शहरं
Join us  
Trending Stories
1
"अब की बार ४०० पार’’, या ३ एक्झिट पोलनी वर्तवला मोदी आणि एनडीएच्या बंपर विजयाचा अंदाज
2
राज्यातील ६ मतदारसंघांमध्ये लागणार सर्वाधिक धक्कादायक निकाल;'जायंट किलर' ठरू शकतात 'हे' उमेदवार
3
 ‘चाणक्य’चा मविआला धक्का, इंडिया टुडेच्या पोलनेही टेन्शन वाढवलं, महायुती जिंकणार तब्बल एवढ्या जागा
4
Exit Poll Result: बारामतीसह इतर ठिकाणीही अजित पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या जागांचा 'असा' आहे अंदाज
5
सांगली लोकसभेत मोठा धमाका होणार; कोण आघाडीवर? एक्झिट पोलचे आकडे आले समोर
6
T20 WC 24, IND vs BAN Live : हार्दिक पांड्याचा रूद्रावतार; पंतचे अर्धशतक, भारतासाठी खुशखबर
7
कोल्हापूर, हातकणंगलेत कोण आघाडीवर? महायुतीला धक्का? एक्झिट पोलमध्ये कोण आघाडीवर
8
वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ अमेरिकेत दाखल; गावस्करांना पाहून बाबरनं काय केलं? Video
9
दिल्लीत आप-काँग्रेस आघाडी, केजरीवाल यांचं सहानुभूतीचं राजकारण निष्प्रभ, भाजपा पुन्हा मारणार बाजी
10
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
11
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
12
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
13
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
14
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
15
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
16
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
17
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
18
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!
19
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
20
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 

महापुरामुळे झालेल्या नुकसानीचे 13 हजार 515 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पुर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2021 2:24 PM

Flood Sangli : जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे सांगली जिल्ह्यात शेतीचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत असून जिल्हयात महापूरामुळे बाधित झालेल्या 5 तालुक्यांतील 176 गावांमधील आतापर्यंत 39 हजार 509 शेतकऱ्यांच्या 13 हजार 515 हेक्टर जमीनींचे पंचनामे पुर्ण झाली आहेत. उर्वरित शेतीचे पंचनामे युध्दपातळीवर पुर्ण करण्यासाठी यंत्रणा गतीने कार्यरत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले आहे.

ठळक मुद्देमहापुरामुळे झालेल्या नुकसानीचे 13 हजार 515 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पुर्णजिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली माहिती

सांगली : जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे सांगली जिल्ह्यात शेतीचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत असून जिल्हयात महापूरामुळे बाधित झालेल्या 5 तालुक्यांतील 176 गावांमधील आतापर्यंत 39 हजार 509 शेतकऱ्यांच्या 13 हजार 515 हेक्टर जमीनींचे पंचनामे पुर्ण झाली आहेत. उर्वरित शेतीचे पंचनामे युध्दपातळीवर पुर्ण करण्यासाठी यंत्रणा गतीने कार्यरत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले आहे.जिल्ह्यात महापुरामुळे तसेच अतिवृष्टीमुळे, ओढ्यांना जादा पाणी आल्याने मिरज, वाळवा, पलूस, तासगाव व शिराळा या पाच तालुक्यातील 247 गावे बाधित झाले आहेत. शासन निर्देशानुसार बाधित गावातील नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे युद्धपातळीवर करण्यात येत आहेत.

यामध्ये मिरज तालुक्यातील 26 गावे बाधित झाली असून त्यापैकी 21 गावांतील 9 हजार 561 शेतकऱ्याचे 4 हजार 227 हेक्टरचे प्रत्यक्ष पंचनामे पुर्ण झाली आहेत. वाळवा तालुक्यातील 98 गावे बाधित झाली असून त्यापैकी 43 गावांतील 11 हजार 119 शेतकऱ्याचे 4 हजार 42 हेक्टरचे प्रत्यक्ष पंचनामे पुर्ण झाली आहेत. शिराळा तालुक्यातील 95 गावे बाधित झाली असून त्यापैकी 87 गावांतील 13 हजार 39 शेतकऱ्याचे 2 हजार 459 हेक्टरचे प्रत्यक्ष पंचनामे पुर्ण झाली आहेत.

पलूस तालुक्यातील 26 गावे बाधित झाली असून त्यापैकी 23 गावांतील 5 हजार 727 शेतकऱ्याचे 2 हजार 757 हेक्टरचे प्रत्यक्ष पंचनामे पुर्ण झाली आहेत. तासगाव तालुक्यातील 2 गावे बाधित झाली असून तेथील 63 शेतकऱ्याचे 27 हेक्टरचे प्रत्यक्ष पंचनामे पुर्ण झाली आहेत.शासन निर्देशानूसार बाधित गावांतील कुटुंबे, कृषी, पशुधन व व्यवसायीक नुकसानीचे युध्द पातळीवर करण्यात येत आहेत. आज अखेर 22 हजार 185 कुटुंबांचे पंचनामे करण्यात आले आहेत.

पंचनाम्यानूसार पुर्णत: नष्ट झालेली कच्ची घरे 374 व पक्की घरे 106, अंशत: नष्ट झालेली कच्ची घरे 1 हजार 280 व पक्की घरे 492, तसेच 36 झोपड्या, 839 गोठ्यांचे पंचनामे पुर्ण झाली आहेत. त्याचबरोबर आजआखेर 27 कारागिरांचे सहयंत्राचे, 39 कारांगिरांचे कच्चा व तयार मालाचे, 2 हजार 983 छोटे उद्योग, छोटी दुकाने, टपरीधारक, हातगाडीधारक इत्यादींच्या पंचनाम्यानूसार नुकसान दिसून आले आहे, अशी माहितीही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली आहे. 

टॅग्स :floodपूरcollectorजिल्हाधिकारीSangliसांगली