शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

जत तालुक्यात प्रस्तावित रेल्वे मार्ग सर्वेक्षण नामंजूर-: मिरज-विजयपूर, पंढरपूर-विजयपूर मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 22:21 IST

जत तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी २०१४ मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी पाठपुरावा करून मिरज-जत-विजयपूर (१२२ कि.मी.) आणि पंढरपूर-उमदी-

ठळक मुद्देकेंद्राचा निर्णय

जत : जत तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी २०१४ मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी पाठपुरावा करून मिरज-जत-विजयपूर (१२२ कि.मी.) आणि पंढरपूर-उमदी-विजयपूर (१०८.२४ कि.मी.) हे दोन्ही रेल्वे मार्ग सर्वेक्षण करण्यासाठी मंजूर करून घेतले होते. परंतु विद्यमान केंद्र सरकारने हे प्रस्ताव नामंजूर केले आहेत. त्यामुळे तालुक्यामधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

पंढरपूर-उमदी-विजयपूर या जत तालुक्यातून जाणाऱ्या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यासाठी एक हजार २९४ कोटी ६९ लाख रुपयांची आर्थिक तरतूद करून अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला होता. या दोन्ही रेल्वे मार्गांचा पाठपुरावा खा. संजयकाका पाटील व आ. विलासराव जगताप यांनी २०१८ मध्ये रेल्वे मंत्रालयाकडे केला होता. त्यामुळे या दोन्ही रेल्वे मार्गांच्या कामाला गती मिळाली होती. परंतु रेल्वे बोर्डाने नोव्हेंबर २०१८ मध्ये हे दोन्ही रेल्वेमार्ग नामंजूर केले आहेत, असे लोकप्रतिनिधींना कळविले आहे.

मागील पाच वर्षांत जत तालुक्यात कºहाड-तासगाव-जत (एनएच २६६), गुहागर-विजापूर (एनएच १६६ ई), इंदापूर-जत (एनएच ९६५ जी), पंढरपूर-उमदी-विजापूर (एनएच ५१६ अ) या राष्ट्रीय महामार्गांची कामे सुरू झाली आहेत. गोकाक-अथणी-जत या राष्ट्रीय महामार्गाचा प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम विजयपूर येथील राष्ट्रीय महामार्ग कार्यालयात सुरू आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे काम सुरू होणार आहे. जत तालुका भौगोलिक विस्ताराने मोठा आहे. सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रीय महामार्गाबरोबर जत आणि उमदी येथून जाणारी रेल्वे होणे गरजेचे होते. परंतु हा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे जत तालुका पुन्हा विकासापासून वंचित राहणार, अशी भीती व्यक्त होत आहे.विकासाला : बसली खीळतालुक्यातून रेल्वे मार्ग जात नसल्यामुळे डाळिंब, द्राक्षे, बोर, केळी आदी शेतीमाल शहरात पाठवताना शेतकरी आणि व्यापाऱ्यांना त्रासदायक व खर्चिक ठरत आहे. कच्चा माल या भागात येण्यासाठी दळणवळण व्यवस्था उपलब्ध नाही. त्यामुळे उद्योजक या ठिकाणी नवीन उद्योगधंदे उभे करायला तयार होत नाहीत. या भागातील सुशिक्षित बेरोजगारांना काम मिळत नाही. त्यामुळे हे लोक स्थलांतर करत आहेत. ऊसतोडी, वीटभट्टी, दगड खोदकाम यासह छोट्या-मोठ्या कामांसाठी शहरी भागात लोकांचे स्थलांतर मोठ्या प्रमाणात होत आहे.

टॅग्स :railwayरेल्वेSangliसांगली