शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
2
"आता ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनही जाणार यांच्या पक्षात, कारण...!"; राऊतांचा भाजपाला बोचरा टोमणा 
3
महायुतीत खदखद वाढली, इच्छुकांच्या नाराजीचा भूकंप?; काठावर बसलेले मविआच्या संपर्कात
4
Municipal Corporation Election: विदर्भात महायुतीचे ठरले! चार महापालिकांत शिंदेसेना, तर दोन ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत
5
बांगलादेशात क्रूरतेचा कळस! दीपू दास हत्याकांडात ४ आरोपींची गुन्ह्याची कबुली; पोलीस म्हणाले...
6
किडनी विक्रीतून रामकृष्णने घेतली २० एकर जमीन; फेसबुक ग्रुपद्वारे विणले अवयव तस्करीसाठी एजंटांचे जाळे
7
नव्या वर्षापासून UPI साठी लागू होणार नवा नियम; ई-कॉमर्स कंपन्यांच्या चलाखीवर बसणार चाबूक, प्रकरण काय?
8
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये जाणार की उद्धवसेनेत?; उद्धव ठाकरेंचा फोन, पुण्यात राजकीय ट्विस्ट
9
नवीन वर्षात गुंतवणुकीचा श्रीगणेशा! 'या' आहेत श्रीमंत करणाऱ्या टॉप ५ योजना; सुरक्षा आणि दमदार परतावा
10
खोपोलीत शिंदेसेनेच्या नगरसेविकेच्या पतीची हत्या! मुलाला शाळेत सोडून परत येत असताना केला हल्ला
11
Vijay Hazare Trophy : कोण आहे Devendra Bora? ज्याच्यासमोर हिटमॅन रोहित 'गोल्डन डक'सह ठरला फ्लॉप
12
भारतातील युपीआय व्यवहारांत मोठी प्रादेशिक दरी; महाराष्ट्र अग्रस्थानी तर बिहार पिछाडीवर, कारण काय?
13
तुमची इंडिगो फ्लाइट रद्द झाली होती का? आजपासून १०,००० रुपयांचे व्हाउचर मिळणार
14
Video : पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम उरकला अन् शोभेसाठी लावलेल्या झाडाच्या कुंड्या लोकांनी पळवल्या!
15
२७ महापालिकांत कुणाचे किती नगरसेवक? गेल्यावेळी भाजपचे...; ४३९ जागा जिंकून काँग्रेस होती तिसऱ्या क्रमांकावर
16
Stock Markets Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; Sensex १५० अंकांनी घरसला, BEL टॉप गेनर
17
विकी-कतरिनाच्या लेकाचा पहिला ख्रिसमस, अभिनेत्रीने शेअर केला फोटो; चाहते म्हणाले...
18
Investment Tips For Working Women: नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
19
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
20
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
Daily Top 2Weekly Top 5

मान्सून राज्यातून गेल्याने जत तालुक्यात रब्बी हंगाम धोक्यात-

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 23:59 IST

संपूर्ण राज्यातून नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) शनिवार, दि. ६ आॅक्टोबर रोजी परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले, तर सोमवार, दि. ८ आॅक्टोबर रोजी मान्सूनने संपूर्ण देशाचा निरोप घेतला आहे.

ठळक मुद्देदुष्काळी भाग चिंताग्रस्त : पाणीटंचाई आणखी तीव्र

बिळूर : संपूर्ण राज्यातून नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) शनिवार, दि. ६ आॅक्टोबर रोजी परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले, तर सोमवार, दि. ८ आॅक्टोबर रोजी मान्सूनने संपूर्ण देशाचा निरोप घेतला आहे. त्यामुळे परतीच्या पावसाची आशा धुसर बनली असून, जत तालुक्यात रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. आधीच पिण्याच्या पाण्याची तीव्रता वाढली असून, त्यात आता आणखी भर पडणार आहे. प्रशासन पिण्याच्या पाण्याच्या टँकरला केराची टोपली दाखवत असतानाच, पाणी योजनाही ठप्प असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

दरम्यान, सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ, ताकारी, टेंभू योजना आताच सुरू करून जिल्ह्यातील तलाव पाण्याने भरून घेतल्यास पाणीटंचाईची तीव्रता कमी होण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातल्या आमदार-खासदारांनी याकडे अधिक लक्ष देऊन पाणी योजना सुरू करण्याबाबत सकारात्मक भूमिका घ्यायला हवी, अन्यथा जिल्ह्याला तीव्र दुष्काळाला सामोरे जावे लागेल, अशी भीती व्यक्त होत आहे.

शनिवारी मान्सूनने छत्तीसगड, महाराष्ट्र, तेलंगणाचा संपूर्ण भाग, आंध्र प्रदेशचा किनारपट्टीचा भाग, रायलसीमा आणि कर्नाटकच्या आणखी काही भागांतून माघार घेतली. यंदाच्या हंगामात ८ जून रोजी दाखल झालेल्या मान्सूनने २३ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्र व्यापला होता. जवळपास चार महिने मान्सूनचे राज्यात अस्तित्व होते. शुक्रवार, दि. ५ रोजी निम्म्या महाराष्ट्रातून माघार घेतल्यानंतर शनिवार, दि. ६ रोजी संपूर्ण राज्यातून मान्सून परतला आहे. मागील आठ वर्षांची मान्सूनची वाटचाल पाहता, यंदा मान्सूनने राज्यातून लवकर काढता पाय घेतला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २०१७ आणि २०११ मध्ये २४ आॅक्टोबर रोजी, २०१३ मध्ये २१ आॅक्टोबर, २०१२ व २०१५ मध्ये १५ आॅक्टोबर, २०१४ मध्ये १८ आॅक्टोबर, तर २०१६ मध्ये १६ आॅक्टोबर रोजी मान्सून महाराष्ट्रातून परतला होता.मान्सून परतताच दुष्काळी जत तालुका आणि परिसरातील कमाल तापमानात वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे उकाडा वाढला आहे. ‘आॅक्टोबर हिट’ने लोक घामाघूम होऊ लागले आहेत. सायंकाळी गार वारे वाहायला सुरुवात झाली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीSangliसांगली