शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
5
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
6
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
7
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
8
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
9
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
10
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
11
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
12
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
13
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
14
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
15
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
16
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
17
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
18
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
19
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
20
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?

पाववाला ते मिरजेचे आमदार..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 00:00 IST

सदानंद औंधे ।लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : पाववाला ते मिरजेतून दोनवेळा आमदार म्हणून निवडून येणाºया हाफिज धत्तुरे यांनी सर्वसामान्यांसाठी संघर्ष केला. आपल्यातील साधेपणाने त्यांनी नेहमीच सर्वसामान्यांची मने जिंकली. सर्वसमावेशक कार्यपद्धतीमुळे ते नेहमीच जनतेचे नेतृत्व ठरले. अशा या कार्यक्षम माजी आमदाराचे निधन मंगळवारी रात्री झाले. मिरजेतील या लोकप्रिय नेत्याच्या जीवनयात्रेची अखेर त्यांच्या ...

सदानंद औंधे ।लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : पाववाला ते मिरजेतून दोनवेळा आमदार म्हणून निवडून येणाºया हाफिज धत्तुरे यांनी सर्वसामान्यांसाठी संघर्ष केला. आपल्यातील साधेपणाने त्यांनी नेहमीच सर्वसामान्यांची मने जिंकली. सर्वसमावेशक कार्यपद्धतीमुळे ते नेहमीच जनतेचे नेतृत्व ठरले. अशा या कार्यक्षम माजी आमदाराचे निधन मंगळवारी रात्री झाले. मिरजेतील या लोकप्रिय नेत्याच्या जीवनयात्रेची अखेर त्यांच्या जन्मदिनालाच झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.हाफिज धत्तुरे यांचा जीवन प्रवास संघर्षमय राहिला आहे. सोळा वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या फोटोफ्रेम बनवण्याचा व्यवसाय होता. हे त्यांच्या कुटुंबियांचे उदरनिर्वाहाचे महत्त्वाचे साधन. या व्यवसायावर कुटुंबाचे पालनपोषण कसेबसे होत असे. त्यामुळे नोकरीच्या शोधात धत्तुरे यांनी मुंबई गाठली. कापड गिरणीत नोकरी मिळाली. पॉवरलूमवर ते काम करू लागले. येथेच त्यांनी कामगारांचे जीवन अनुभवले. गिरणी कामगार म्हणून काम करताना त्या काळातील समाजवादी विचारसरणीचा त्यांच्यावर प्रभाव पडला. मात्र, मुंबईपेक्षा त्यांचा ओढा हा मिरजेकडे होता. त्यामुळे त्यांनी मिरजेत येऊन आपला वडिलोपार्जित फोटोफ्रेमचा व्यवसाय करण्याचे ठरवले. जत्रा, यात्रा, उरूसात, उत्सवात फोटोफ्रेमची विक्री केली.१९७० मध्ये हाफिज धत्तुरे यांनी बेकरी व्यवसायात प्रवेश केला. याच बेकरी व्यवसायाने त्यांची जडण-घडण केली. पाववाला म्हणून मिरज शहराला ते परिचित झाले. सामाजकारण त्यांना राजकारणात येण्यास खुणावू लागले. त्यामुळे त्यांनी मिरज नगरपालिकेची निवडणूक लढवली. मात्र, त्यांना या निवडणुकीत अपयश आहे. अपयश ही यशाची पहिली पायरी हे तत्त्व मानून त्यांनी आपल्या राजकीय वाटचालीची जय्यत तयारी करण्यास सुरुवात केली. इथूनच त्यांचा राजकीय प्रवास सुरु झाला.१९९९ मध्ये मिरजेत विधानसभेसाठी त्यांना आॅल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटना व काँग्रेस युतीची विधानसभेची उमेदवारी मिळाली. तत्कालीन जनता दलाचे आमदार शरद पाटील यांच्याविरोधात ओबीसी संघटनेची उमेदवारी घेण्यास कोणीही तयार नसल्याने हाफिज धत्तुरे यांच्या गळ्यात ही माळ पडली. विधानसभा निवडणुकीत पाववाला म्हणून त्यांची हेटाळणी झाली. काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरुध्द बंड केले; मात्र सिनेअभिनेते दिलीपकुमार यांच्या प्रचारसभेने वातावरण बदलले. धत्तुरे यांनी तब्बल १२ हजार मताधिक्याने निवडून येऊन चमत्कार घडविला. मिरज मतदार संघातून प्रथमच अल्पसंख्यांक समाजाला प्रतिनिधीत्व मिळाले.जनतेचा नेता अशी ओळख असलेल्या धत्तुरे यांनी स्वतंत्र मिरज नगरपालिका, बकºयांसाठी स्वतंत्र कत्तलखाना, स्वतंत्र औद्योगिक नगरी, वैद्यकीय महाविद्यालयात सुविधा, रस्त्यावर उतरून आंदोलने केली. सामान्यांच्या प्रश्नांवर प्रशासनाशी संघर्ष केला. राजकीय अपेक्षा, महत्त्वाकांक्षा मोठ्या नसल्याने व राजकीय मतभेद झाल्याने त्यांनी मुस्लिम ओबीसी संघटनेचा त्याग करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २००५ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पुन्हा विजय मिळवला. या विजयाने ते सर्वसामान्यांचे नेते असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.सर्वसामान्यांच्या प्रश्नावर आंदोलने करणाºया धत्तुरे यांनी अतिक्रमणे हटविताना खोकीधारकांचे समर्थन करीत फेरीवाल्यांचे प्रथम पुनर्वसन करा मगच खोकी हलवा, असा पवित्रा घेत जेसीबी यंत्रासमोर आडवे पडून अतिक्रमण हटाव मोहिमेला जोरदार विरोध केला होता. आमदार असूनही साध्या राहणीमुळे आमआदमी अशी धत्तुरे यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने गरिबांच्या अडचणी समजावून घेऊन समस्या सोडविण्यासाठी धडपडणारा नेता हरपला आहे.मिरज विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर काँग्रेसकडून राज्यसभेवर जाण्याची धत्तुरे यांची इच्छा होती. गत लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने त्यांच्या उमेदवारीच्या मागणीस प्रतिसाद न दिल्याने त्यांनी काँग्रेसविरोधात बंडखोरी करून खळबळ उडवून दिली होती. मात्र ते बंड थांबवण्यात आले होते.लाल दिव्याची गाडीहाफिज धत्तुरे यांना पहिल्यांदा निवडून आल्यानंतर मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद व राज्यमंत्रीपदाचा दर्जा मिळाला होता. त्यांच्यामुळे मिरजेला पहिल्यांदाच लाल दिव्याची गाडी मिळाली. प्रशासनाशी संघर्ष करणाºया हाफिजभार्इंनी तत्कालीन पोलीस निरीक्षकांच्या बदलीसाठी मुख्यमंत्र्यांना आत्मदहनाचा इशारा दिला होता. मिरज वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना हटविण्यासाठी त्यांनी आंदोलन केले. फेरीवाल्यांच्या प्रश्नावरून महापालिका व आयुक्तांविरुध्द, काही वेळेस स्वपक्षीय शासनाविरुध्द त्यांनी संघर्ष केला.