शहरं
Join us  
Trending Stories
1
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
2
जम्मू-काश्मीर पोलिसांनी मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
3
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
4
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
5
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
6
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
7
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
8
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
9
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
10
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
11
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
12
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
13
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
14
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
15
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
16
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
17
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
18
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
19
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
20
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!

व्यावसायिक राजकारणाने महाराष्ट्राची वाट लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2016 00:49 IST

विजय शिवतारे : वासुंबे येथे विविध विकास कामांचे उद्घाटन

विटा : शिवसेना हा जातीयवादी पक्ष नाही. जाती-पातीची दुकाने राष्ट्रवादी कॉँग्रेसने सुरू केली. कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसने लोकांची दिशाभूल केली, असा आरोप करून वसंतदादा पाटील हे प्रगल्भ राजकारणी होते. परंतु, वसंतदादांच्यानंतर राजकारणात व्यावसायिकता आल्याने संपूर्ण महाराष्ट्राची वाट लागली, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी शुक्रवारी केली. वासुंबे (ता. खानापूर) येथे नवीन नळपाणी पुरवठा योजना व शाळा इमारतीचे उद्घाटन शिवतारे यांच्याहस्ते झाले. यावेळी आ. अनिल बाबर, सभापती सौ. वैशाली माळी, उपसभापती किसन सावंत, माजी उपसभापती सुहास बाबर, अमोल बाबर, तानाजी पाटील, जि. प. सदस्य फिरोज शेख, बजरंग पाटील, अभिजित पाटील, दिनकर पाटील, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, नीशादेवी वाघमोडे, साहेबराव पाटील, जहॉँगीर तांबोळी, बाळासाहेब होनराव उपस्थित होते. शिवतारे म्हणाले, शिवसेना पक्षाच्या स्थापनेला शनिवारी ५० वर्षे पूर्ण होत आहेत. विश्वासार्हता असेल तर लोकशाहीत काम करणाऱ्याला ताकद मिळते. खानापूर तालुक्यातील शेतकरी जिद्दी आहे. त्यामुळे टेंभू योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ताकद देण्यासाठी शिवसेना कटिबध्द राहील. टेंभू योजनेतून वगळलेली गावे योजनेत समाविष्ट करून घेण्यात येतील. वीज बिलासाठी योजना बंद पडल्या तर ३७ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक खराब होईल. त्यामुळे दुष्काळी भागातील टेंभू, ताकारी, म्हैसाळ, पुरंदर या योजना यशस्वीरित्या चालू राहतील. गेली १५ वर्षे सिंचनाची कोणतीही कामे झाली नाहीत. त्यामुळे ११ हजार कोटी रुपयांचे प्रकल्प ३७ हजार कोटी रुपयांवर गेल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी अनिल बाबर म्हणाले, आमच्या दुष्काळी भागातील शेतकरी मेहनती आहेत. दुष्काळ पडला म्हणून ते कधीही खचून गेले नाहीत. परंतु, शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळाल्यास शेतकरी सुखी होणार आहे. मला मंत्रीपदाची कोणतीही अपेक्षा नाही. फक्त शेतकऱ्यांच्या शेतीला टेंभूचे पाणी मिळावे, टप्पा क्र. ४ व ५ ची कामे पूर्ण करावीत आणि सिंचन योजनांची वीज बिले कमी करून समान पाणीपट्टी आकारणीसाठी शासनस्तरावर प्रयत्न करावेत. या भागातील शेतकऱ्यांचे, नागरिकांचे प्रश्न सुटण्यासाठीच माझी धडपड राहिल. उपसरपंच विकास पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी सुहास बाबर, तानाजी पाटील, दिनकर पाटील यांचीही भाषणे झाली. या कार्यक्रमास प्रसाद गायकवाड, रवींद्र पवार, सरपंच मालन पवार, दामोदर चव्हाण, उत्तम चोथे, दीपक माळी, सुशांत देवकर, कविता देवकर, राजेश कदम, शिवाजीराव शिंदे, डी. डी. कांबळे, टेंभू योजनेचे तानाजी झेंगटे, राजेंद्र शेंडगे, भरत पवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. आटपाडीचे तानाजी पाटील म्हणाले की, खानापूर मतदारसंघात विकास कामांचे अनेक नारळ फोडले आहेत, पण आता आम्हाला नाराज करू नका. आ. अनिल बाबर यांचा मंत्रिमंडळात समावेश करा. माजी उपसभापती सुहास बाबर म्हणाले, गेल्या दहा वर्षात टेंभूचा एकही दगड हलला नाही. मात्र, पंचायत समितीत कोळपी विकून विकास होतो का, अशी टीका केली, पण याच कोळप्यांनी अडीच वर्षातच ‘त्यांचे काम’ केले, अशी टीका माजी आ. सदाशिवराव पाटील यांचे नाव न घेता केली. आटपाडी तालुक्यातूनही माझ्यावर टीका होत आहे. म्हणजे माझ्या कामाची दखल आटपाडीकरांनी घेण्यास सुरुवात केली असल्याचे सांगून खानापूरची काळजी तुम्ही करू नका त्यासाठी आम्ही समर्थ असल्याची टीका सुहास बाबर यांनी माजी आ. राजेंद्रअण्णा देशमुख यांच्यावर केली.