शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री पीक विमा योजना : कंपन्यांनी शेतकरी सुविधा केंद्र स्थापन करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 14:33 IST

खरीप हंगाम २०१९ मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभागी होण्याची अंतिम तारीख २४ जुलै आहे. या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी केवळ ६ दिवसांचा कालावधी उरला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभागी व्हावे, यासाठी विमा कंपन्यांनी जिल्हा आणि तालुका स्तरावर शेतकरी सुविधा केंद्र स्थापन करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी येथे दिल्या.

ठळक मुद्देप्रधानमंत्री पीक विमा योजना : कंपन्यांनी शेतकरी सुविधा केंद्र स्थापन करावेसांगली जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या सूचना

सांगली : खरीप हंगाम २०१९ मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभागी होण्याची अंतिम तारीख २४ जुलै आहे. या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी केवळ ६ दिवसांचा कालावधी उरला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभागी व्हावे, यासाठी विमा कंपन्यांनी जिल्हा आणि तालुका स्तरावर शेतकरी सुविधा केंद्र स्थापन करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी येथे दिल्या.प्रधानमंत्री पीक विमा योजना आणि पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना या दोन्हीयोजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीस कृषिउपसंचालक सुरेश मगदूम, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आर. पी. यादव, विमा कंपन्यांचे आणि बँकांचेप्रतिनिधी आर. एस. बिरनाळे, सुभाष कदम, एस. एम. कोळी, व्ही. एस. यादव, अतुल झनकर, दिग्विजयकापसे, दीपक सोनवणे, श्री. सिंग आदि उपस्थित होते.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, पीक विम्यासाठी विमा कंपन्यांनी तालुका आणि जिल्हास्तरावर शेतकरी सुविधा केंद्र स्थापन करावे. त्याचा पत्ता व संपर्क क्रमांकांना व्यापक प्रसिद्धी द्यावी. जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, यासाठी गावस्तरावर प्रसिद्धी करावी. त्याबरोबरच पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना वेळेत मिळावी, यासाठीही विमा कंपन्यांनी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, कृषि विभागाने विमा कंपन्यांनी सादर केलेल्यामाहितीची फेर तपासणी करावी. तसेच, पीक विम्याबाबतच्या तक्रारीसाठी तालुका स्तरावर तालुका कृषिअधिकारी आणि जिल्हा स्तरावर जिल्हा अधीक्षक कृषि कार्यालय येथे तक्रार निवारण केंद्र स्थापन करावे, असेत्यांनी सांगितले.खरीप हंगाम 2019 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना 10 अधिसूचित पिकांसाठी एकूण 278अधिसूचित महसूल मंडळांमध्ये, मंडळगट स्तरावर राबवण्यात येणार आहे. तसेच, मका आणि तूर याअधिसूचित पिकांसाठी, एकूण तालुका गटस्तरावर ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया, मुंबईमार्फतराबविण्यात येत आहे.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, या योजनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या बिगर कर्जदारशेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्र, जवळच्या प्राधिकृत बँका/ प्राथमिक कृषि पत पुरवठा करणाऱ्या संस्था/संबधित विमा कंपनीची कार्यालये किंवा विमा प्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधून विमा प्रस्ताव विहीत प्रपत्रात,योग्य त्या विमा हप्त्यासह, आधार कार्ड/ आधार नोंदणीची प्रत, 7/12 व 8 अ चा उतारा, पेरणीचा दाखलाकिंवा पेरणी घोषणा पत्र, बँक पासबुकाची प्रत, भाडेपट्टा करार असलेल्या शेतकऱ्यांचा करारनामा/सहमतीपत्र, मोबाईल क्रमांक इत्यादी आवश्यक कागदपत्रासह प्रस्ताव विहीत वेळेत सादर करावा.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीSangliसांगली