शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

धर्मचिकित्सा न झाल्यानेच मुस्लीमांच्या प्रश्नांचे राजकारण - अभिराम भडकमकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2023 11:36 IST

पूर्वी वाहिन्यांमध्ये स्पर्धा होती, आता आंधळे अनुकरण 

सांगली : मुस्लिम चळवळींनी समाजसुधारक व साहित्यिक असलेल्या हमीद दलवाईंचा हात सोडला. तसेच धर्मचिकित्सा न झाल्याने मुस्लिमांचे प्रश्न राजकीय बनले आहेत. हिजाबसारखे विषय केंद्रीभूत ठरत आहेत, असे प्रतिपादन प्रसिद्ध रंगकर्मी व लेखक अभिराम भडकमकर यांनी केले.सांगलीत रविवारी संस्कार भारतीच्या ३१ व्या वर्धापन सोहळ्यात लेखिका, अभिनेत्री चेतना वैद्य यांनी भडकमकर यांची प्रकट मुलाखत घेतली, त्या वेळी ते बोलत होते. आमदार सुधीर गाडगीळ अध्यक्षस्थानी होते.यावेळी गायिका श्रद्धा जोशी-दांडेकर व तबलावादक नीलेश काळे यांना गाडगीळ यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. भडकमकर म्हणाले, मुस्लिमांच्या प्रश्नांमध्ये वातावरण आणि शिक्षण ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. मदरशातील शिक्षणाऐवजी उपयुक्त व ऊहापोह झालेले शिक्षण द्यायला हवे. पण धर्मचिकित्सा न होता हा राजकीय विषय झाला आहे. मला मुस्लिमांचे प्रश्न माहिती आहेत. हिंदू धर्माला संतांनी अनेक शिव्या दिल्या, पण त्यामागे तळमळ होती.ते म्हणाले, सध्याचे पुरोगामित्व भंजाळलेले व भरकटलेले आहे. विद्वान गणेश देवी यांनी भाजपचा पराभव म्हणजे पुरोगामीत्व असे विचित्र विधान पुण्यात केले. पण हे पुरोगामित्व नव्हे. त्याची नक्की व्याख्या काय? यावर चर्चा होत नाही. आपल्या देशाला कोणी पुरोगामीत्व शिकविण्याची गरज नाही.उर्वी मराठे हिने ध्येयगीत गायिले. शुभदा पाटणकर यांनी सूत्रसंचालन केले. अभय भंडारी, संतोष बापट, परागेश जोशी, कविता कुलकर्णी, सुहास पंडित आदींनी संयोजन केले.

हुसेन आणि वादग्रस्त चित्रेभडकमकर म्हणाले, प्रसिद्ध चित्रकार एम. एफ. हुसेन यांनी नग्न सरस्वतीचे चित्र काढले. विरोध झाला तरी ठाम राहिले. आपण `आविष्कार स्वातंत्र्याचा योद्धा` म्हणून त्यांचा गौरव केला. हुसेन यांनी अन्य धर्मावरही अशीच कलाकृती केली, तेव्हा त्यांना `हे चालणार नाही` असे सांगितले गेले. तेव्हा त्यांनी कलाकृती मागे घेतली.

वाहिन्यांना रायटर नकोत, टाईपरायटर हवेतभडकमकर म्हणाले, लेखक धोका पत्करून लिहायला तयार आहेत, पण वाहिन्यांनी स्वातंत्र्य दिले पाहिजे. हल्ली वाहिन्यांना रायटर नकोत, टाईपरायटर हवेत. लेखकांचे हात बांधून ठेवलेत. वाहिन्यांनी धोका पत्करला पाहिजे. गेल्या काही वर्षात त्यांचा आकार मोठा झाला, पण आशयाने मोठ्या झाल्या नाहीत. पूर्वी वाहिन्यांमध्ये स्पर्धा होती, आता आंधळे अनुकरण सुरु आहे. वाहिन्यांनी लेखक, कलाकार, दिग्दर्शकांवर विश्वास ठेवायला हवा.

टॅग्स :SangliसांगलीMuslimमुस्लीमPoliticsराजकारण