शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री, ऊर्जामंत्र्यांच्या फसव्या घोषणांना जनता कंटाळली : प्रताप होगाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 21:02 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चार वर्षात दहावेळा वीज बिलातील चूक मान्य करुन शेतकऱ्यांना सवलतीची घोषणा केली होती. प्रत्यक्षात एकाही घोषणेची त्यांनी अंमलबजावणी केली नसल्यामुळे त्यांच्या फसव्या घोषणेला शेतकरी कंटाळला आहे, अशी टीका वीज ग्राहक

ठळक मुद्दे पाणीपुरवठा संस्थांचा सांगलीत मेळावा२१ जानेवारीला शिरोली फाट्यावर पुणे-बेंगलोर महामार्ग रोखणार

सांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चार वर्षात दहावेळा वीज बिलातील चूक मान्य करुन शेतकऱ्यांना सवलतीची घोषणा केली होती. प्रत्यक्षात एकाही घोषणेची त्यांनी अंमलबजावणी केली नसल्यामुळे त्यांच्या फसव्या घोषणेला शेतकरी कंटाळला आहे, अशी टीका वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी केली. सरकारला जागे करण्यासाठी दि. २१ जानेवारीला शिरोली फाटा येथे पुणे-बेंगलोर महामार्ग रोखण्यासाठी लाखोच्या संख्येने शेतकºयांनी सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले.

जिल्हा सहकारी पाणी पुरवठा संस्थांच्या प्रतिनिधींचा शुक्रवारी सांगलीत मेळावा आयोजित केला होता. यावेळी प्रताप होगाडे बोलत होते. यावेळी क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड, राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील, आर. बी. तांबे, विक्रांत पाटील-किणीकर, बाबासाहेब पाटील, श्रीकांत लाड आदींसह संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

होगाडे पुढे म्हणाले की, भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून पाचवेळा वीज दरवाढ केली आहे. सहावी वीज दरवाढ मार्च २०१९ मध्ये होणार आहे. शेतीपंपाची वीज दरवाढ चुकीची आहे. शेतकºयांना चुकीच्या पध्दतीने वीज बिले दिली आहेत. या प्रश्नावर पाणी पुरवठा संस्था आणि महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेच्या माध्यमातून मोर्चे, रास्ता रोको आंदोलने करून सरकारचा निषेध केला. कोल्हापूर आणि मुंबई येथे मोर्चा काढल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांना, शेतकºयांनी प्रति युनिट १ रुपया १६ पैसे दराने वीज बिल भरावे, राहिलेली रक्कम शासन सबसीडी म्हणून देईल, असे आश्वासन दिले होते.

याच घोषणा पुढे चारवेळा दिल्या आहेत. ऊर्जामंत्री बावनकुळे यांनीही वीज बिलाची दुरुस्ती झाल्याशिवाय वसुलीला येणार नसल्याची घोषणा केली होती. प्रत्यक्षात मागील चार वर्षात मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री यांनी एकाही घोषणेची अंमलबजावणी केली नाही. गेल्या पन्नास वर्षातील सर्वाधिक थापा मारणारे सरकार म्हणून भाजपच्या सरकारची नोंद होईल, अशी टीकाही त्यांनी केली. दि. २१ जानेवारीला शिरोली फाटा (जि. कोल्हापूर) येथे पुणे-बेंगलोर महामार्ग रोखण्यासाठी लाखोच्या संख्येने शेतकºयांनी सहभागी होण्याचेही आवाहन होगाडे यांनी केले.

अरुण लाड म्हणाले, महावितरणची वीज दरवाढ सामान्य शेतकºयांवर अन्यायकारक असल्यामुळे सरकारने ती त्वरित मागे घेतली पाहिजे. उपसा सिंचन योजनांप्रमाणेच पाणी पुरवठा योजनांचे ८१ टक्के वीज बिल सरकारने भरावे.

 

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारण