शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

शिराळ्यात आमदारकीची मक्तेदारी मोडण्याची तयारी विधानसभा : वाळवा तालुक्यात खलबते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 00:28 IST

विधानसभेसाठी शिराळा मतदारसंघात शिराळा तालुक्यातीलच नेत्यांना प्राधान्य दिले जाते. त्यामुळे या मतदारसंघात येत असलेल्या वाळवा तालुक्यातील ४९ गावांतील नेत्यांवर अन्याय होत आहे. त्यामुळे

अशोक पाटील ।इस्लामपूर : विधानसभेसाठी शिराळा मतदारसंघात शिराळा तालुक्यातीलच नेत्यांना प्राधान्य दिले जाते. त्यामुळे या मतदारसंघात येत असलेल्या वाळवा तालुक्यातील ४९ गावांतील नेत्यांवर अन्याय होत आहे. त्यामुळे शिराळ्यातील आमदारकीची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी वाळवा तालुक्यातील नेत्यांत गुफ्तगू सुरू असल्याचे वृत्त आहे.

शिराळा मतदारसंघात २ लाख ८३ हजार ९६५ मतदान आहे. त्यापैकी शिराळा तालुक्यात १ लाख ३६ हजार ९२३ मतदार संख्या आहे, तर वाळवा तालुक्यातील ४९ गावात १ लाख ४७ हजार ४२ मतदार आहेत. मात्र या गावातील मातब्बर नेत्यांना अद्याप आमदार होण्याची संधी मिळालेली नाही. या ४९ गावांत बहुतांश ठिकाणी राष्ट्रवादीची सत्ता आहे. जिल्हा परिषदेच्या येलूर, पेठ मतदार संघावर महाडिक गटाने वर्चस्व ठेवले आहे.

शिराळा तालुक्यात काँग्रेसच्या ताकदीवर शिवाजीराव देशमुख यांनी मंत्रिपदे मिळवली आहेत. त्यानंतर भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक यांनाही मंत्रिपद मिळाले. हे दोन गट सक्षमपणे कार्यरत असतानाच राष्ट्रवादीच्या ताकदीवर मानसिंगराव नाईक यांनी आमदारकीचे मैदान मारले. तेव्हापासून शिराळा तालुक्यात तीन गट कार्यरत झाले आहेत. विधानसभेला या तिन्ही गटांचीच मक्तेदारी ठरलेली आहे. त्यामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीत ही मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी खलबते सुरू झाली आहेत.

वाळवा तालुक्यातील ४९ गावांमधील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते पी. आर. पाटील, जनार्दन पाटील, रवींद्र बर्डे, डॉ. प्रताप पाटील यांना विधानसभा लढण्याची संधी मिळालेली नाही. यावेळी शिराळ्यातील तिन्ही मातब्बर गटांना शह देण्यासाठी महाडिक युवाशक्तीचे सम्राट महाडिक यांनी ताकद पणाला लावली आहे. यासाठी त्यांनी गेल्या वर्षभरापासून मतदारसंघात युवकांचे संघटन सुरू केले आहे. मात्र ते पुढे सरसावल्यामुळे ४९ गावांतील सर्वच पक्षांतील नेते शिराळकरांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी पुढे येणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारण