शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
4
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
5
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
6
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
7
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
8
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
9
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
10
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
11
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
13
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
14
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
15
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
16
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
17
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
18
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
19
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
20
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत

Maharashtra Election 2019 : युतीच्या कारभारास जनता कंटाळली : बाळासाहेब थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 15:50 IST

: कडेगाव-पलूस मतदारसंघ विधायक कामातून महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्र बनला आहे. ही विकासकामे करणाऱ्या डॉ. पतंगराव कदम व त्यामध्ये भर घालणाऱ्या आमदार विश्वजित कदम यांच्या कामाची पोहोचपावती म्हणून आता विश्वजित यांना विक्रमी मताधिक्य द्यावे. निष्क्रिय भाजप-शिवसेना युतीच्या कारभाराला जनता कंटाळली असून, राज्यात महाआघाडीचीच सत्ता येणार, असा विश्वास कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देयुतीच्या कारभारास जनता कंटाळली : बाळासाहेब थोरातवांगी (ता. कडेगाव) येथे कॉँग्रेसचे उमेदवार आमदार डॉ. विश्वजित कदम प्रचार सभा

वांगी : कडेगाव-पलूस मतदारसंघ विधायक कामातून महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्र बनला आहे. ही विकासकामे करणाऱ्या डॉ. पतंगराव कदम व त्यामध्ये भर घालणाऱ्या आमदार विश्वजित कदम यांच्या कामाची पोहोचपावती म्हणून आता विश्वजित यांना विक्रमी मताधिक्य द्यावे. निष्क्रिय भाजप-शिवसेना युतीच्या कारभाराला जनता कंटाळली असून, राज्यात महाआघाडीचीच सत्ता येणार, असा विश्वास कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.वांगी (ता. कडेगाव) येथे कॉँग्रेसचे उमेदवार आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.यावेळी कॉँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, आमदार मोहनराव कदम, विश्वजित कदम, सोनहिरा कारखान्याचे संचालक रघुनाथराव कदम, सुरेश मोहिते, मालन मोहिते आदी उपस्थित होते.थोरात म्हणाले की, पतंगराव कदम मतदार संघालाच नव्हे, तर महाराष्ट्राला लाभलेले वरदान होते. शिक्षण आणि रोजगार निर्मितीत त्यांचे कार्य उत्तुंग होते. त्यांचे सुपुत्र विश्वजित यांनीही वडिलांच्या नावलौकिकास साजेशी कामगिरी मतदार संघात केली आहे.सचिन सावंत म्हणाले की, २०१४ च्या निवडणुकीत राज्यात भाजप-शिवसेना युतीची सत्ता आली. यावेळी राज्यावर २ लाख ४० हजार कोटींचे कर्ज होते. त्यानंतर या पाच वर्षांत हे कर्ज पाच लाख कोटींवर गेले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. या सरकारमधील २१ मंत्र्यांचे घोटाळे समोर आले; परंतु कारवाई झाली नाही. याउलट सरकारविरोधी बोलणाऱ्यांना ईडीची भीती दाखविली जात आहे. सरकारला त्यांची जागा दाखवा.विक्रमी मताधिक्याने विजय व्हावा, यासाठी कार्यकर्त्यांनी प्रत्येक घरापर्यंत जाऊन प्रचार करण्यावर भर द्यावा, असे विश्वजित कदम यांनी सांगितले. यावेळी ए. डी. पाटील, पृथ्वीराज चव्हाण, सखाराम सूर्यवंशी, मारुती चव्हाण, जयसिंग कदम, विठ्ठल मुळीक, दिलीप सूर्यवंशी, हिम्मत देशमुख, सुरेश घार्गे, राजकुवर सूर्यवंशी, शोभाताई मोहिते, नयना शिंदे, गीतांजली पवार, धनाजी सूर्यवंशी, सुनील जगदाळे, अविनाश येवले उपस्थित होते. सरपंच विजय होनमाने यांनी स्वागत केले. बाबासाहेब सूर्यवंशी यांनी आभार मानले.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाSangliसांगली