शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

एसटीचा वाहक अरेरावी करतो? शिवशाही सतत बंद पडते?; आता सांगा थेट विभाग नियंत्रकांना

By संतोष भिसे | Updated: July 4, 2024 16:36 IST

प्रत्येक आगारात 'प्रवासी राजा दिन', १५ जुलैपासून सुरुवात

सांगली : प्रवाशांच्या समस्या, तक्रारी, सूचना यांचे स्थानिक पातळीवर जलदगतीने निराकरण होण्यासाठी प्रत्येक आगारात दर सोमवारी व शुक्रवारी प्रवासी राजा दिन घेण्यात येणार आहे. एसटी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. १५ जुलैपासून हा उपक्रम सुरु होणार आहे.या दिवशी एसटीचे विभाग नियंत्रक एका आगारात जाऊन प्रवाशांशी संवाद साधतील. त्यांच्या तक्रारी तातडीने सोडविण्यासाठी उपाययोजना करतील. यातून प्रवासी सेवेचा दर्जा व गुणवत्ता वाढविण्याचा एसटीचा प्रयत्न आहे. प्रवासी, प्रवासी संघटना, शाळा-महाविद्यालये यांना आपल्या समस्या, तक्रारी, सूचना लेखी स्वरूपात दर सोमवारी व शुक्रवारी संबंधित आगारात सकाळी १० ते २ या वेळेत मांडता येतील. त्यावर विभाग नियंत्रक तातडीने कार्यवाही करतील.राज्यभरात एसटी दररोज सुमारे ५४ ते ५५ लाख प्रवाशांची वाहतूक करते. यादरम्यान अनेकदा प्रवाशांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. अस्वच्छ स्थानक, गलिच्छ प्रसाधनगृहे, वाहकांची अरेरावी, बंद पडणाऱ्या गाड्या, थांब्यावरील हॉटेलमध्ये महागडी सेवा या सार्वत्रिक तक्रारी आहेत. गाडी वेळेत न सुटणे किंवा एएनवेळी रद्द होणे हा अनुभवही वारंवार येतो. विशेषत: शिवशाहीबद्दल तक्रारी सर्वाधिक आहेत. या सर्व तक्रारी आता थेट विभाग नियंत्रकांसमोर मांडता येतील.

मध्यवर्ती कार्यालय ठेवणार लक्षप्रवासी राजा दिन कोणत्या दिवशी कोणत्या आगारात होईल याचे वेळापत्रक विभाग नियंत्रक वेळोवेळी जाहीर करतील. प्रत्येक लेखी तक्रारीची नोंद ठेवण्यात येणार आहे. त्यावर काय कार्यवाही केली याचीही नोंद ठेवली जाईल. त्यावर थेट मध्यवर्ती कार्यालयाचे लक्ष असेल. एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

टॅग्स :Sangliसांगलीpassengerप्रवासी