शहरं
Join us  
Trending Stories
1
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
2
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
3
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
4
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
5
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
6
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
7
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
8
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
9
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
10
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
11
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
12
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
13
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
14
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
16
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
17
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
18
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
19
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
20
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप

बर्ड फ्लू रोखण्यासाठी आता पोल्ट्रीचेही लॉकडाऊन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 5:06 AM

सांगली : देशात व राज्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागामार्फत सतर्कता बाळण्यात आली आहे. विविध उपाययोजना ...

सांगली : देशात व राज्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागामार्फत सतर्कता बाळण्यात आली आहे. विविध उपाययोजना हाती घेतल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एस. ए. धकाते यांनी दिली.

पोल्ट्रीतील पक्षी, वन्य पक्षी, स्थलांतरीत पक्षी यांच्यात एव्हिएन इन्फ्लूएन्झा (बर्ड फ्ल्यू) ची लक्षणे दिसल्यास अथवा जास्त मृत्यू झाल्यास वरिष्ठांना तात्काळ कळविण्याचे आदेश पशुवैद्यकांना दिले आहेत. हा रोग अत्यंत सांसर्गिक असून पक्ष्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अचानक मरतूक होते. पक्ष्यांची भूक मंदावते. डोके, पापण्या, तुरे व कल्ले, पाय सुजतात. नाकातून स्त्राव वाहतो. तुरा, कल्ला जांभळट होतो. खोकणे, शिंकणे तसेच हागवण अशी लक्षणे आढळतात.

अशी घाऊक मरतूक अथवा लक्षणे आढळल्यास तात्काळ पशुसंवर्धन विभागाला कळविण्याचे आवाहन केले आहे. ग्रामपंचायतींनी ७ ग्राम धुण्याच्या सोड्याचे १ लिटर पाण्यात मिश्रण करुन खुराडे, गोठे, गटारीवर १५ दिवसांच्या अंतराने तीनवेळा फवारणी करावी. संशयित क्षेत्रावरून पक्षांची वाहतूक पूर्ण बंद करण्याचा प्रस्ताव आहे. संभाव्य संसर्ग रोखण्यासाठी पोल्ट्री व्यावसायिकांनी स्वच्छतेची पुरेपूर काळजी घ्यावी असे डॉ. धकाते म्हणाले.

पक्ष्यांच्या मृत्यूंवर पशुसंवर्धनची नजर

n स्थानिक पक्षीप्रेमी, संस्था, अभ्यासकांच्या माध्यमातून पक्ष्यांवर नजर ठेवण्यात येत आहे.

n पाळीव पक्षी तसेच जलाशयावर सस्थलांतरीत होणाऱ्या पक्ष्यांवरही लक्ष ठेवले जात आहे.

n कोंबडीची जिल्हा व तालुकास्तरावर दक्षता पथके स्थापन करण्यात आली आहेत.

n धुण्याच्या सोड्याचे द्रावण गोठ्यात, पोल्ट्रीत फवारण्याच्या सूचना आहेत.

मृत पक्ष्याचे शवविच्छेदन स्वत: करु नका !

बर्ड फ्लू सर्वेक्षण कार्यक्रमानुसार क्लोकल नमुने, ट्रकिअल नमुने व रक्त-जल नमुने संकलीत करुन रोग अन्वेषण प्रयोगशाळेत पाठविण्याच्या सूचना पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. पोल्ट्री किंवा अन्यत्र मृत पक्षी आढळल्यास नागरीकांनी स्वत: न हाताळता किंवा शवविच्छेदन न करता पशुवैद्यकीय विभागास कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बर्ड फ्लूचा संभाव्य धोका टाळण्यासाठी जिल्ह्यात उपाययोजना हाती घेतल्या आहेत. पोल्ट्री फार्म्समध्ये जैवसुरक्षितता उपाय राबवून पक्ष्यांची मर रोखली जात आहे.

- डॉ. संजय धकाते, पशु उपायुक्त

-----------