्यच झाले आहे. वातानुकूलित दर्जाच्या आरक्षित तिकिटांसाठी हजारो रूपये जादा द्यावे लागत आहेत. आरक्षित तिकिटे तीन महिने अगोदर मिळत असल्याने जून महिन्यातील पहिल्या आठवड्यापर्यंतचे आरक्षण संपले आहे. एजंटांचा कब्जा...अनधिकृत तिकीट एजंट व रेल्वे कर्मचाऱ्यांच्या साखळीमुळे सर्वसामान्य प्रवाशांना तात्काळ आरक्षित तिकीट मिळणे दुरापास्त ठरले आहे. रेल्वेच्या आरक्षित तिकिटांचा काळाबाजार थांबविण्यासाठीच्या उपाययोजना फोल ठरल्या आहेत. केवळ पंधरा मिनिटात संपणारी तात्काळ तिकिटे मिळविण्यासाठी एजंटांचा स्थानकातील तिकीट खिडक्यांवर कब्जा आहे.