शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलींबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
3
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
4
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
5
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
6
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
7
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
8
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
9
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
10
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
13
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
14
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
15
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
16
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
17
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
18
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
19
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
20
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

दिघंचीत पाण्यावरून श्रेयवादाचे राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:28 IST

दिघंची : दिघंची (ता. आटपाडी) येथे अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या राष्ट्रीय पेयजल योजनेचा प्रश्न मार्गी लागला आहे. यामुळे वाॅर्ड ...

दिघंची : दिघंची (ता. आटपाडी) येथे अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या राष्ट्रीय पेयजल योजनेचा प्रश्न मार्गी लागला आहे. यामुळे वाॅर्ड नंबर एक, दोन व सहासाठी मंजूर झालेल्या ३ कोटी ५ लाखांच्या निधीवरून सध्या श्रेयवादाचे राजकारण सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. सत्ताधारी शिवसेना व विरोधक भाजप यांच्या श्रेयवादाची चर्चा दिघंचीत चांगलीच रंगू लागली आहे.

या योजनेतून दोन टाक्या बांधल्या जाणार आहेत. यामुळे दिघंचीतील चाळीस वाड्या-वस्त्यांना याचा फायदा होणार आहे. सुमारे २७०० कुटुंबांना पिण्यासाठी पाणी मिळणार असल्याने हा भाग कायमस्वरूपी टँकरमुक्त होणार आहे. तर या योजनेतून माणसी ५५ लिटर पाणी प्रतिदिवस मिळणार आहे. या योजनेच्या श्रेयवादाची चर्चा सध्या सुरू झाली आहे.

सरपंच अमोल मोरे म्हणाले की, ही योजना कोणत्या योजनेतून मंजूर झाली, याची माहिती घ्यावी. केवळ श्रेयवादासाठी प्रसिध्दी मिळवणाऱ्यांनी जनतेची दिशाभूल थांबवावी. वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांची तहान भागवणे यासाठीच आमचे प्राधान्य आहे. आमदार अनिल बाबर व तानाजीराव पाटील यांच्यामुळेच ही योजना मार्गी लागली आहे.

याला उत्तर देताना ग्रामपंचायत सदस्य केशवराव मिसाळ म्हणाले की, खासदार संजयकाका पाटील व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख व हर्षवर्धन देशमुख यांच्यामुळेच ही योजना मार्गी लागली आहे. योजनेसाठी आम्ही आंदोलनाचा इशारा दिला होता. ही योजना मंजूर होत नाही, असे दोन महिन्यांपूर्वी म्हणणाऱ्या अल्प मतातील सरपंचांनी याचे श्रेय घेऊ नये. ही योजना मार्गी लावण्यासाठी आम्ही सर्व सदस्य व कार्यकर्त्यांनी सतत पाठपुरावा केला आहे.

चौकट

नागरिकांना दिलासा

राष्ट्रीय पेयजल योजनेसाठी ३ कोटी ५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. यावरून दिघंचीत श्रेयवादाचे राजकारण सुरू झाले आहे. मात्र दिघंचीमधील वाॅर्ड नंबर एक, दोन व सहामधील ४० वाड्या-वस्त्या टँकरमुक्त होणार असून, येथील नागरिकांना दिलासा मिळणार आहे