शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
3
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
4
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
5
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
6
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
7
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
8
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
9
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
10
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
11
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
12
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
13
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
14
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
15
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
16
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
17
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
18
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
19
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
20
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले

जत तालुक्यात प्रस्तावित रेल्वे मार्ग सर्वेक्षण नामंजूर-: मिरज-विजयपूर, पंढरपूर-विजयपूर मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 22:21 IST

जत तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी २०१४ मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी पाठपुरावा करून मिरज-जत-विजयपूर (१२२ कि.मी.) आणि पंढरपूर-उमदी-

ठळक मुद्देकेंद्राचा निर्णय

जत : जत तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी २०१४ मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी पाठपुरावा करून मिरज-जत-विजयपूर (१२२ कि.मी.) आणि पंढरपूर-उमदी-विजयपूर (१०८.२४ कि.मी.) हे दोन्ही रेल्वे मार्ग सर्वेक्षण करण्यासाठी मंजूर करून घेतले होते. परंतु विद्यमान केंद्र सरकारने हे प्रस्ताव नामंजूर केले आहेत. त्यामुळे तालुक्यामधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

पंढरपूर-उमदी-विजयपूर या जत तालुक्यातून जाणाऱ्या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यासाठी एक हजार २९४ कोटी ६९ लाख रुपयांची आर्थिक तरतूद करून अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला होता. या दोन्ही रेल्वे मार्गांचा पाठपुरावा खा. संजयकाका पाटील व आ. विलासराव जगताप यांनी २०१८ मध्ये रेल्वे मंत्रालयाकडे केला होता. त्यामुळे या दोन्ही रेल्वे मार्गांच्या कामाला गती मिळाली होती. परंतु रेल्वे बोर्डाने नोव्हेंबर २०१८ मध्ये हे दोन्ही रेल्वेमार्ग नामंजूर केले आहेत, असे लोकप्रतिनिधींना कळविले आहे.

मागील पाच वर्षांत जत तालुक्यात कºहाड-तासगाव-जत (एनएच २६६), गुहागर-विजापूर (एनएच १६६ ई), इंदापूर-जत (एनएच ९६५ जी), पंढरपूर-उमदी-विजापूर (एनएच ५१६ अ) या राष्ट्रीय महामार्गांची कामे सुरू झाली आहेत. गोकाक-अथणी-जत या राष्ट्रीय महामार्गाचा प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम विजयपूर येथील राष्ट्रीय महामार्ग कार्यालयात सुरू आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे काम सुरू होणार आहे. जत तालुका भौगोलिक विस्ताराने मोठा आहे. सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रीय महामार्गाबरोबर जत आणि उमदी येथून जाणारी रेल्वे होणे गरजेचे होते. परंतु हा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे जत तालुका पुन्हा विकासापासून वंचित राहणार, अशी भीती व्यक्त होत आहे.विकासाला : बसली खीळतालुक्यातून रेल्वे मार्ग जात नसल्यामुळे डाळिंब, द्राक्षे, बोर, केळी आदी शेतीमाल शहरात पाठवताना शेतकरी आणि व्यापाऱ्यांना त्रासदायक व खर्चिक ठरत आहे. कच्चा माल या भागात येण्यासाठी दळणवळण व्यवस्था उपलब्ध नाही. त्यामुळे उद्योजक या ठिकाणी नवीन उद्योगधंदे उभे करायला तयार होत नाहीत. या भागातील सुशिक्षित बेरोजगारांना काम मिळत नाही. त्यामुळे हे लोक स्थलांतर करत आहेत. ऊसतोडी, वीटभट्टी, दगड खोदकाम यासह छोट्या-मोठ्या कामांसाठी शहरी भागात लोकांचे स्थलांतर मोठ्या प्रमाणात होत आहे.

टॅग्स :railwayरेल्वेSangliसांगली