शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

'ईएसआयसी'चा कामगारांच्या पात्र-अपात्रतेचा घोळ; सेवा असून अडचण, नसून खोळंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 16:17 IST

दवाखान्याच्या नूतनीकरण प्रक्रियेत सावळागोंधळ

महालिंग सलगरकुपवाड : राज्य कामगार विमा महामंडळ (ईएसआयसी)कडून नेमण्यात आलेल्या मान्यताप्राप्त खासगी दवाखान्याकडे यापूर्वी कामगारांच्या पात्र- अपात्रतेची सुविधा होती. ईएसआयसीच्या कार्यालयाकडून आता ही सुविधा मान्यताप्राप्त खासगी दवाखान्यांवर अविश्वास दाखवून स्वतःकडे घेतल्याने जिल्ह्यातील नोंदणीकृत कामगारांना नाहक त्रास होत आहे. ‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ अशी अवस्था झालेल्या ईएसआयसीच्या कार्यालयात ही प्रक्रिया करेपर्यंत कामगारांचा जीव कासावीस होऊ लागला आहे. त्यामुळे ईएसआयसी कार्यालयाकडून मिळणाऱ्या सुविधांची अवस्था आता ‘असून अडचण, नसून खोळंबा’ झाल्यासारखी होऊ लागली आहे.जिल्ह्यात मिरज एमआयडीसीबरोबरच कुपवाड, इस्लामपूर, कवठेमहांकाळ, पलूस, जत, विटा, शिराळा, कडेगाव या वसाहती कार्यरत आहेत, तसेच औद्योगिक वसाहतींमध्ये वसंतदादा औद्योगिक वसाहतीबरोबरच गोविंदराव मराठे, पलूस, तासगाव, विटा, माधवनगर या वसाहती कार्यरत आहेत. या सहकारी व महामंडळाच्या ताब्यातील औद्योगिक वसाहतींमधून फूड, टेक्सटाइल, पशुखाद्य, स्टार्च, ग्लुकोज, फौंड्री, ऑटो कंपोनंट, गारमेंट, प्लास्टिक, शुगर मशिनरी, केमिकलसह इतर उद्योगांमधून उद्योजकांनी लाखो कामगारांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

या उद्योगामधील हजारो कामगार या राज्य कामगार विमा महामंडळाकडे नोंदणीकृत असून, या सुविधेचा लाभ त्यांच्यासह कुटुंबीयांनाही मिळतो आहे. ईएसआयसीच्या तरतुदीनुसार कामगार आणि व्यवस्थापनाने मिळून चार टक्के भरणा करण्याची सक्ती असते. व्यवस्थापनाने दिरंगाई केल्यास त्वरित कारवाईचा बडगा उगारला जातो. जिल्ह्यातील नोंदणीकृत कामगारांच्या भरण्याची रक्कम कोट्यवधी रुपयांच्या घरात जमा होते. मात्र, पैसे भरूनही ईएसआयसीच्या मिरज, विजयनगर आणि सांगलीतील दवाखान्यांतून चांगली सेवा मिळण्याऐवजी कामगारांची हेळसांडच अधिक होत आहे.यापूर्वी दवाखान्याकडे कामगारांच्या पात्र- अपात्रतेची सुविधा असल्याने गंभीर कामगारांना भरती झाल्यानंतर त्वरित उपचार सुरू होत होते. आता ही सुविधा ईएसआयसीच्या कार्यालयाकडे गेल्याने त्यांच्याकडील पात्र- अपात्रतेबाबतचे पत्र घेईपर्यंत गंभीर असलेला कामगार हेलपाटे घालून मेटाकुटीस येत आहे. शासकीय सुट्या, अधिकारी हजर नसणे, सर्व्हर डाऊन आदी कारणांमुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचा आरोप कामगारांकडून होत आहे.

ईएसआयसीच्या वरिष्ठ कार्यालयाने ही बाब गांभीर्याने घेऊन ही सेवा पुन्हा जिल्ह्यातील मान्यताप्राप्त खासगी दवाखान्याकडे द्यावी. त्यामुळे अडचणीतील कामगारांना खासगी दवाखान्याकडून त्वरित सुविधा मिळतील, अशी मागणी जिल्ह्यातील नोंदणीकृत कामगार आणि उद्योजकाकडून होऊ लागली आहे.

दवाखान्याच्या नूतनीकरण प्रक्रियेत सावळागोंधळईएसआयसीकडून मान्यता दिलेल्या खाजगी दवाखान्यांचे दरवर्षी नूतनीकरण केले जाते. या खाजगी दवाखान्यांना दरवर्षी कागदांचा खेळ करत बसावे लागते. अनेक अडचणींचा सामना करत पुन्हा नव्याने परवानगी घ्यावी लागते. या प्रक्रियेमुळे दवाखाना चालकांना त्रास सहन करावा लागतो. याबाबतीत वरिष्ठ कार्यालयाने निश्चित धोरण तयार करून हा सावळागोंधळ थांबवावा, अशी मागणी मराठा उद्योजक संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

टॅग्स :Sangliसांगलीhospitalहॉस्पिटल