शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

जत तालुक्यात प्रस्तावित रेल्वे मार्ग सर्वेक्षण नामंजूर-: मिरज-विजयपूर, पंढरपूर-विजयपूर मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 22:21 IST

जत तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी २०१४ मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी पाठपुरावा करून मिरज-जत-विजयपूर (१२२ कि.मी.) आणि पंढरपूर-उमदी-

ठळक मुद्देकेंद्राचा निर्णय

जत : जत तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी २०१४ मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी पाठपुरावा करून मिरज-जत-विजयपूर (१२२ कि.मी.) आणि पंढरपूर-उमदी-विजयपूर (१०८.२४ कि.मी.) हे दोन्ही रेल्वे मार्ग सर्वेक्षण करण्यासाठी मंजूर करून घेतले होते. परंतु विद्यमान केंद्र सरकारने हे प्रस्ताव नामंजूर केले आहेत. त्यामुळे तालुक्यामधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

पंढरपूर-उमदी-विजयपूर या जत तालुक्यातून जाणाऱ्या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यासाठी एक हजार २९४ कोटी ६९ लाख रुपयांची आर्थिक तरतूद करून अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला होता. या दोन्ही रेल्वे मार्गांचा पाठपुरावा खा. संजयकाका पाटील व आ. विलासराव जगताप यांनी २०१८ मध्ये रेल्वे मंत्रालयाकडे केला होता. त्यामुळे या दोन्ही रेल्वे मार्गांच्या कामाला गती मिळाली होती. परंतु रेल्वे बोर्डाने नोव्हेंबर २०१८ मध्ये हे दोन्ही रेल्वेमार्ग नामंजूर केले आहेत, असे लोकप्रतिनिधींना कळविले आहे.

मागील पाच वर्षांत जत तालुक्यात कºहाड-तासगाव-जत (एनएच २६६), गुहागर-विजापूर (एनएच १६६ ई), इंदापूर-जत (एनएच ९६५ जी), पंढरपूर-उमदी-विजापूर (एनएच ५१६ अ) या राष्ट्रीय महामार्गांची कामे सुरू झाली आहेत. गोकाक-अथणी-जत या राष्ट्रीय महामार्गाचा प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम विजयपूर येथील राष्ट्रीय महामार्ग कार्यालयात सुरू आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे काम सुरू होणार आहे. जत तालुका भौगोलिक विस्ताराने मोठा आहे. सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रीय महामार्गाबरोबर जत आणि उमदी येथून जाणारी रेल्वे होणे गरजेचे होते. परंतु हा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे जत तालुका पुन्हा विकासापासून वंचित राहणार, अशी भीती व्यक्त होत आहे.विकासाला : बसली खीळतालुक्यातून रेल्वे मार्ग जात नसल्यामुळे डाळिंब, द्राक्षे, बोर, केळी आदी शेतीमाल शहरात पाठवताना शेतकरी आणि व्यापाऱ्यांना त्रासदायक व खर्चिक ठरत आहे. कच्चा माल या भागात येण्यासाठी दळणवळण व्यवस्था उपलब्ध नाही. त्यामुळे उद्योजक या ठिकाणी नवीन उद्योगधंदे उभे करायला तयार होत नाहीत. या भागातील सुशिक्षित बेरोजगारांना काम मिळत नाही. त्यामुळे हे लोक स्थलांतर करत आहेत. ऊसतोडी, वीटभट्टी, दगड खोदकाम यासह छोट्या-मोठ्या कामांसाठी शहरी भागात लोकांचे स्थलांतर मोठ्या प्रमाणात होत आहे.

टॅग्स :railwayरेल्वेSangliसांगली