शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

मान्सून राज्यातून गेल्याने जत तालुक्यात रब्बी हंगाम धोक्यात-

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 23:59 IST

संपूर्ण राज्यातून नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) शनिवार, दि. ६ आॅक्टोबर रोजी परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले, तर सोमवार, दि. ८ आॅक्टोबर रोजी मान्सूनने संपूर्ण देशाचा निरोप घेतला आहे.

ठळक मुद्देदुष्काळी भाग चिंताग्रस्त : पाणीटंचाई आणखी तीव्र

बिळूर : संपूर्ण राज्यातून नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) शनिवार, दि. ६ आॅक्टोबर रोजी परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले, तर सोमवार, दि. ८ आॅक्टोबर रोजी मान्सूनने संपूर्ण देशाचा निरोप घेतला आहे. त्यामुळे परतीच्या पावसाची आशा धुसर बनली असून, जत तालुक्यात रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. आधीच पिण्याच्या पाण्याची तीव्रता वाढली असून, त्यात आता आणखी भर पडणार आहे. प्रशासन पिण्याच्या पाण्याच्या टँकरला केराची टोपली दाखवत असतानाच, पाणी योजनाही ठप्प असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

दरम्यान, सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ, ताकारी, टेंभू योजना आताच सुरू करून जिल्ह्यातील तलाव पाण्याने भरून घेतल्यास पाणीटंचाईची तीव्रता कमी होण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातल्या आमदार-खासदारांनी याकडे अधिक लक्ष देऊन पाणी योजना सुरू करण्याबाबत सकारात्मक भूमिका घ्यायला हवी, अन्यथा जिल्ह्याला तीव्र दुष्काळाला सामोरे जावे लागेल, अशी भीती व्यक्त होत आहे.

शनिवारी मान्सूनने छत्तीसगड, महाराष्ट्र, तेलंगणाचा संपूर्ण भाग, आंध्र प्रदेशचा किनारपट्टीचा भाग, रायलसीमा आणि कर्नाटकच्या आणखी काही भागांतून माघार घेतली. यंदाच्या हंगामात ८ जून रोजी दाखल झालेल्या मान्सूनने २३ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्र व्यापला होता. जवळपास चार महिने मान्सूनचे राज्यात अस्तित्व होते. शुक्रवार, दि. ५ रोजी निम्म्या महाराष्ट्रातून माघार घेतल्यानंतर शनिवार, दि. ६ रोजी संपूर्ण राज्यातून मान्सून परतला आहे. मागील आठ वर्षांची मान्सूनची वाटचाल पाहता, यंदा मान्सूनने राज्यातून लवकर काढता पाय घेतला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २०१७ आणि २०११ मध्ये २४ आॅक्टोबर रोजी, २०१३ मध्ये २१ आॅक्टोबर, २०१२ व २०१५ मध्ये १५ आॅक्टोबर, २०१४ मध्ये १८ आॅक्टोबर, तर २०१६ मध्ये १६ आॅक्टोबर रोजी मान्सून महाराष्ट्रातून परतला होता.मान्सून परतताच दुष्काळी जत तालुका आणि परिसरातील कमाल तापमानात वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे उकाडा वाढला आहे. ‘आॅक्टोबर हिट’ने लोक घामाघूम होऊ लागले आहेत. सायंकाळी गार वारे वाहायला सुरुवात झाली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीSangliसांगली