शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

महापुरामुळे झालेल्या नुकसानीचे 13 हजार 515 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पुर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2021 14:26 IST

Flood Sangli : जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे सांगली जिल्ह्यात शेतीचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत असून जिल्हयात महापूरामुळे बाधित झालेल्या 5 तालुक्यांतील 176 गावांमधील आतापर्यंत 39 हजार 509 शेतकऱ्यांच्या 13 हजार 515 हेक्टर जमीनींचे पंचनामे पुर्ण झाली आहेत. उर्वरित शेतीचे पंचनामे युध्दपातळीवर पुर्ण करण्यासाठी यंत्रणा गतीने कार्यरत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले आहे.

ठळक मुद्देमहापुरामुळे झालेल्या नुकसानीचे 13 हजार 515 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पुर्णजिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली माहिती

सांगली : जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे सांगली जिल्ह्यात शेतीचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत असून जिल्हयात महापूरामुळे बाधित झालेल्या 5 तालुक्यांतील 176 गावांमधील आतापर्यंत 39 हजार 509 शेतकऱ्यांच्या 13 हजार 515 हेक्टर जमीनींचे पंचनामे पुर्ण झाली आहेत. उर्वरित शेतीचे पंचनामे युध्दपातळीवर पुर्ण करण्यासाठी यंत्रणा गतीने कार्यरत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले आहे.जिल्ह्यात महापुरामुळे तसेच अतिवृष्टीमुळे, ओढ्यांना जादा पाणी आल्याने मिरज, वाळवा, पलूस, तासगाव व शिराळा या पाच तालुक्यातील 247 गावे बाधित झाले आहेत. शासन निर्देशानुसार बाधित गावातील नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे युद्धपातळीवर करण्यात येत आहेत.

यामध्ये मिरज तालुक्यातील 26 गावे बाधित झाली असून त्यापैकी 21 गावांतील 9 हजार 561 शेतकऱ्याचे 4 हजार 227 हेक्टरचे प्रत्यक्ष पंचनामे पुर्ण झाली आहेत. वाळवा तालुक्यातील 98 गावे बाधित झाली असून त्यापैकी 43 गावांतील 11 हजार 119 शेतकऱ्याचे 4 हजार 42 हेक्टरचे प्रत्यक्ष पंचनामे पुर्ण झाली आहेत. शिराळा तालुक्यातील 95 गावे बाधित झाली असून त्यापैकी 87 गावांतील 13 हजार 39 शेतकऱ्याचे 2 हजार 459 हेक्टरचे प्रत्यक्ष पंचनामे पुर्ण झाली आहेत.

पलूस तालुक्यातील 26 गावे बाधित झाली असून त्यापैकी 23 गावांतील 5 हजार 727 शेतकऱ्याचे 2 हजार 757 हेक्टरचे प्रत्यक्ष पंचनामे पुर्ण झाली आहेत. तासगाव तालुक्यातील 2 गावे बाधित झाली असून तेथील 63 शेतकऱ्याचे 27 हेक्टरचे प्रत्यक्ष पंचनामे पुर्ण झाली आहेत.शासन निर्देशानूसार बाधित गावांतील कुटुंबे, कृषी, पशुधन व व्यवसायीक नुकसानीचे युध्द पातळीवर करण्यात येत आहेत. आज अखेर 22 हजार 185 कुटुंबांचे पंचनामे करण्यात आले आहेत.

पंचनाम्यानूसार पुर्णत: नष्ट झालेली कच्ची घरे 374 व पक्की घरे 106, अंशत: नष्ट झालेली कच्ची घरे 1 हजार 280 व पक्की घरे 492, तसेच 36 झोपड्या, 839 गोठ्यांचे पंचनामे पुर्ण झाली आहेत. त्याचबरोबर आजआखेर 27 कारागिरांचे सहयंत्राचे, 39 कारांगिरांचे कच्चा व तयार मालाचे, 2 हजार 983 छोटे उद्योग, छोटी दुकाने, टपरीधारक, हातगाडीधारक इत्यादींच्या पंचनाम्यानूसार नुकसान दिसून आले आहे, अशी माहितीही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली आहे. 

टॅग्स :floodपूरcollectorजिल्हाधिकारीSangliसांगली