शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

'ईएसआयसी'चा कामगारांच्या पात्र-अपात्रतेचा घोळ; सेवा असून अडचण, नसून खोळंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 16:17 IST

दवाखान्याच्या नूतनीकरण प्रक्रियेत सावळागोंधळ

महालिंग सलगरकुपवाड : राज्य कामगार विमा महामंडळ (ईएसआयसी)कडून नेमण्यात आलेल्या मान्यताप्राप्त खासगी दवाखान्याकडे यापूर्वी कामगारांच्या पात्र- अपात्रतेची सुविधा होती. ईएसआयसीच्या कार्यालयाकडून आता ही सुविधा मान्यताप्राप्त खासगी दवाखान्यांवर अविश्वास दाखवून स्वतःकडे घेतल्याने जिल्ह्यातील नोंदणीकृत कामगारांना नाहक त्रास होत आहे. ‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ अशी अवस्था झालेल्या ईएसआयसीच्या कार्यालयात ही प्रक्रिया करेपर्यंत कामगारांचा जीव कासावीस होऊ लागला आहे. त्यामुळे ईएसआयसी कार्यालयाकडून मिळणाऱ्या सुविधांची अवस्था आता ‘असून अडचण, नसून खोळंबा’ झाल्यासारखी होऊ लागली आहे.जिल्ह्यात मिरज एमआयडीसीबरोबरच कुपवाड, इस्लामपूर, कवठेमहांकाळ, पलूस, जत, विटा, शिराळा, कडेगाव या वसाहती कार्यरत आहेत, तसेच औद्योगिक वसाहतींमध्ये वसंतदादा औद्योगिक वसाहतीबरोबरच गोविंदराव मराठे, पलूस, तासगाव, विटा, माधवनगर या वसाहती कार्यरत आहेत. या सहकारी व महामंडळाच्या ताब्यातील औद्योगिक वसाहतींमधून फूड, टेक्सटाइल, पशुखाद्य, स्टार्च, ग्लुकोज, फौंड्री, ऑटो कंपोनंट, गारमेंट, प्लास्टिक, शुगर मशिनरी, केमिकलसह इतर उद्योगांमधून उद्योजकांनी लाखो कामगारांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

या उद्योगामधील हजारो कामगार या राज्य कामगार विमा महामंडळाकडे नोंदणीकृत असून, या सुविधेचा लाभ त्यांच्यासह कुटुंबीयांनाही मिळतो आहे. ईएसआयसीच्या तरतुदीनुसार कामगार आणि व्यवस्थापनाने मिळून चार टक्के भरणा करण्याची सक्ती असते. व्यवस्थापनाने दिरंगाई केल्यास त्वरित कारवाईचा बडगा उगारला जातो. जिल्ह्यातील नोंदणीकृत कामगारांच्या भरण्याची रक्कम कोट्यवधी रुपयांच्या घरात जमा होते. मात्र, पैसे भरूनही ईएसआयसीच्या मिरज, विजयनगर आणि सांगलीतील दवाखान्यांतून चांगली सेवा मिळण्याऐवजी कामगारांची हेळसांडच अधिक होत आहे.यापूर्वी दवाखान्याकडे कामगारांच्या पात्र- अपात्रतेची सुविधा असल्याने गंभीर कामगारांना भरती झाल्यानंतर त्वरित उपचार सुरू होत होते. आता ही सुविधा ईएसआयसीच्या कार्यालयाकडे गेल्याने त्यांच्याकडील पात्र- अपात्रतेबाबतचे पत्र घेईपर्यंत गंभीर असलेला कामगार हेलपाटे घालून मेटाकुटीस येत आहे. शासकीय सुट्या, अधिकारी हजर नसणे, सर्व्हर डाऊन आदी कारणांमुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचा आरोप कामगारांकडून होत आहे.

ईएसआयसीच्या वरिष्ठ कार्यालयाने ही बाब गांभीर्याने घेऊन ही सेवा पुन्हा जिल्ह्यातील मान्यताप्राप्त खासगी दवाखान्याकडे द्यावी. त्यामुळे अडचणीतील कामगारांना खासगी दवाखान्याकडून त्वरित सुविधा मिळतील, अशी मागणी जिल्ह्यातील नोंदणीकृत कामगार आणि उद्योजकाकडून होऊ लागली आहे.

दवाखान्याच्या नूतनीकरण प्रक्रियेत सावळागोंधळईएसआयसीकडून मान्यता दिलेल्या खाजगी दवाखान्यांचे दरवर्षी नूतनीकरण केले जाते. या खाजगी दवाखान्यांना दरवर्षी कागदांचा खेळ करत बसावे लागते. अनेक अडचणींचा सामना करत पुन्हा नव्याने परवानगी घ्यावी लागते. या प्रक्रियेमुळे दवाखाना चालकांना त्रास सहन करावा लागतो. याबाबतीत वरिष्ठ कार्यालयाने निश्चित धोरण तयार करून हा सावळागोंधळ थांबवावा, अशी मागणी मराठा उद्योजक संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

टॅग्स :Sangliसांगलीhospitalहॉस्पिटल