शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

पुस्तकात आयुष्य बदलण्याची ताकद ; विद्यार्थ्यांनीच सांभाळली जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 00:24 IST

केंद्रे म्हणाले की, लेखन ही ज्ञानाची पुढची पायरी आहे. अक्षरांच्या जगानं अनेक मुलांचे विश्व सजलेले आहे. लहान मुलांची पुस्तके काढणे व संमेलन घेणे ही सांगलीची बाल चळवळ मराठी जगतात महत्त्वाचं स्थान निर्माण करेल, असा विश्वास वाटतो.

ठळक मुद्दे किरण केंद्रे : कुपवाडला सहावे विद्यार्थी साहित्य संमेलन

कुपवाड : पुस्तकाचे जग खूप सुंदर जग आहे. आयुष्य बदलण्याची ताकद पुस्तकात आहे. त्यामुळे पुस्तकाचा हातात धरलेला हात कधीच सोडू नका, असे प्रतिपादन किशोर मासिकाचे संपादक किरण केंद्रे यांनी केले.कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील कृष्णा व्हॅली शैक्षणिक संकुलात मंगळवारी साहित्य संमेलनाचे उद्घाटन किरण केंद्रे यांच्याहस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी समडोळी हायस्कूलचा बालकवी गौतम पाटील होता, तर स्वागताध्यक्षपदी समृद्धी नागरगोजे होती.

केंद्रे म्हणाले की, लेखन ही ज्ञानाची पुढची पायरी आहे. अक्षरांच्या जगानं अनेक मुलांचे विश्व सजलेले आहे. लहान मुलांची पुस्तके काढणे व संमेलन घेणे ही सांगलीची बाल चळवळ मराठी जगतात महत्त्वाचं स्थान निर्माण करेल, असा विश्वास वाटतो.

दुसऱ्या सत्रात साहित्यिक पृथ्वीराज तौर यांची मुलाखत विद्यार्थ्यांनी घेतली. यावेळी तौर म्हणाले की, लिहिण्यापेक्षा जास्त वाचले पाहिजे. कविता दु:खाचा, सहानुभूतीचा, अंत:करणाचा शब्द असतो. सुरवंटामधील फूलपाखरू ओळखणे गरजेचे बनले आहे. साहित्य संमेलने ही मुलांना अभिव्यक्तीचे पंख असल्याची जाणीव करून देतात, हे महत्त्वाचे आहे.

शेवटच्या सत्रात अस्मिता विश्वास चव्हाण हिच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन पार पडले. या कविसंमेलनात जिल्ह्यातील ५७ कवींनी सहभाग घेतला. याप्रसंगी मच्छिंद्र ऐनापुरे यांच्या बालकथा संग्रहाचे व गौतम पाटील यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. ग्रंथदिंडी प्रदर्शन व साहित्यसुमनांनी हे संमेलन विद्यार्थीमय झाले होते.संमेलनाचे संयोजन जिल्हा परिषद, शिक्षण विभाग डायट व दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा यांनी केले. दयासागर बन्ने, कृष्णात पाटोळे, ताई गवळी, सुषमा डांगे, बाबासाहेब परीट, स्वाती शिंदे-पवार, रघुवीर अथणीकर, वनिता पाटील, प्राचार्य डॉ. रमेश होसकोटे, डॉ. अंजली रसाळ, मुस्ताक पटेल, तुकाराम गायकवाड, विश्वास आठवले, शशिकांत नागरगोजे, चित्रकार संतोष पाटील, राजाराम केंगार, अमोल माने, शशिकांत कांबळे, सुरेश पवार, गौतम कांबळे आदींनी संमेलन यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

यावेळी शिक्षण व आरोग्य सभापती आशा पाटील, शिक्षणाधिकारी प्राथमिक सुनंदा वाखारे, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी नामदेव माळी, तुकाराम राजे, मेहबूब जमादार, अभिजित पाटील, नामदेव भोसले, भीमराव धुळूबुळू , अश्विनी कुलकर्णी, वर्षा चौगुले, वंदना हुलबत्ते, मनीषा पाटील, वसंत पाटील, सुरेखा कांबळे, अनिल कुमार पाटील, महेश कुमार कोष्टी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना लिहिते करण्याचा मानसतुम्ही लेखन करावे असे मला वाटते. कवितेत मन मुक्त होते. थोडक्या शब्दात खूप सांगतो तो साहित्यिक. कधी कधी डोळ्यातून पाणी येते आणि लेखनातून शब्द येतात. माणूस मरतो, पण साहित्य मरत नाही. म्हणूनच माझ्याबरोबर तुम्हालाही लिहिते करण्याचा मानस आहे, असे मत विद्यार्थी साहित्य संमेलनाध्यक्ष गौतम पाटील याने व्यक्त केले.

प्रसंगकथन आणि लेखकांशी गप्पाप्रसंगकथन सत्रामध्ये दहा विद्यार्थी साहित्यकांनी अनुभव-प्रसंग कथन केले. यामध्ये कथा, महापूर, दुष्काळ यासारख्या प्रसंगांचे कथन केले. या सत्राच्या अध्यक्षस्थानी भाटशिरगाव येथील जिल्हा परिषद शाळेचा विश्वजित माने हा विद्यार्थी होता. यानंतर पुस्तकातील लेखक हनुमंत चांदगुडे, संदीप नाझरे, मनोहर भोसले यांच्याशी मुलांनी मुक्त गप्पा मारल्या. त्यांचा लेखन प्रवास मुलांना प्रेरणादायी ठरला.

 

टॅग्स :Sangliसांगली