शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

पुस्तकात आयुष्य बदलण्याची ताकद ; विद्यार्थ्यांनीच सांभाळली जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 00:24 IST

केंद्रे म्हणाले की, लेखन ही ज्ञानाची पुढची पायरी आहे. अक्षरांच्या जगानं अनेक मुलांचे विश्व सजलेले आहे. लहान मुलांची पुस्तके काढणे व संमेलन घेणे ही सांगलीची बाल चळवळ मराठी जगतात महत्त्वाचं स्थान निर्माण करेल, असा विश्वास वाटतो.

ठळक मुद्दे किरण केंद्रे : कुपवाडला सहावे विद्यार्थी साहित्य संमेलन

कुपवाड : पुस्तकाचे जग खूप सुंदर जग आहे. आयुष्य बदलण्याची ताकद पुस्तकात आहे. त्यामुळे पुस्तकाचा हातात धरलेला हात कधीच सोडू नका, असे प्रतिपादन किशोर मासिकाचे संपादक किरण केंद्रे यांनी केले.कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील कृष्णा व्हॅली शैक्षणिक संकुलात मंगळवारी साहित्य संमेलनाचे उद्घाटन किरण केंद्रे यांच्याहस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी समडोळी हायस्कूलचा बालकवी गौतम पाटील होता, तर स्वागताध्यक्षपदी समृद्धी नागरगोजे होती.

केंद्रे म्हणाले की, लेखन ही ज्ञानाची पुढची पायरी आहे. अक्षरांच्या जगानं अनेक मुलांचे विश्व सजलेले आहे. लहान मुलांची पुस्तके काढणे व संमेलन घेणे ही सांगलीची बाल चळवळ मराठी जगतात महत्त्वाचं स्थान निर्माण करेल, असा विश्वास वाटतो.

दुसऱ्या सत्रात साहित्यिक पृथ्वीराज तौर यांची मुलाखत विद्यार्थ्यांनी घेतली. यावेळी तौर म्हणाले की, लिहिण्यापेक्षा जास्त वाचले पाहिजे. कविता दु:खाचा, सहानुभूतीचा, अंत:करणाचा शब्द असतो. सुरवंटामधील फूलपाखरू ओळखणे गरजेचे बनले आहे. साहित्य संमेलने ही मुलांना अभिव्यक्तीचे पंख असल्याची जाणीव करून देतात, हे महत्त्वाचे आहे.

शेवटच्या सत्रात अस्मिता विश्वास चव्हाण हिच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन पार पडले. या कविसंमेलनात जिल्ह्यातील ५७ कवींनी सहभाग घेतला. याप्रसंगी मच्छिंद्र ऐनापुरे यांच्या बालकथा संग्रहाचे व गौतम पाटील यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. ग्रंथदिंडी प्रदर्शन व साहित्यसुमनांनी हे संमेलन विद्यार्थीमय झाले होते.संमेलनाचे संयोजन जिल्हा परिषद, शिक्षण विभाग डायट व दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा यांनी केले. दयासागर बन्ने, कृष्णात पाटोळे, ताई गवळी, सुषमा डांगे, बाबासाहेब परीट, स्वाती शिंदे-पवार, रघुवीर अथणीकर, वनिता पाटील, प्राचार्य डॉ. रमेश होसकोटे, डॉ. अंजली रसाळ, मुस्ताक पटेल, तुकाराम गायकवाड, विश्वास आठवले, शशिकांत नागरगोजे, चित्रकार संतोष पाटील, राजाराम केंगार, अमोल माने, शशिकांत कांबळे, सुरेश पवार, गौतम कांबळे आदींनी संमेलन यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

यावेळी शिक्षण व आरोग्य सभापती आशा पाटील, शिक्षणाधिकारी प्राथमिक सुनंदा वाखारे, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी नामदेव माळी, तुकाराम राजे, मेहबूब जमादार, अभिजित पाटील, नामदेव भोसले, भीमराव धुळूबुळू , अश्विनी कुलकर्णी, वर्षा चौगुले, वंदना हुलबत्ते, मनीषा पाटील, वसंत पाटील, सुरेखा कांबळे, अनिल कुमार पाटील, महेश कुमार कोष्टी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना लिहिते करण्याचा मानसतुम्ही लेखन करावे असे मला वाटते. कवितेत मन मुक्त होते. थोडक्या शब्दात खूप सांगतो तो साहित्यिक. कधी कधी डोळ्यातून पाणी येते आणि लेखनातून शब्द येतात. माणूस मरतो, पण साहित्य मरत नाही. म्हणूनच माझ्याबरोबर तुम्हालाही लिहिते करण्याचा मानस आहे, असे मत विद्यार्थी साहित्य संमेलनाध्यक्ष गौतम पाटील याने व्यक्त केले.

प्रसंगकथन आणि लेखकांशी गप्पाप्रसंगकथन सत्रामध्ये दहा विद्यार्थी साहित्यकांनी अनुभव-प्रसंग कथन केले. यामध्ये कथा, महापूर, दुष्काळ यासारख्या प्रसंगांचे कथन केले. या सत्राच्या अध्यक्षस्थानी भाटशिरगाव येथील जिल्हा परिषद शाळेचा विश्वजित माने हा विद्यार्थी होता. यानंतर पुस्तकातील लेखक हनुमंत चांदगुडे, संदीप नाझरे, मनोहर भोसले यांच्याशी मुलांनी मुक्त गप्पा मारल्या. त्यांचा लेखन प्रवास मुलांना प्रेरणादायी ठरला.

 

टॅग्स :Sangliसांगली