शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

..तरच शेतकरी वाचणार; केंद्र, राज्य सरकारवर रघुनाथदादा पाटील यांचे टीकास्त्र

By अशोक डोंबाळे | Updated: August 4, 2023 19:05 IST

इस्लामपुरात ९ ऑगस्टला चंद्रशेखर राव यांचा सन्मान सोहळा

सांगली : ऊस, दूध आणि शेतमालाच्या भावात पिळवणूक होत असल्याने शेतकऱ्यांपुढील आर्थिक संकट वाढले आहे. ‘इंडिया’विरुद्ध ‘भारत’ ही लढाई मागील ७० वर्षांपासून सुरू असली तरी त्यामध्ये शेतकऱ्यांचा पराभव झाला आहे. आता केंद्र आणि राज्यातील सरकार हाकलले तरच शेतकरी वाचतील, अशी टीका शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी शुक्रवारी सांगलीतील पत्रकार परिषदेत केली. इस्लामपूर येथे दि. ९ ऑगस्ट रोजी शेतकरी आत्महत्यांचा कलंक पुसण्यासाठी आपकी बार किसान सरकार आणण्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचा सन्मान सोहळा आयोजित केल्याचेही त्यांनी सांगितले.पाटील म्हणाले, २०१३ मध्ये तेलंगणा राज्याच्या निर्मितीनंतर इतर राज्यांप्रमाणे तेलंगणा राज्यातही शेतकरी आत्महत्या सुरू होत्या. शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून के. चंद्रशेखर राव यांनी धोरण राबवायला सुरुवात केली. सर्वप्रथम त्यांनी शेतीला पाणी, मोफत वीज देण्याचा धाडसी निर्णय घेतला. खरीप आणि रब्बी हंगामात पेरणीपूर्व एकरी १० हजार रुपये थेट रोख मदत शेतकऱ्यांना केली. नैसर्गिक मृत्यू झाल्यास एकरकमी पाच लाख रुपये सानुग्रह अनुदान दिले. परिणामी, तेलंगणा राज्यावरील शेतकरी आत्महत्यांचा कलंक पुसला गेला. मराठवाड्याचे माजी महसूल आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी केलेल्या अहवालात सुमारे एक लाख शेतकरी आत्महत्येच्या विचाराने ग्रासले असल्याचे नमूद केले. त्यांनी तेलंगणा सरकारप्रमाणे एकरी १० हजार रुपये मदत करण्याची शिंदे-फडणवीस सरकारला शिफारस केली. मात्र, सरकारने ही शिफारस धुडकावून लावली आहे. शेतकरी विरोधी काम करणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारला आता जागा दाखविण्याची वेळ आली आहे.

मागील ७५ वर्षांत आमदार, खासदारांनी राबविलेल्या चुकीच्या धोरणामुळे देशाला शेतकरी आत्महत्यांचा कलंक लागला आहे. त्याला समर्थन देण्यासाठी इस्लामपुरात ९ ऑगस्ट रोजी चंद्रशेखर राव यांचा सन्मान सोहळा आयोजित केला असल्याचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सांगितले. यावेळी बी. जी. पाटील, महिला संघटनेच्या वंदना माळी, शर्वरी पवार उपस्थित होत्या.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीGovernmentसरकारCentral Governmentकेंद्र सरकार