शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
2
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
3
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
4
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी
5
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
6
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
7
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
8
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
9
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
10
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
11
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
12
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
13
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
14
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
15
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
16
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
17
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
18
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
19
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
20
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!

..तरच शेतकरी वाचणार; केंद्र, राज्य सरकारवर रघुनाथदादा पाटील यांचे टीकास्त्र

By अशोक डोंबाळे | Updated: August 4, 2023 19:05 IST

इस्लामपुरात ९ ऑगस्टला चंद्रशेखर राव यांचा सन्मान सोहळा

सांगली : ऊस, दूध आणि शेतमालाच्या भावात पिळवणूक होत असल्याने शेतकऱ्यांपुढील आर्थिक संकट वाढले आहे. ‘इंडिया’विरुद्ध ‘भारत’ ही लढाई मागील ७० वर्षांपासून सुरू असली तरी त्यामध्ये शेतकऱ्यांचा पराभव झाला आहे. आता केंद्र आणि राज्यातील सरकार हाकलले तरच शेतकरी वाचतील, अशी टीका शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी शुक्रवारी सांगलीतील पत्रकार परिषदेत केली. इस्लामपूर येथे दि. ९ ऑगस्ट रोजी शेतकरी आत्महत्यांचा कलंक पुसण्यासाठी आपकी बार किसान सरकार आणण्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचा सन्मान सोहळा आयोजित केल्याचेही त्यांनी सांगितले.पाटील म्हणाले, २०१३ मध्ये तेलंगणा राज्याच्या निर्मितीनंतर इतर राज्यांप्रमाणे तेलंगणा राज्यातही शेतकरी आत्महत्या सुरू होत्या. शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून के. चंद्रशेखर राव यांनी धोरण राबवायला सुरुवात केली. सर्वप्रथम त्यांनी शेतीला पाणी, मोफत वीज देण्याचा धाडसी निर्णय घेतला. खरीप आणि रब्बी हंगामात पेरणीपूर्व एकरी १० हजार रुपये थेट रोख मदत शेतकऱ्यांना केली. नैसर्गिक मृत्यू झाल्यास एकरकमी पाच लाख रुपये सानुग्रह अनुदान दिले. परिणामी, तेलंगणा राज्यावरील शेतकरी आत्महत्यांचा कलंक पुसला गेला. मराठवाड्याचे माजी महसूल आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी केलेल्या अहवालात सुमारे एक लाख शेतकरी आत्महत्येच्या विचाराने ग्रासले असल्याचे नमूद केले. त्यांनी तेलंगणा सरकारप्रमाणे एकरी १० हजार रुपये मदत करण्याची शिंदे-फडणवीस सरकारला शिफारस केली. मात्र, सरकारने ही शिफारस धुडकावून लावली आहे. शेतकरी विरोधी काम करणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारला आता जागा दाखविण्याची वेळ आली आहे.

मागील ७५ वर्षांत आमदार, खासदारांनी राबविलेल्या चुकीच्या धोरणामुळे देशाला शेतकरी आत्महत्यांचा कलंक लागला आहे. त्याला समर्थन देण्यासाठी इस्लामपुरात ९ ऑगस्ट रोजी चंद्रशेखर राव यांचा सन्मान सोहळा आयोजित केला असल्याचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सांगितले. यावेळी बी. जी. पाटील, महिला संघटनेच्या वंदना माळी, शर्वरी पवार उपस्थित होत्या.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीGovernmentसरकारCentral Governmentकेंद्र सरकार