शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

व्यावसायिक राजकारणाने महाराष्ट्राची वाट लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2016 00:49 IST

विजय शिवतारे : वासुंबे येथे विविध विकास कामांचे उद्घाटन

विटा : शिवसेना हा जातीयवादी पक्ष नाही. जाती-पातीची दुकाने राष्ट्रवादी कॉँग्रेसने सुरू केली. कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसने लोकांची दिशाभूल केली, असा आरोप करून वसंतदादा पाटील हे प्रगल्भ राजकारणी होते. परंतु, वसंतदादांच्यानंतर राजकारणात व्यावसायिकता आल्याने संपूर्ण महाराष्ट्राची वाट लागली, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी शुक्रवारी केली. वासुंबे (ता. खानापूर) येथे नवीन नळपाणी पुरवठा योजना व शाळा इमारतीचे उद्घाटन शिवतारे यांच्याहस्ते झाले. यावेळी आ. अनिल बाबर, सभापती सौ. वैशाली माळी, उपसभापती किसन सावंत, माजी उपसभापती सुहास बाबर, अमोल बाबर, तानाजी पाटील, जि. प. सदस्य फिरोज शेख, बजरंग पाटील, अभिजित पाटील, दिनकर पाटील, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, नीशादेवी वाघमोडे, साहेबराव पाटील, जहॉँगीर तांबोळी, बाळासाहेब होनराव उपस्थित होते. शिवतारे म्हणाले, शिवसेना पक्षाच्या स्थापनेला शनिवारी ५० वर्षे पूर्ण होत आहेत. विश्वासार्हता असेल तर लोकशाहीत काम करणाऱ्याला ताकद मिळते. खानापूर तालुक्यातील शेतकरी जिद्दी आहे. त्यामुळे टेंभू योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ताकद देण्यासाठी शिवसेना कटिबध्द राहील. टेंभू योजनेतून वगळलेली गावे योजनेत समाविष्ट करून घेण्यात येतील. वीज बिलासाठी योजना बंद पडल्या तर ३७ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक खराब होईल. त्यामुळे दुष्काळी भागातील टेंभू, ताकारी, म्हैसाळ, पुरंदर या योजना यशस्वीरित्या चालू राहतील. गेली १५ वर्षे सिंचनाची कोणतीही कामे झाली नाहीत. त्यामुळे ११ हजार कोटी रुपयांचे प्रकल्प ३७ हजार कोटी रुपयांवर गेल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी अनिल बाबर म्हणाले, आमच्या दुष्काळी भागातील शेतकरी मेहनती आहेत. दुष्काळ पडला म्हणून ते कधीही खचून गेले नाहीत. परंतु, शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळाल्यास शेतकरी सुखी होणार आहे. मला मंत्रीपदाची कोणतीही अपेक्षा नाही. फक्त शेतकऱ्यांच्या शेतीला टेंभूचे पाणी मिळावे, टप्पा क्र. ४ व ५ ची कामे पूर्ण करावीत आणि सिंचन योजनांची वीज बिले कमी करून समान पाणीपट्टी आकारणीसाठी शासनस्तरावर प्रयत्न करावेत. या भागातील शेतकऱ्यांचे, नागरिकांचे प्रश्न सुटण्यासाठीच माझी धडपड राहिल. उपसरपंच विकास पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी सुहास बाबर, तानाजी पाटील, दिनकर पाटील यांचीही भाषणे झाली. या कार्यक्रमास प्रसाद गायकवाड, रवींद्र पवार, सरपंच मालन पवार, दामोदर चव्हाण, उत्तम चोथे, दीपक माळी, सुशांत देवकर, कविता देवकर, राजेश कदम, शिवाजीराव शिंदे, डी. डी. कांबळे, टेंभू योजनेचे तानाजी झेंगटे, राजेंद्र शेंडगे, भरत पवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. आटपाडीचे तानाजी पाटील म्हणाले की, खानापूर मतदारसंघात विकास कामांचे अनेक नारळ फोडले आहेत, पण आता आम्हाला नाराज करू नका. आ. अनिल बाबर यांचा मंत्रिमंडळात समावेश करा. माजी उपसभापती सुहास बाबर म्हणाले, गेल्या दहा वर्षात टेंभूचा एकही दगड हलला नाही. मात्र, पंचायत समितीत कोळपी विकून विकास होतो का, अशी टीका केली, पण याच कोळप्यांनी अडीच वर्षातच ‘त्यांचे काम’ केले, अशी टीका माजी आ. सदाशिवराव पाटील यांचे नाव न घेता केली. आटपाडी तालुक्यातूनही माझ्यावर टीका होत आहे. म्हणजे माझ्या कामाची दखल आटपाडीकरांनी घेण्यास सुरुवात केली असल्याचे सांगून खानापूरची काळजी तुम्ही करू नका त्यासाठी आम्ही समर्थ असल्याची टीका सुहास बाबर यांनी माजी आ. राजेंद्रअण्णा देशमुख यांच्यावर केली.