शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

दिघंचीत पाण्यावरून श्रेयवादाचे राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:28 IST

दिघंची : दिघंची (ता. आटपाडी) येथे अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या राष्ट्रीय पेयजल योजनेचा प्रश्न मार्गी लागला आहे. यामुळे वाॅर्ड ...

दिघंची : दिघंची (ता. आटपाडी) येथे अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या राष्ट्रीय पेयजल योजनेचा प्रश्न मार्गी लागला आहे. यामुळे वाॅर्ड नंबर एक, दोन व सहासाठी मंजूर झालेल्या ३ कोटी ५ लाखांच्या निधीवरून सध्या श्रेयवादाचे राजकारण सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. सत्ताधारी शिवसेना व विरोधक भाजप यांच्या श्रेयवादाची चर्चा दिघंचीत चांगलीच रंगू लागली आहे.

या योजनेतून दोन टाक्या बांधल्या जाणार आहेत. यामुळे दिघंचीतील चाळीस वाड्या-वस्त्यांना याचा फायदा होणार आहे. सुमारे २७०० कुटुंबांना पिण्यासाठी पाणी मिळणार असल्याने हा भाग कायमस्वरूपी टँकरमुक्त होणार आहे. तर या योजनेतून माणसी ५५ लिटर पाणी प्रतिदिवस मिळणार आहे. या योजनेच्या श्रेयवादाची चर्चा सध्या सुरू झाली आहे.

सरपंच अमोल मोरे म्हणाले की, ही योजना कोणत्या योजनेतून मंजूर झाली, याची माहिती घ्यावी. केवळ श्रेयवादासाठी प्रसिध्दी मिळवणाऱ्यांनी जनतेची दिशाभूल थांबवावी. वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांची तहान भागवणे यासाठीच आमचे प्राधान्य आहे. आमदार अनिल बाबर व तानाजीराव पाटील यांच्यामुळेच ही योजना मार्गी लागली आहे.

याला उत्तर देताना ग्रामपंचायत सदस्य केशवराव मिसाळ म्हणाले की, खासदार संजयकाका पाटील व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख व हर्षवर्धन देशमुख यांच्यामुळेच ही योजना मार्गी लागली आहे. योजनेसाठी आम्ही आंदोलनाचा इशारा दिला होता. ही योजना मंजूर होत नाही, असे दोन महिन्यांपूर्वी म्हणणाऱ्या अल्प मतातील सरपंचांनी याचे श्रेय घेऊ नये. ही योजना मार्गी लावण्यासाठी आम्ही सर्व सदस्य व कार्यकर्त्यांनी सतत पाठपुरावा केला आहे.

चौकट

नागरिकांना दिलासा

राष्ट्रीय पेयजल योजनेसाठी ३ कोटी ५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. यावरून दिघंचीत श्रेयवादाचे राजकारण सुरू झाले आहे. मात्र दिघंचीमधील वाॅर्ड नंबर एक, दोन व सहामधील ४० वाड्या-वस्त्या टँकरमुक्त होणार असून, येथील नागरिकांना दिलासा मिळणार आहे