शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

महापुरामुळे झालेल्या नुकसानीचे 13 हजार 515 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पुर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2021 14:26 IST

Flood Sangli : जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे सांगली जिल्ह्यात शेतीचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत असून जिल्हयात महापूरामुळे बाधित झालेल्या 5 तालुक्यांतील 176 गावांमधील आतापर्यंत 39 हजार 509 शेतकऱ्यांच्या 13 हजार 515 हेक्टर जमीनींचे पंचनामे पुर्ण झाली आहेत. उर्वरित शेतीचे पंचनामे युध्दपातळीवर पुर्ण करण्यासाठी यंत्रणा गतीने कार्यरत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले आहे.

ठळक मुद्देमहापुरामुळे झालेल्या नुकसानीचे 13 हजार 515 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पुर्णजिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली माहिती

सांगली : जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे सांगली जिल्ह्यात शेतीचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत असून जिल्हयात महापूरामुळे बाधित झालेल्या 5 तालुक्यांतील 176 गावांमधील आतापर्यंत 39 हजार 509 शेतकऱ्यांच्या 13 हजार 515 हेक्टर जमीनींचे पंचनामे पुर्ण झाली आहेत. उर्वरित शेतीचे पंचनामे युध्दपातळीवर पुर्ण करण्यासाठी यंत्रणा गतीने कार्यरत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले आहे.जिल्ह्यात महापुरामुळे तसेच अतिवृष्टीमुळे, ओढ्यांना जादा पाणी आल्याने मिरज, वाळवा, पलूस, तासगाव व शिराळा या पाच तालुक्यातील 247 गावे बाधित झाले आहेत. शासन निर्देशानुसार बाधित गावातील नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे युद्धपातळीवर करण्यात येत आहेत.

यामध्ये मिरज तालुक्यातील 26 गावे बाधित झाली असून त्यापैकी 21 गावांतील 9 हजार 561 शेतकऱ्याचे 4 हजार 227 हेक्टरचे प्रत्यक्ष पंचनामे पुर्ण झाली आहेत. वाळवा तालुक्यातील 98 गावे बाधित झाली असून त्यापैकी 43 गावांतील 11 हजार 119 शेतकऱ्याचे 4 हजार 42 हेक्टरचे प्रत्यक्ष पंचनामे पुर्ण झाली आहेत. शिराळा तालुक्यातील 95 गावे बाधित झाली असून त्यापैकी 87 गावांतील 13 हजार 39 शेतकऱ्याचे 2 हजार 459 हेक्टरचे प्रत्यक्ष पंचनामे पुर्ण झाली आहेत.

पलूस तालुक्यातील 26 गावे बाधित झाली असून त्यापैकी 23 गावांतील 5 हजार 727 शेतकऱ्याचे 2 हजार 757 हेक्टरचे प्रत्यक्ष पंचनामे पुर्ण झाली आहेत. तासगाव तालुक्यातील 2 गावे बाधित झाली असून तेथील 63 शेतकऱ्याचे 27 हेक्टरचे प्रत्यक्ष पंचनामे पुर्ण झाली आहेत.शासन निर्देशानूसार बाधित गावांतील कुटुंबे, कृषी, पशुधन व व्यवसायीक नुकसानीचे युध्द पातळीवर करण्यात येत आहेत. आज अखेर 22 हजार 185 कुटुंबांचे पंचनामे करण्यात आले आहेत.

पंचनाम्यानूसार पुर्णत: नष्ट झालेली कच्ची घरे 374 व पक्की घरे 106, अंशत: नष्ट झालेली कच्ची घरे 1 हजार 280 व पक्की घरे 492, तसेच 36 झोपड्या, 839 गोठ्यांचे पंचनामे पुर्ण झाली आहेत. त्याचबरोबर आजआखेर 27 कारागिरांचे सहयंत्राचे, 39 कारांगिरांचे कच्चा व तयार मालाचे, 2 हजार 983 छोटे उद्योग, छोटी दुकाने, टपरीधारक, हातगाडीधारक इत्यादींच्या पंचनाम्यानूसार नुकसान दिसून आले आहे, अशी माहितीही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली आहे. 

टॅग्स :floodपूरcollectorजिल्हाधिकारीSangliसांगली