शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

धर्मचिकित्सा न झाल्यानेच मुस्लीमांच्या प्रश्नांचे राजकारण - अभिराम भडकमकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2023 11:36 IST

पूर्वी वाहिन्यांमध्ये स्पर्धा होती, आता आंधळे अनुकरण 

सांगली : मुस्लिम चळवळींनी समाजसुधारक व साहित्यिक असलेल्या हमीद दलवाईंचा हात सोडला. तसेच धर्मचिकित्सा न झाल्याने मुस्लिमांचे प्रश्न राजकीय बनले आहेत. हिजाबसारखे विषय केंद्रीभूत ठरत आहेत, असे प्रतिपादन प्रसिद्ध रंगकर्मी व लेखक अभिराम भडकमकर यांनी केले.सांगलीत रविवारी संस्कार भारतीच्या ३१ व्या वर्धापन सोहळ्यात लेखिका, अभिनेत्री चेतना वैद्य यांनी भडकमकर यांची प्रकट मुलाखत घेतली, त्या वेळी ते बोलत होते. आमदार सुधीर गाडगीळ अध्यक्षस्थानी होते.यावेळी गायिका श्रद्धा जोशी-दांडेकर व तबलावादक नीलेश काळे यांना गाडगीळ यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. भडकमकर म्हणाले, मुस्लिमांच्या प्रश्नांमध्ये वातावरण आणि शिक्षण ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. मदरशातील शिक्षणाऐवजी उपयुक्त व ऊहापोह झालेले शिक्षण द्यायला हवे. पण धर्मचिकित्सा न होता हा राजकीय विषय झाला आहे. मला मुस्लिमांचे प्रश्न माहिती आहेत. हिंदू धर्माला संतांनी अनेक शिव्या दिल्या, पण त्यामागे तळमळ होती.ते म्हणाले, सध्याचे पुरोगामित्व भंजाळलेले व भरकटलेले आहे. विद्वान गणेश देवी यांनी भाजपचा पराभव म्हणजे पुरोगामीत्व असे विचित्र विधान पुण्यात केले. पण हे पुरोगामित्व नव्हे. त्याची नक्की व्याख्या काय? यावर चर्चा होत नाही. आपल्या देशाला कोणी पुरोगामीत्व शिकविण्याची गरज नाही.उर्वी मराठे हिने ध्येयगीत गायिले. शुभदा पाटणकर यांनी सूत्रसंचालन केले. अभय भंडारी, संतोष बापट, परागेश जोशी, कविता कुलकर्णी, सुहास पंडित आदींनी संयोजन केले.

हुसेन आणि वादग्रस्त चित्रेभडकमकर म्हणाले, प्रसिद्ध चित्रकार एम. एफ. हुसेन यांनी नग्न सरस्वतीचे चित्र काढले. विरोध झाला तरी ठाम राहिले. आपण `आविष्कार स्वातंत्र्याचा योद्धा` म्हणून त्यांचा गौरव केला. हुसेन यांनी अन्य धर्मावरही अशीच कलाकृती केली, तेव्हा त्यांना `हे चालणार नाही` असे सांगितले गेले. तेव्हा त्यांनी कलाकृती मागे घेतली.

वाहिन्यांना रायटर नकोत, टाईपरायटर हवेतभडकमकर म्हणाले, लेखक धोका पत्करून लिहायला तयार आहेत, पण वाहिन्यांनी स्वातंत्र्य दिले पाहिजे. हल्ली वाहिन्यांना रायटर नकोत, टाईपरायटर हवेत. लेखकांचे हात बांधून ठेवलेत. वाहिन्यांनी धोका पत्करला पाहिजे. गेल्या काही वर्षात त्यांचा आकार मोठा झाला, पण आशयाने मोठ्या झाल्या नाहीत. पूर्वी वाहिन्यांमध्ये स्पर्धा होती, आता आंधळे अनुकरण सुरु आहे. वाहिन्यांनी लेखक, कलाकार, दिग्दर्शकांवर विश्वास ठेवायला हवा.

टॅग्स :SangliसांगलीMuslimमुस्लीमPoliticsराजकारण