शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
4
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
6
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
7
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
8
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
9
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
10
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
11
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
12
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
13
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
14
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
15
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
16
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
17
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
18
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
19
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
20
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?

धर्मचिकित्सा न झाल्यानेच मुस्लीमांच्या प्रश्नांचे राजकारण - अभिराम भडकमकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2023 11:36 IST

पूर्वी वाहिन्यांमध्ये स्पर्धा होती, आता आंधळे अनुकरण 

सांगली : मुस्लिम चळवळींनी समाजसुधारक व साहित्यिक असलेल्या हमीद दलवाईंचा हात सोडला. तसेच धर्मचिकित्सा न झाल्याने मुस्लिमांचे प्रश्न राजकीय बनले आहेत. हिजाबसारखे विषय केंद्रीभूत ठरत आहेत, असे प्रतिपादन प्रसिद्ध रंगकर्मी व लेखक अभिराम भडकमकर यांनी केले.सांगलीत रविवारी संस्कार भारतीच्या ३१ व्या वर्धापन सोहळ्यात लेखिका, अभिनेत्री चेतना वैद्य यांनी भडकमकर यांची प्रकट मुलाखत घेतली, त्या वेळी ते बोलत होते. आमदार सुधीर गाडगीळ अध्यक्षस्थानी होते.यावेळी गायिका श्रद्धा जोशी-दांडेकर व तबलावादक नीलेश काळे यांना गाडगीळ यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. भडकमकर म्हणाले, मुस्लिमांच्या प्रश्नांमध्ये वातावरण आणि शिक्षण ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. मदरशातील शिक्षणाऐवजी उपयुक्त व ऊहापोह झालेले शिक्षण द्यायला हवे. पण धर्मचिकित्सा न होता हा राजकीय विषय झाला आहे. मला मुस्लिमांचे प्रश्न माहिती आहेत. हिंदू धर्माला संतांनी अनेक शिव्या दिल्या, पण त्यामागे तळमळ होती.ते म्हणाले, सध्याचे पुरोगामित्व भंजाळलेले व भरकटलेले आहे. विद्वान गणेश देवी यांनी भाजपचा पराभव म्हणजे पुरोगामीत्व असे विचित्र विधान पुण्यात केले. पण हे पुरोगामित्व नव्हे. त्याची नक्की व्याख्या काय? यावर चर्चा होत नाही. आपल्या देशाला कोणी पुरोगामीत्व शिकविण्याची गरज नाही.उर्वी मराठे हिने ध्येयगीत गायिले. शुभदा पाटणकर यांनी सूत्रसंचालन केले. अभय भंडारी, संतोष बापट, परागेश जोशी, कविता कुलकर्णी, सुहास पंडित आदींनी संयोजन केले.

हुसेन आणि वादग्रस्त चित्रेभडकमकर म्हणाले, प्रसिद्ध चित्रकार एम. एफ. हुसेन यांनी नग्न सरस्वतीचे चित्र काढले. विरोध झाला तरी ठाम राहिले. आपण `आविष्कार स्वातंत्र्याचा योद्धा` म्हणून त्यांचा गौरव केला. हुसेन यांनी अन्य धर्मावरही अशीच कलाकृती केली, तेव्हा त्यांना `हे चालणार नाही` असे सांगितले गेले. तेव्हा त्यांनी कलाकृती मागे घेतली.

वाहिन्यांना रायटर नकोत, टाईपरायटर हवेतभडकमकर म्हणाले, लेखक धोका पत्करून लिहायला तयार आहेत, पण वाहिन्यांनी स्वातंत्र्य दिले पाहिजे. हल्ली वाहिन्यांना रायटर नकोत, टाईपरायटर हवेत. लेखकांचे हात बांधून ठेवलेत. वाहिन्यांनी धोका पत्करला पाहिजे. गेल्या काही वर्षात त्यांचा आकार मोठा झाला, पण आशयाने मोठ्या झाल्या नाहीत. पूर्वी वाहिन्यांमध्ये स्पर्धा होती, आता आंधळे अनुकरण सुरु आहे. वाहिन्यांनी लेखक, कलाकार, दिग्दर्शकांवर विश्वास ठेवायला हवा.

टॅग्स :SangliसांगलीMuslimमुस्लीमPoliticsराजकारण